Breaking News
नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द खरा
नांदेडच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी विधानसभेत नांदेडमध्ये तब्बल ४ हजार २५० कोटी रुपयांचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. या प्रकल्पामुळे Nanded जिल्ह्याच्या विकासाला नवे बळ मिळणार असून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी नांदेडकरांना दिलेला शब्द पुन्हा...
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर उभं शहर पुन्हा सुवर्णकाळाकडे; राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचारमुक्त विकासाचा निर्धार
पिंपरी-चिंचवड हे शहर शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर, जात-धर्माच्या पलीकडे जाऊन, धर्मनिरपेक्ष मूल्यांवर उभं राहिलं आहे. गेल्या २५ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसवर एकही भ्रष्टाचाराचा ठोस आरोप सिद्ध झालेला नाही. उलट, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना (JNNURM) यांसारख्या महत्त्वाच्या योजनांतून हजारो कोटी रुपयांचा निधी शहरासाठी आणून पिंपरी-चिंचवडला आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेची ओळख मिळवून देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोलाचा वाटा आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक...
पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा ‘500 Emails to FDA’ एल्गार; निकृष्ट अन्न, अस्वच्छता आणि प्रशासनाविरोधात संताप
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) परिसरातील मेस आणि कँटीनमधील कथित निकृष्ट अन्न, अस्वच्छता आणि गैरव्यवस्थापनाविरोधात विद्यार्थ्यांचा संताप आता उफाळून आला आहे. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने ‘500 Emails to FDA’ या विशेष मोहिमेची घोषणा केली असून, कॅम्पसमधील अन्नाच्या गुणवत्तेची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) सामूहिक तक्रारी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या...
पनवेलकरांना दिलासा! महापालिकेकडून ‘अभय योजना’ जाहीर – करदात्यांना ९०% पर्यंत शास्तीमाफीचा लाभ
पनवेल महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पनवेल महापालिकेने मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांसाठी "अभय योजना" जाहीर केली असून, या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना २५ ते ९० टक्क्यांपर्यंत शास्तीमाफी (दंडमाफी) दिली जाणार आहे. ही योजना चार टप्प्यांत राबवली जाणार असून, १८ जुलै ते १५ ऑगस्ट २०२५ या पहिल्या टप्प्यात कर भरल्यास नागरिकांना थकबाकीवरील शास्तीवर ९०% सूट मिळणार...
घटनात्मक संघर्षाच्या उंबरठ्यावर देश: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून राज्यपालांच्या अधिकारांवर सर्वोच्च न्यायालयाला १४ प्रश्नांची सरबत्ती.
नवी दिल्ली : देशातील घटनात्मक व्यवस्थेच्या मूलभूत रचनेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्य विधेयकांवरील राज्यपाल व राष्ट्रपतींच्या अधिकारांबाबत १४ महत्त्वाचे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या दरबारात पाठवले आहेत. हे अत्यंत दुर्लभ अशा संविधानिक अधिकारांचा वापर करत, अनुच्छेद 143(1) अंतर्गत करण्यात आले आहे. ही कारवाई तामिळनाडू राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार प्रकरणातील 8 एप्रिलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आली असून, त्या...
चारचाकीने फिरून घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!
पुणे शहरातील हडपसर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण तपास करत घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ₹३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सोन्याचे दागिने, रोख रक्कम, चारचाकी आणि मोटारसायकल असा मोठा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीने नक्की नियोजन करून, बनावट नंबर प्लेटसह वाहन वापरून घरफोड्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. घटनाक्रम: दि. १४ जून २०२५...
“सरकारचा अध्यादेश अपुरा; घात झाला तर पुन्हा आंदोलन!” मराठा आंदोलकांचा इशारा – पाया घातलाय, इमारत होणारच
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने जाहीर केलेल्या नव्या अध्यादेशानंतर पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. सरकारच्या या निर्णयावर मराठा आंदोलकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली असून त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “घात झाला तर पुन्हा आंदोलन छेडले जाईल.” आंदोलकांनी सांगितले की, सरकारने दिलेला अध्यादेश हा फक्त सुरुवात आहे. “पाया घातलाय, आता इमारत उभी राहिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे म्हटले आहे....
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक मोर्चा किल्ले शिवनेरीवरून मुंबईकडे रवाना!
(पुणे) : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गुरुवारी, 28 ऑगस्ट 2025 रोजी मोठे ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले. किल्ले शिवनेरी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीवरून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. किल्ल्याच्या पायथ्याशी जमलेल्या हजारो नागरिकांनी "जय शिवराय" आणि "आरक्षण आमचा जन्मसिद्ध हक्क आहे" अशा घोषणांनी वातावरण भारावून टाकले. हा मोर्चा नारायणगाव, मंचर, खेड, चाकण, तळेगाव आणि लोणावळा या महत्त्वाच्या...
भाजपा शहर निवडणुकीची कमान आता आमदार अमित गोरखे यांच्या हाती..!
पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समितीच्या संयोजक पदी आमदार अमित गोरखे तर सहसंयोजक म्हणून मोरेश्वर शेडगे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्शभूमीवर निवडणूक कालखंडात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविणे तसेच उमेदवारांच्या मुलाखती त्यासाठी उमेदवार चयन करणे व निवडणूक प्रचार यंत्रणा कार्यान्वित करणे यासाठी जिल्हा निवडणूक संचालन समितीची भूमिका अत्यंत महत्वाची असते. राजकीय व संघटनात्मक दृष्ट्या अशा...
अजितदादांच्या गटातील आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी; “दोन दिवसांत संपवीन” असा थेट इशारा, राजकीय वर्तुळात खळबळ
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांना थेट "दोन दिवसांत संपवीन" अशी जीवघेणी धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही धमकी संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे आली असून, त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संग्राम जगताप हे सध्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे चर्चेत आहेत. त्यांनी घेतलेल्या भूमिकांवर पक्षांतर्गत मतभेद...








