महाराष्ट्र
शिरूर तालुक्यात बिबट्याचा थरकाप; आईसमोर चिमुरडीवर हल्ला, दोन तासांनी आढळला मृतदेह.
शिरूर (पुणे): शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी गावात बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षांच्या रक्षानिकम या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना तिच्या आईच्या डोळ्यांसमोर घडल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेचा तपशील: रक्षा अजय निकम (वय ४) असे मृत मुलीचे नाव आहे. आई अंगणात आपल्या मुलाला खाऊ घालत असताना अचानक बिबट्याने संरक्षणासाठी उभ्या असलेल्या रक्षावर हल्ला केला. बिबट्याने चिमुकलीला...
विश्रामबाग पोलिसांची धाडसी कारवाई! दोन पिस्तुल आणि एक काडतूस बाळगणारा तरुण अटकेत
पुणे – शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा धागा मजबूत ठेवण्यासाठी पुणे पोलिस सतत दक्ष आहेत. याच सतर्कतेचे उदाहरण म्हणजे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेली अत्यंत यशस्वी कारवाई. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन गावठी पिस्तुलं आणि एक काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला अटक करत मोठा गुन्हा रोखला आहे. विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार आशिष खरात आणि अनिस शेख यांना गोपनीय बातमी मिळाली की,...
“स्व. ऋतुजाचे बलिदान व्यर्थ जाणार नाही…! धर्मांतरबंदी कायदा लवकरच लागू होणार – धर्मांतर बंदी कायद्यासाठी महेशदादा लांडगे यांनी दिला निर्धाराचा इशारा!
सांगली जिल्ह्यातील एका उच्चशिक्षित, सात महिन्यांची गर्भवती असलेल्या हिंदू भगिनीच्या दुःखद मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. स्व. सौ. ऋतुजा राजगे या तरुण विवाहितेने सासरच्या मंडळींकडून ख्रिश्चन धर्मांतरणासाठी होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून आपले जीवन संपवले. मात्र मृत्यूपूर्वी तिने आपल्या कृतीतून एकच संदेश दिला – “प्राण सोडला पण हिंदू धर्म नाही सोडला!” ही घटना केवळ एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण हिंदू...
‘दोन महिन्यांत कंपनीचं मोठं नुकसान केलं’; अभिनेता गौरव मालणकरने सांगितला संघर्षमय प्रवासाचा मजेशीर किस्सा
मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता गौरव मालणकर याने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबाबत एक मजेशीर आणि तितकाच प्रेरणादायी किस्सा सांगितला आहे. अभिनय क्षेत्रात आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गौरवने सुरुवातीला विज्ञान शाखेत उच्च शिक्षण घेतले होते. मात्र, नोकरी आणि अभिनय यामधील निवड करताना त्याने मनाचा कौल ऐकत अखेर अभिनय क्षेत्राची वाट निवडली. या प्रवासात आलेले अनुभव आणि...
फुरसुंगी येथील मिळकतीबाबतचा दस्त गहाळ आणि कुलमुखत्यार रद्द – नागरिकांनी सतर्क राहावे!
पुणे शहरात जमीन व्यवहारांबाबत वारंवार होणाऱ्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची नोटीस जाहीर करण्यात आली आहे. आमचे अशील श्री. कुणाल राजेंद्रसिंग राजपुत यांच्या माहितीनुसार, दिनांक १९/०३/२०२५ रोजी त्यांनी श्री. आकाश बसंत वाल्मिकी आणि इरशाद अबरार शेख यांना दिलेला कुलमुखत्यारपत्र दस्त हवेली क्र. २, दस्त क्र. ७२४०/२०२५ अन्वये विधिवत नोंदणी करण्यात आला होता. मात्र, वैयक्तिक कारणास्तव हा कुलमुखत्यार दस्त दिनांक ०७/०८/२०२५...
फुरसुंगी हत्या प्रकरणातील आरोपी लातूरमधून जेरबंद — गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी यशस्वी कामगिरी!
फुरसुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने पुणे शहर हादरले होते. मृताच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापती झाल्याचे आढळून आले होते. ही घटना अत्यंत निर्घृण स्वरूपाची असून पोलीस प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला. मृताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून मृताचे नाव हनिफ मुसा शेख (वय ३०, रा. कृष्णानगर, महमदवाडी, पुणे) असे आहे. १० मे २०२५ रोजी...
आळंदीत वाद्यांचा गजर, रांगोळीच्या पायघड्या; माउलींच्या पालखीचे स्वगृही आगमन सोहळा भव्यदिव्य पद्धतीने संपन्न
पंढरपूरातील आषाढी वारीचे यशस्वी समारोपानंतर संत श्री ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदीत पुन्हा एकदा वाद्यवृंदाच्या गजरात आणि भक्तांच्या जल्लोषात स्वगृही परतली. आळंदी नगरीने फुलांच्या उधळणीत आणि रांगोळीच्या पायघड्यांनी पालखीचे जंगी स्वागत केले. शेकडो वारकरी टाळ-मृदुंगाच्या निनादात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या गजरात सहभागी झाले होते. पालखीच्या मार्गावर भक्तांनी घरासमोर रांगोळ्या रेखाटल्या होत्या तर काही ठिकाणी फुलांची आरास सजवण्यात आली होती. वातावरण भक्तिमय...
लोणी काळभोर पोलिसांची यशस्वी कारवाई – घरफोडीतील सराईत चोरटा जेरबंद, तब्बल १.९५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
लोणी काळभोर पोलिसांनी उत्कृष्ट तपास आणि शिताफीच्या कारवाईतून घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला जेरबंद केले असून, त्याच्याकडून तब्बल ₹१,९५,४२१/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिसांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाली असून, परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपीचा माग काढला. पोलिसांच्या सततच्या गस्त घालण्यामुळे आणि संशयास्पद हालचालींवर...
डोंबिवलीत धक्कादायक घटना: विनोद करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू
डोंबिवलीत धक्कादायक घटना: विनोद करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू डोंबिवलीतील विकास नाका परिसरात असलेल्या ग्लोब स्टेट इमारतीत धक्कादायक घटना घडली आहे. तिसऱ्या मजल्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नागीना देवी मंजिराम असे मृत महिलेचे नाव आहे, त्या या इमारतीत सफाईकामगार म्हणून काम करत होत्या. त्या पिसवली टाटा नाका परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होत्या. मंजिराम यांचा मुलगा आणि मुलगी आहेत....
मुंबई पाऊस: विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे एअर इंडियाकडून प्रवाशांना संपूर्ण तिकीट परतावा
रविवारी सकाळी मुंबई विमानतळावर 36 उड्डाणे रद्द करण्यात आली आणि 15 उड्डाणे, ज्यात एअर इंडिया, इंडिगो आणि अकासा यासारख्या विमान कंपन्यांचे उड्डाणे समाविष्ट होतील, त्या मुख्यतः अहमदाबादकडे वळविण्यात आली. "अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या संपर्क केंद्राशी 011 69329333, 011 69329999 वर संपर्क साधा," असे सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पावसामुळे 36 उड्डाणे रद्द करण्यात आली. मुसळधार पावसामुळे विमानतळाच्या रनवे...









