“पुरस्कार मिळो वा न मिळो, कला उत्सवातील प्रत्येक विद्यार्थी आज विजेता आहे” – राष्ट्रीय कला उत्सव २०२५ च्या समारोपात संजय कुमार यांचे प्रेरणादायी प्रतिपादन
पुणे | दि. २4 — राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कलेचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित करण्यात आले असून, त्याच धोरणाला अनुसरून आयोजित करण्यात आलेला ‘राष्ट्रीय कला उत्सव २०२५’ प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि प्रेरणा देणारा ठरला आहे, असे प्रतिपादन भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी केले. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे पार पडलेल्या समारोप...
विमानतळ प्रकल्पबाधित गावातील प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 24 : पुण्यात अनेक उद्योग येण्यास इच्छुक असून त्यासाठी पुरंदर विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. या विमानतळामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन मिळेल. हे केवळ प्रवासी विमानतळ नसून कार्गो विमानतळही असल्याने नाशवंत मालाच्या व्यापारासाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुरंदर व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) किमान दोन टक्क्यांची वाढ...
गुवाहाटी विमानतळाला नवे रूप! लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य नव्या टर्मिनलचे उद्घाटन
गुवाहाटी शहरासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभिमानास्पद ठरला आहे. लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अत्याधुनिक आणि भव्य नवीन टर्मिनल इमारत प्राप्त झाली असून, यामुळे आसामसह संपूर्ण ईशान्य भारताच्या हवाई संपर्काला नवे बळ मिळाले आहे. या नव्या टर्मिनलमुळे प्रवाशांच्या सुविधांमध्ये मोठी वाढ होणार असून, गुवाहाटीचे देश-विदेशाशी असलेले दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. नव्या टर्मिनलच्या उभारणीत अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल सुविधा आणि प्रवासी-केंद्रित...
अंजनगाव सुर्जी मतमोजणीत गैरप्रकाराचा आरोप; फेर मतमोजणीस नकार दिल्याने काँग्रेसचा आक्रमक पवित्रा
अंजनगाव सुर्जी येथे झालेल्या मतमोजणी प्रक्रियेत गंभीर घोळ झाल्याचा आरोप करत काँग्रेस उमेदवार आयशा बानो रशीदखान यांनी निवडणूक प्रशासनावर थेट बोट दाखवले आहे. मतमोजणीदरम्यान अनेक ठिकाणी संशयास्पद प्रकार घडल्याचा दावा करत, त्या ठिकाणी फेर मतमोजणी करण्यात यावी अशी स्पष्ट मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी ही मागणी धुडकावून लावल्याने वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने याप्रकरणी मतमोजणी...
संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत संगमनेर सेवा समितीचा ऐतिहासिक विजय; सौ. मैथिलीताई सत्यजित तांबे नगरअध्यक्षपदी दणदणीत निवड
संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांनी प्रचंड बहुमतासह ऐतिहासिक विजय मिळवत राजकीय वर्तुळात आपली ताकद सिद्ध केली आहे. या निवडणुकीत नगरअध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. मैथिलीताई सत्यजित तांबे यांनी सर्वाधिक मतांनी विजय संपादन करत जनतेचा विश्वास पुन्हा एकदा जिंकला आहे. त्यांच्या या दणदणीत विजयामुळे संगमनेर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेरच्या जनतेने माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या...
T20 World Cup 2026: टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व, गिल बाहेर, अक्षर पटेल उपकर्णधार
नवी दिल्ली | आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. आज (२० डिसेंबर) झालेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयने पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. या पत्रकार परिषदेला बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया,...
पुणे महापालिका निवडणुकीआधी राष्ट्रवादीला मोठा धक्का; NCP व NCP (SP) मधील दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पुणे | प्रतिनिधी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट – NCP SP) यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. दोन्ही पक्षांतील अनेक माजी नगरसेवक व प्रमुख नेत्यांनी भारतीय जनता पार्टीत (भाजप) जाहीर प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, राज्य आणि केंद्रात भाजप व राष्ट्रवादी हे मित्रपक्ष असले तरी पुणे महापालिका निवडणूक दोन्ही पक्ष स्वबळावर...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार – राजदूत विशाल शर्मा
मुंबई, दि.20 : पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोमध्ये स्थापित करण्यात आल्याने या घटनेला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरातील नागरिकांना डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची तसेच शिक्षण, मानवाधिकार आणि सामाजिक समतेच्या मूल्यांची ओळख करून देणे, हाच या उपक्रमाचा मुख्य...
महिला टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विश्वविजेत्या संघाचा गौरव
मुंबई | विशेष प्रतिनिधी भारताच्या दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेट संघाने जागतिक पातळीवर अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कामगिरी करत विश्वविजेतेपद पटकावले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संघातील खेळाडूंचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या या विशेष समारंभात देशाचा तिरंगा उंचावणाऱ्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी खेळाडूंना संबोधित करताना सांगितले की, दृष्टिबाधित महिला खेळाडूंनी...
वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना – पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
मुंबई, दि. 20 : महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाचा हंगामातील पहिला कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला आहे. कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरून हा कंटेनर रवाना करण्यात आला असून राज्यातील फळनिर्यातीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. अमेरिका - भारत कृषी-निर्यातविषयक घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर...





