Breaking News
प्रामाणिकपणाचा झळाळता दीपस्तंभ! – अनिल सोनवणे यांनी सापडलेली ५० हजारांची सोन्याची अंगठी केली प्रामाणिकपणे सुपूर्त; सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव
शिरूर, पुणे | आजच्या भौतिकवादी युगात स्वार्थी वृत्तीने ग्रासलेल्या समाजात, प्रामाणिकतेचा उजळ व अनुकरणीय आदर्श निर्माण करणारी घटना घडली आहे. शिरूर तालुक्यातील बो-हाडे मळा येथील 'हॉटेल वैभव'चे मालक अनिल सोनवणे यांनी सापडलेली ५० हजार रुपयांची सोन्याची अंगठी आणि महत्वाची कागदपत्रे संबंधित व्यक्तीकडे पोलीसांच्या उपस्थितीत सुपूर्त केली. या प्रामाणिकपणाच्या उदाहरणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाकिट सापडल्यापासून सुपूर्त होईपर्यंतची घटना घटना काही दिवसांपूर्वीची. हॉटेल...
पुणे पोलिस दलात मोठी बदलवाढ: संदीपसिंह गिल पुणे ग्रामीणचे नवे पोलिस अधीक्षक, पंकज देशमुख यांची पदोन्नती!
पुणे | १७ मे २०२५ :- पुणे पोलिस दलात महत्त्वाची बदलवाढ करण्यात आली असून, शहरातील परिमंडळ एक चे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांची पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक (SP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सध्याचे पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची पदोन्नती करत पुणे शहर पोलीस दलात अतिरिक्त पोलिस आयुक्त (Addl. CP) म्हणून बदली करण्यात आली आहे. संदीपसिंग गिल...
पुणे आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात एनआयएला मोठं यश! इंडोनेशियातून परत येताना दोन अतिरेक्यांना मुंबई विमानतळावर अटक, देशविरोधी कटाचे मोठे धक्कादायक खुलासे
पुणे | पुण्यातील गाजलेल्या आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) मोठं यश मिळालं आहे. २०२३ पासून फरार असलेल्या आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या दोन संशयितांना इंडोनेशियातून परत येताना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबईच्या टर्मिनल-२ आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली. अटक केलेले संशयित कोण? अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावं अब्दुल्ला फैज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा लियाकत खान...
मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार एन्ट्री! पुढील ५ दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, चाकरमान्यांची तारांबळ
मुंबई | मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपली! आज सकाळपासूनच मुंबई शहर आणि उपनगरात रिमझिम पावसाने हजेरी लावली असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. हवामान खात्याचा पाऊसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पुढील काही तासांमध्ये कोसळणार आहे. यासोबतच वादळी वाऱ्यांचा इशाराही दिला असून,...
वाशी, नवी मुंबईत शिवसेना युवा सेनेच्या ‘विजय संवाद मेळावा’ला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद
वाशी, नवी मुंबई | नवी मुंबईतील वाशी येथे आज पार पडलेल्या शिवसेना युवा सेनेच्या 'विजय संवाद मेळावा' या भव्य आयोजनास उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात तरुणांनी दाखवलेला उत्साह, आत्मविश्वास आणि पक्षनिष्ठा पाहता नवी मुंबईतील तरुण पिढी शिवसेनेच्या विचाराशी निष्ठावान असून संघटना बळकट करण्याची ताकद त्यांच्या अंगी असल्याचे स्पष्ट झाले. मार्गदर्शनात ठाम मुद्दे मांडले गेले या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पुढील...
