महाराष्ट्र
“विठ्ठल भेटीसाठी तुकोबारायांची पालखी निघाली पंढरीच्या दिशेने; देहू नगरीतून टाळ मृदंगाच्या निनादात भव्य प्रस्थान सोहळा संपन्न”
देहू | पुणे – भक्तीरसात न्हालेली देहूनगरी, टाळ-मृदंगाच्या निनादाने गजरलेली गल्लीबोळं, आणि "ज्ञानोबा-तुकोबा"चा अखंड जयघोष करत लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे साक्षीदार ठरले. जगद्गुरू तुकोबारायांची पालखी आज विठुरायाच्या भेटीसाठी देहूनगरीहून पंढरपूरकडे निघाली. देवेंद्र फडणवीस आणि अण्णा शेलके यांच्या उपस्थितीत, मोठ्या भक्तिभावाने पालखीचे विधीवत पूजन करण्यात आले. या सोहळ्यात वारकऱ्यांसह वरुणराजानेही हजेरी लावली, त्यामुळे वातावरण अधिकच...
२४ तासांत खुनाचा उलगडा | आंबेगाव पोलिसांची गतीमान कारवाई -“जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून; आरोपी २४ तासांत इंदौरहून अटकेत!”
पुणे | आंबेगाव पोलीस स्टेशन – पुणे शहरात एका तरुणाचा थरारक खून करून पसार झालेल्या आरोपीला अवघ्या २४ तासांत शोधून काढत आंबेगाव पोलिसांनी एक उदाहरणीय कामगिरी बजावली आहे. आरोपी इंदौर (मध्यप्रदेश) येथे पळून गेला होता. मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईने तो अखेर गुन्ह्यातील कबुली देत गजाआड गेला. दिनांक १४ जून २०२५ रोजी, जांभुळवाडी तलावाच्या बांधावर, एक तरुण मृतावस्थेत आढळला. याबाबत गोपनीय...
पुण्यात धक्कादायक अपहरण व खंडणी प्रकरण उघडकीस | वाघोली पोलिसांची शिताफिने कामगिरी
पुणे | वाघोली पोलीस स्टेशन – पुणे शहरात खळबळ उडवणाऱ्या एका अपहरण आणि खंडणी प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावत वाघोली पोलिसांनी शिताफिने चार सराईत आरोपींना जेरबंद केले. अपहरण करून १५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत अपहृत व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दिनांक १५ जून २०२५ रोजी, फिर्यादीचे चुलत भाऊ वाघोली पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी कळवले...
“१५० पेक्षा जास्त घरफोड्यांमध्ये गुंतलेल्या अट्टल चोरास कोंढवा पोलिसांनी अटक; ३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त”-पुण्यातील घरफोड्यांना चाप! ‘कोंढवा पोलीस स्टेशन’ची मोठी कारवाई
पुणे | कोंढवा – पुणे शहर व उपनगरात अनेक महिन्यांपासून घरफोड्यांच्या घटनांनी नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं. मात्र, कोंढवा पोलिसांनी केलेल्या तडाखेबंद कारवाईमुळे या मालमत्तेवर डोळा ठेवणाऱ्या चोरट्यांचा खेळ खलास झाला आहे. तब्बल १५० पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे ज्याच्यावर नोंदले गेले आहेत, अशा अट्टल चोर अर्जुनसिंग रजपूतसिंग दुधानी (वय ४७, रा. मांजरीगाव, हडपसर) याला कोंढवा पोलिसांनी अटक...
“कात्रज घाटात खुनाचा कट उधळला! ‘कॉप्स २४’ पथकाची वेगवान कारवाई; तीनजणांकडून तीन पिस्टल, ९ जिवंत काडतुसे जप्त”
पुणे | कात्रज : पुणे शहरातील गुन्हेगारीवर वचक ठेवणाऱ्या ‘कॉप्स २४’ या विशेष पथकाने एक मोठी कामगिरी पार पाडली आहे. खुनाचा कट रचण्यासाठी थांबलेल्या तिघांना अटक करून त्यांच्याकडून गावठी बनावटीचे तीन पिस्तुलं, नऊ जिवंत काडतुसे आणि दोन मॅगझिन्स असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दि. १५ जून २०२५ रोजी कात्रज परिसरात करण्यात आली. कॉप्स २४ पथकातील पोलीस...
