महाराष्ट्र
पुणेकरांना मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट! लोणावळा मार्गावर तिसरी-चौथी मार्गिका व मेट्रो प्रकल्पांना मंजुरी
पुणे – राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर या शहरांना आधुनिक वाहतूक व्यवस्थेची नवी दिशा मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “शहरांच्या वाढत्या लोकसंख्येला आणि प्रवासी ताणाला उत्तर देण्यासाठी हे प्रकल्प महत्वाचे ठरणार आहेत.” पुणेकरांसाठी तर या बैठकीत मोठे गिफ्ट...
महाराष्ट्रात ‘लाडकी बहिण’ लाभार्थींना मोफत एलपीजी योजना विस्तारित; खर्च चारपट वाढून ₹3,200 कोटींवर.
मुंबई: महायुती सरकारने 'मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना'चा विस्तार करून 'लाडकी बहिन योजना'च्या लाभार्थींनाही यामध्ये समाविष्ट केले आहे, ज्यामुळे लाभार्थींची संख्या तिप्पट होणार असून योजनेचा खर्च देखील लक्षणीयरीत्या वाढणार आहे. आता या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजना आणि लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थी असलेल्या अनेक गरीब महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहेत. गॅस सिलिंडर खरेदी केल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात...
खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल जप्त, संभाव्य खून कट उधळला
पुणे : Pune Police च्या गुन्हे शाखेअंतर्गत कार्यरत खंडणी विरोधी पथक १ ने वेळीच केलेल्या धाडसी कारवाईत एका सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल जप्त करून संभाव्य खुनाचा कट उधळला आहे. या कारवाईमुळे पुणे शहरात मोठा रक्तपात टळला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलिसांना यश आले आहे. दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी खंडणी विरोधी पथक १ चे अधिकारी व अंमलदार विना...
समर्थ पोलिसांची दिवाळीपूर्व कामगिरी! घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबंद – सोन्याचे दागिने आणि रोकड हस्तगत
पुणे – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा दक्षतेचा परिचय देत समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केवळ २४ तासांच्या आत सराईत चोरट्याला अटक करून चोरी गेलेला सोन्याचा व रोकडीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. ही घटना १८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता घडली. फिर्यादी दिवाळीच्या पूजेच्या तयारीसाठी घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि...
दहीहंडी उत्सवात अंमली पदार्थ विरोधी जागृतीचा अनोखा उपक्रम!
पुणे : पारंपरिक दहीहंडी उत्सव साजरा करताना पुणे शहर पोलिसांनी एक आगळावेगळा आणि समाजहिताचा उपक्रम राबवला. हडपसर पोलिस स्टेशनच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे औचित्य साधून अंमली पदार्थ विरोधी जागृती मोहीम राबवण्यात आली. पोलिसांच्या या उपक्रमामुळे समाजात विशेषतः तरुणाईमध्ये एक सकारात्मक संदेश पोहोचला. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार १३ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान...
‘आदर्श आणि समृद्ध गाव’ संकल्पपुर्तीतून राज्य व राष्ट्राच्या विकासाला नवा वेग
पुणे : महाराष्ट्रात ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी सरकारकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘आदर्श आणि समृद्ध गाव’ हा संकल्प, ज्याच्या पूर्तीतून केवळ राज्याचाच नाही तर संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. गाव हे देशाचे मूलभूत घटक असून, प्रत्येक गाव विकसित झाल्यासच देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. शाश्वत शेती,...
ठाण्यातील हादरवणारी घटना: तीन वर्षीय पुतणीची हत्या, नातेवाईकांकडून मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत उलगसनगरमध्ये फेकला; आरोपीला अटक.
ठाणे: पुतणीच्या अनवधानाने झालेल्या मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; नातेवाईक अटकेत उल्हासनगरमधील प्रेमनगर टेकडी परिसरात एका तीन वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणात मुलीच्या मामाला अटक केली असून, त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र, त्याने हा प्रकार अनवधानाने घडल्याचा दावा केला आहे. मुलीचे बेपत्ता होणे आणि मृतदेहाचा शोध: नोव्हेंबर 18 रोजी मुलीच्या आईने, जी...
भारताचे अर्थक्रांतीचे शिल्पकार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन; देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर.
नवी दिल्ली – भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार आणि दोन वेळा देशाचे पंतप्रधान राहिलेले डॉ. मनमोहन सिंग (वय ९२) यांचे दीर्घ आजारानंतर गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. डॉ. सिंग यांच्या निधनाने देशात शोककळा डॉ. सिंग यांना गुरुवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी बेशुद्ध झाल्यानंतर...
“कबुतरखाना निमित्तमात्र… मूळ उद्देश समाजाची ताकद दाखवण्याचा! – मुंबईत मराठी अस्मितेवर घाला?”
मुंबईतील ऐतिहासिक कबुतरखाना परिसर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या घडत असलेल्या घटनांवर नजर टाकल्यास स्पष्ट होते की, कबुतरखाना हा फक्त निमित्त आहे. यामागील मूळ उद्देश काही विशिष्ट समाजांनी आपली संख्या, संघटना आणि ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणे आहे. ही केवळ धार्मिक वा सांस्कृतिक घडामोड नसून, ही एक ठरवून आखलेली रणनीती आहे – जिच्या माध्यमातून मुंबईसारख्या महानगरावर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न...
“बनावट दागिन्यांच्या साहाय्याने लाखोंची फसवणूक — विमानतळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराफ व्यावसायिकांना लुबाडणारा भामटा अखेर जेरबंद”
पुणे : नामांकित सराफ दुकानदारांना लक्ष्य करून बनावट दागिन्यांच्या सहाय्याने फसवणूक करणाऱ्या हुषार भामट्याला पुणे विमानतळ पोलिसांनी अखेर पकडले आहे. दीर्घकाळापासून ज्वेलरी शॉप्सना चकवणारा हा आरोपी विविध शाखांमध्ये हातचलाखीने खऱ्या सोन्याच्या अंगठ्या लंपास करून गायब होत असे. अखेर पोलिसांच्या सततच्या तपासामुळे हा गुन्हेगारी प्रकार उघडकीस आला. घटना कशी घडली? २३ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी पी.एन.जी. ज्वेलर्स, विमाननगर शाखेत एक ग्राहक अंगठ्या...










