महाराष्ट्र
पाकिस्तान बिथरलं! एअर स्ट्राईकनंतर सीमेवर मध्यरात्री अंदाधुंद गोळीबार; भारताने दिलं चोख प्रत्युत्तर
भारताने नुकत्याच केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. देशाच्या संरक्षणासाठी भारतीय लष्कराने उचललेले हे पाऊल निर्णायक ठरले असून, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमारेषेवर सतत आगळिक केली जात आहे. बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील करनाह सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने...
पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेती करणारा शेतकरी महत्वाचा- राज्यपाल आचार्य देवव्रत
पुणे – आपल्या देशात रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नैसर्गिक शेती हा प्रभावी पर्याय असून, पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला फॅमिली डॉक्टरपेक्षाही नैसर्गिक शेती करणारा शेतकरी अधिक गरजेचा ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. शिवाजीनगर येथील कृषि महाविद्यालयात आयोजित एक दिवसीय नैसर्गिक शेती परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते....
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालेतील १९९८-९९ बॅचचा स्नेहमेळावा आठवणींनी भरलेल्या वातावरणात उत्साहात संपन्न!
बोपोडी, पुणे | प्रतिनिधी :- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला, बोपोडी येथील सन १९९८-९९ बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल २६ वर्षांनंतर एका स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आणि शाळेच्या आठवणींनी भारलेले वातावरण पुन्हा एकदा अनुभवले गेले. ११ जून २०२५ रोजी पार पडलेल्या या खास कार्यक्रमात माजी विद्यार्थी, शिक्षक, गुरुजन आणि कर्मचारी यांचा सहभाग भावनांनी ओथंबलेला होता. स्वागतपर भाषणानंतर विद्यार्थ्यांनी एकेक करून आपल्या...
“मिशन परिवर्तन” उपक्रमाने बालकांना दिला स्वावलंबनाचा नवा मार्ग
पुणे, दि. २५: पुणे पोलिस आयुक्तालयाच्या "मिशन परिवर्तन - नवी दिशा, नवा प्रवास" या विशेष उपक्रमाच्या अंतर्गत फरासखाना पोलीस ठाण्यात आठ विधी संघर्षग्रस्त बालकांना स्वावलंबनाचा नवीन मार्ग दाखवण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत बालकांना जूट बॅग निर्मितीचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान बालकांनी आपल्या हाताने जूट बॅग तयार करत उत्कृष्ट कौशल्य दाखवले आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा संकल्प केला. उपक्रमाचे...
पावसाळ्यापूर्वी महापालिकेची युद्धपातळीवरील तयारी; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची नाले व नदीपात्रांची प्रत्यक्ष पाहणी
पिंपरी : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मान्सूनपूर्व तयारीला वेग दिला असून शहरातील संभाव्य पूरस्थिती, पाणी साचण्याच्या समस्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विविध नाले, नदीपात्रे आणि सखल भागांची प्रत्यक्ष पाहणी करत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करून पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण...
मुंबईत मुसळधार पावसाने थैमान; १२ तासांत १०० मिमी पावसाची नोंद, दुर्घटनांमध्ये १ जण ठार, ४ जखमी
मुंबई | १७ जून २०२५ :- मुंबईत सोमवारी मान्सूनने जोरदार पुनरागमन केलं असून, दिवसभरात शहरातील विविध भागांमध्ये जवळपास १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. या अवकाळी संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि भिंती कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. यामध्ये एक मजूर ठार, तर चार जण जखमी झाले आहेत. १२ तासांत १०० मिमी पाऊस; मुंबई जलमय भारतीय हवामान खात्याच्या (IMD) मते, कोलाबा आणि सांताक्रूझ...
बारामतीत विकासकामांना गती! सुशोभीकरण, तलाव संवर्धन आणि गार्डन प्रकल्पांचा आढावा
प्रशासनाचा भर दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांवर बारामती शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी महत्त्वाच्या विकासकामांचा आढावा घेतला गेला. या अंतर्गत तीन हत्ती चौक सुशोभीकरण, धारे साठवण तलावाच्या शेजारील सौंदर्यीकरण, कुस्ती महासंघाजवळील विकासकामे आणि कुस्ती महासंघ ते घारे साठवण तलाव दरम्यान कॅनॉल लगत होणाऱ्या लिनिअर गार्डनची पाहणी करण्यात आली. सुशोभीकरणाचे प्रकल्प – बारामतीत नवा आकर्षणबिंदू! बारामतीतील तीन हत्ती...
खंबीर श्रद्धेचा आणि भक्तीचा महासागर: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे भव्य स्वरूप
🔸 संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने डोंगररांगांमधून उलगडला भक्तीरसाचा प्रवाहपावसाच्या सरी, डोंगररांगा, हिरवाई आणि हजारो भक्तांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला… संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रवासाला डोंगराळ वाटांवरून अद्वितीय दृश्य लाभले. पंढरपूरकडे प्रस्थान करताना लाखो वारकऱ्यांनी भक्तिभावाने वाट चालली. ढोल-ताशांचा निनाद, टाळ-मृदुंगांचा ताल, आणि "ज्ञानोबा माऊली तुकाराम" चा जयघोष सर्वत्र निनादत होता. 🔸 वारकऱ्यांची गर्दी म्हणजे श्रद्धेचा महासागर डोंगर उतारांवरून तर सरळ...
“नेत्रदान हे श्रेष्ठ दान” – अशोक जोशी यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजासाठी दिला प्रेरणादायी संदेश!
खोपोली | ७ मे २०२५ :- “मरावे परी नेत्र रुपी उरावे” या विचाराला वास्तवात उतरवत खोपोलीतील अशोक जगन्नाथ जोशी (वय ८५) यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. समाजसेवेची जाणिव आणि सामाजिक बांधिलकी जपणारे अशोक जोशी यांचे ६ मे रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. नेत्रदानाची इच्छा – कुटुंबीयांचा उदात्त निर्णय स्वतःच्या मृत्यूनंतर देखील कुणाच्या तरी जीवनात...
मुंबईत हरित क्रांतीचा नवा टप्पा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेस्टच्या पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रीक बसगाड्यांचे लोकार्पण
मुंबई | संध्या. ४ वा. | २८ ऑक्टोबर २०२५ मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आज एक ऐतिहासिक क्षण घडला — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेस्ट उपक्रमाच्या नव्या पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. या बसगाड्या मुंबईकरांसाठी आरामदायक, प्रदूषणमुक्त आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव देणार आहेत. या प्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार...