“फ्रान्सच्या बाहेर प्रथमच नागपूरमध्ये बनणार ‘फाल्कन 2000’ जेट्स; महाराष्ट्राच्या एरोस्पेस इतिहासात सुवर्णक्षण!”
नागपूर | महाराष्ट्र : नागपूरच्या जमिनीवर भारताच्या आणि महाराष्ट्राच्या एरोस्पेस इतिहासातील एक ऐतिहासिक टप्पा पार पडला आहे. फ्रान्सस्थित जगप्रसिद्ध डसॉल्ट एव्हिएशन (Dassault Aviation) आणि रिलायन्स एअरस्ट्रक्चर (Reliance Aerostructure) यांनी एक ऐतिहासिक करार करत 'फाल्कन 2000' (Falcon 2000) हे प्रगत व्यवसायिक जेट विमान महाराष्ट्रात तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्र आता अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि ब्राझील यांसारख्या प्रगत राष्ट्रांच्या...
मुंबईत मोठा आर्थिक घोटाळा! कोकण रेल्वे पतसंस्थेच्या माजी अध्यक्षाचा ₹2.40 कोटींच्या बनावट कर्ज प्रकरणात अटकेसाठी EOW ची कारवाई
मुंबई | १८ जून २०२५ – मुंबई पोलिसांच्या इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग (EOW) ने कोकण रेल्वे विभाग (शहरी) सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष अभिजीत देशमुख यांना अटक केली आहे. त्यांनी बनावट कर्मचारी व खोट्या कागदपत्रांच्या आधारे ₹२.४० कोटींचे कर्ज मंजूर करून संस्थेला फसवले असल्याचा आरोप आहे. तब्बल महिनाभर फरार; अखेर हिंगोलीतून अटक देशमुख हे २०२० ते २०२३ या काळात पतसंस्थेचे अध्यक्ष होते. FIR...
मुंबई फसवणूक प्रकरण! गिरगावच्या ७३ वर्षीय गुंतवणूकदाराची २६.५४ कोटींची फसवणूक; रिअल इस्टेट कंपनीच्या तिघा संचालकांवर गुन्हा दाखल
मुंबई | १८ जून २०२५ – आर्थिक फसवणुकीच्या एका धक्कादायक प्रकरणात, गिरगावचे ७३ वर्षीय रहिवासी चुन्नीलाल वर्धीचंद शाह यांची तब्बल ₹२६.५४ कोटींची फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ही फसवणूक शमिक एंटरप्रायझेस लिमिटेड या रिअल इस्टेट कंपनीने केली असून, हिरेणी व्हिला प्रकल्पात फ्लॅट देण्याच्या अमिषाने ही रक्कम घेतली गेली. कंपनीचे तिघे संचालक आरोपी हर्ष सकालचंद हिरानी, सुरेश प्रतापचंद हिरानी आणि...
इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; सर्व धोकादायक रचनांची सात दिवसांत तपासणी करण्याचे आदेश!
पुणे | १८ जून २०२५ – मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी तातडीने बैठकीचे आयोजन करून जिल्ह्यातील सर्व पूल, रस्ते, वाडे, धोकादायक इमारती, रेल्वे पूल, फलक व इतर सार्वजनिक संरचना यांची structural audit करण्याचे आदेश दिले. या दुर्घटनेत किमान चार नागरिकांचा मृत्यू झाला असून...
आषाढी वारी २०२५ | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे औपचारिक निमंत्रण – शासकीय महापूजेसाठी तयारीला जोर
मुंबई | १७ जून २०२५ – भक्तिभावाने ओतप्रोत असलेल्या आषाढी वारीचा मुख्य सोहळा म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पार पडते. यंदा ही महापूजा रविवार, ६ जुलै २०२५ रोजी पहाटे २.२० वाजता साकारणार असून, ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न होणार आहे. या शासकीय महापूजेचे औपचारिक निमंत्रण श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री...





