मुंबईमध्ये आज संध्याकाळनंतर वादळी पावसाची शक्यता; आठवडाभर ढगाळ हवामान कायम राहणार!
मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, मुंबईत आज दुपारीपर्यंत उष्ण व दमट हवामान राहणार असून, संध्याकाळनंतर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या संपूर्ण आठवड्यात ढगाळ हवामान व हलक्याफारक्य पावसाच्या सरी मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहेत. आजचं हवामान : सकाळी उष्णता, संध्याकाळी गडगडाटासह पाऊस १२ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मुंबईत ३१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद...
महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्यात भव्य ध्वजारोहण समारंभ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना; १२ पथकांचा भव्य संचलन सोहळा संपन्न
आज ०१ मे २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्धतेने शिवाजीनगर येथील पोलीस संचलन मैदानावर साजरा करण्यात आला. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्र दिनाच्या ऐतिहासिक दिवशी विशेष गौरव या समारंभात पोलीस दल, गृहरक्षक दल, होमगार्ड, नागरी...
महाराष्ट्र भाजपाचे नवे अध्याय! श्री. रवींद्र चव्हाण यांची नूतन प्रदेशाध्यक्षपदी निवड — भाजप कडवटपणे संघटित होणार!
मुंबई : श्री. रवींद्र चव्हाण यांच्या नावाची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी अधिकृत घोषणा झाली असून, राज्याच्या राजकीय वर्तुळात ही बातमी मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात येत आहे. त्यांचं नाव जाहीर होताच विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामान्य कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांचं मत एकच — "रवींद्र चव्हाण यांचं नेतृत्व म्हणजे संयम, नियोजन, अनुभव आणि भाजपाच्या मूल्यांचा संगम." लोकप्रतिनिधी ते प्रदेशाध्यक्ष...
मुंबई विमानतळावर थरार! पावसामुळे रनवेवरून घसरले एअर इंडिया विमान; इंजिनाला मोठे नुकसान, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
मुंबई - कोचीहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडिया विमानाला आज सकाळी धावपट्टीवर उतरताना मोठा अपघात टळला. मुसळधार पावसामुळे रनवे ओला झाल्याने विमान घसरले आणि एका बाजूने थेट गवताळ भागात घुसले. यामुळे विमानाच्या उजव्या इंजिनाचे नॅसेल (बाह्य कवच) तुटले, तसेच रनवेवरील साईनबोर्ड आणि लाईटही तुटले. सुदैवाने, विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. दृश्यंनी उलगडली थरारक क्षणांची कहाणी विमानाच्या मागच्या भागाला गवत चिकटलेले...
भारत–पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा शुभारंभ; देशभक्तीचा दीपस्तंभ उभारण्याचा संकल्प
भारत–पाक सीमेवरील Poonch येथे उभारण्यात येणाऱ्या युगपुरुष Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या भव्य स्मारकाच्या विधीवत पूजन सोहळ्याचा आणि ग्रंथ दिंडीच्या शुभारंभाचा मान लाभल्याचा अभिमान व्यक्त करण्यात आला. सीमावर्ती भागात उभारले जाणारे हे स्मारक राष्ट्राभिमान, शौर्य आणि स्वराज्याच्या विचारांचे प्रतीक ठरणार आहे. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि दूरदृष्टीची आठवण करून दिली. “आज आपण आहोत, ते शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेमुळे,” ही...
“औंधमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत! RBI कॉलनी–सिंध सोसायटीला सतर्क राहण्याचे आवाहन; वनविभाग, RESQ टीम सतत गस्तीवर”
पुणे : औंध परिसरात रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने रहिवाशांमध्ये मोठी भीती आणि संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषतः RBI कॉलनी, सिंध सोसायटी आणि स्पायसर कॉलेज परिसरात या घटनेची सर्वाधिक चर्चा सुरू असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिबट्याचे दर्शन आणि वनविभागाची तातडीची धाव पहाटे बिबट्या पाहिल्याची माहिती मिळताच,✔️ पुणे वनविभाग✔️ RESQ CT टीम दोन्ही तात्काळ घटनास्थळी दाखल...
मंत्रालयात IAS अधिकाऱ्यावर हल्ला केल्याबद्दल माजी आमदार ओमप्रकाश काडू यांना ३ महिन्यांची शिक्षा, जामीन मंजूर.
मुंबई: मंत्रालय (मंत्रालय) येथे २०१८ मध्ये एका IAS अधिकाऱ्यावर हल्ला केल्याबद्दल विशेष MP-MLA न्यायालयाने माजी आमदार ओमप्रकाश काडू (बच्चू काडू) यांना ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून १०,००० रुपये दंड ठोठावला आहे. न्यायालयाने त्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ (सरकारी अधिकाऱ्याला काम करण्यापासून रोखणे) आणि ५०६ (फौजदारी धमकी) अंतर्गत दोषी ठरवले आहे. मात्र, हा निर्णय उच्च न्यायालयात आव्हाल करण्यासाठी स्थगित करण्यात आला असून काडू यांना जामीनही...
मुंबईत भारत-चीन सहकार्याला चालना; चीनचे वाणिज्यदूत किन जी यांची महापौर रितू तावडे यांना सदिच्छा भेट
मुंबई : चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत श्री. किन जी यांनी आज Municipal Corporation of Greater Mumbai मुख्यालयातील महापौर दालनात मुंबईच्या महापौर Ritu Tawde यांची सदिच्छा भेट घेतली. महापौरपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांनी रितू तावडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान भारत-चीन तसेच मुंबई आणि चीनमधील प्रमुख शहरांदरम्यान द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. सांस्कृतिक देवाणघेवाण, व्यापार-उद्योग,...
वाघोली पोलिसांची कारवाई – दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ४.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त!
पुणे | २२ जुलै २०२५ – पुणे शहरातील वाघोली व हडपसर परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी करून नागरिकांचे दागदागिने लांबवणाऱ्या सराईत आरोपींच्या टोळीचा वाघोली पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली असून ४ लाख ३३ हजार २२६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून अचूक कारवाई मा. वरिष्ठांच्या सूचनांनुसार सुरू असलेल्या गुन्हा...
चिंचवडमध्ये राहुल काळाटे यांचा जल्लोषी बाईक रॅलीतून परिवर्तनाचा निर्धार; तरुणाईतून अभूतपूर्व प्रतिसाद.
चिंचवड – महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल काळाटे यांच्या प्रचारासाठी चिंचवड मतदारसंघात आयोजिलेल्या भव्य बाईक रॅलीत तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली साकारलेल्या या रॅलीत संगीवी, राहाटणी, पिंपरी गुरव, पिंपरी सौदागर, काळेवाडी या ठिकाणांसह अनेक भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्फूर्तीने भारलेल्या घोषणा संगवी, राहाटणी परिसरातील रस्त्यावरून जाताना घोषणांचा गजर ऐकू येत होता. "रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी"...