इंद्रायणी नदीपात्रातील अतिक्रमणावर महापालिकेचा – चिखलीतील २९ अनधिकृत बंगल्यांवर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने कारवाई सुरू
चिखली | १७ मे २०२५ :- पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात इंद्रायणी नदीपात्रात भराव टाकून उभारलेले २९ अनधिकृत बंगले आज पहाटेपासून महापालिकेच्या कारवाईने उद्ध्वस्त होऊ लागले आहेत. सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवाद (NGT) यांच्या स्पष्ट आदेशानंतर अखेर पिंपरी-चिंचवड महापालिकेला कारवाई करावी लागली. पहाटेपासून १० मशीनसह कारवाईला सुरुवात आज (दि. १७) पहाटेपासून महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक १० जेसीबी आणि पोकलनसह या बेकायदेशीर...
“नीरज चोप्राने केली ९० मीटरच्या पलीकडची झेप!” डोहा डायमंड लीगमध्ये ९०.२३ मीटर भालाफेक करत इतिहास रचला – वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी
डोहा | भारताचा सुवर्णवीर आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा याने अखेर भालाफेकीतील ९० मीटरचा टप्पा पार करत नवा इतिहास रचला आहे. डोहा येथे झालेल्या डायमंड लीग २०२५ स्पर्धेत त्याने तब्बल ९०.२३ मीटरची भालाफेक करत आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ९० मीटर क्लबमध्ये प्रवेश करणारा भारताचा पहिला अॅथलीट ठरला. स्वप्नवत कामगिरी! भारताच्या अॅथलेटिक्स इतिहासात सुवर्णाक्षरात नोंद नीरज चोप्रा याने यापूर्वी...
“सस्पेंड करा असं मी म्हणणार नाही, कारण मी स्वतः करून चुकलोय!” – सरकारी यंत्रणांच्या कठोर नियमांविरोधात सामान्य नागरिकाची आर्त हाक
एका सामान्य नागरिकाने सोशल मिडियावर व्यक्त केलेली भावना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. “असे अधिकारी व कर्मचारी सस्पेंड केले पाहिजे, असं मी नाही म्हणणार कारण मी स्वतः हे करून चुकलो आहे आणि नेहमी करणार, कारण नियम आणि कायदेच इतके आहेत की काहीही केलं तरी दंड होणारच...” अशा आशयाची पोस्ट एका तरुणाने टाकली असून त्यातून त्याची व्यथा स्पष्टपणे समोर येते. या...
कार्ला लेणी येथे २५६९ व्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘महाबुद्धवंदना’ भव्य आणि भाविकांच्या उपस्थितीत संपन्न – अहिंसा, शांती व करुणेचा संदेश पुन्हा जागवला
मावळ, पुणे – बुद्ध पौर्णिमेच्या पावन दिवशी कार्ला लेणी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दिव्य अशा ‘महाबुद्धवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २५६९ व्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त हजारो भाविक, उपासक-उपासिका, भिक्खू संघ व स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत शांततेचे, अहिंसेचे आणि करुणेचे व्रत पुन्हा जागृत झाले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे आदरणीय भंते धम्मानंद यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेली धम्मदेसना व सुत्तपठण. यामध्ये ३० श्रामणेर...
“वयस्कांचा सन्मान आणि संवेदना हाच आपल्या संस्कृतीचा आधार” – मुख्यमंत्री फडणवीस यांचे भावनिक प्रतिपादन, मिलन वृद्धाश्रमाचे उद्घाटन सोहळा संपन्न
रत्नागिरी :- भारतीय समाजातील पारंपरिक कौटुंबिक मूल्यांचा परिपाठ अधोगतीला लागल्याने वृद्ध नागरिकांसाठी सुरक्षित, सुसज्ज आणि स्नेहपूर्ण वातावरणाची गरज अधिक तीव्र झाली आहे. अशा काळात मंडणगड तालुक्यातील टाकेडे येथे "मिलन वृद्धाश्रम" या नाविन्यपूर्ण आणि निसर्गरम्य वृद्धाश्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. "वृद्धाश्रम नव्हे तर सन्मानगृह" – डॉ. जलिल पारकर यांच्या संकल्पनेला मुख्यमंत्री फडणवीस यांचा सलाम मुख्यमंत्री म्हणाले, “डॉ. जलिल...





