Home Breaking News मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; साखरपुड्यासाठी निघालेल्या 11 जणांचा मृत्यू, 20 जखमी
ही भीषण दुर्घटना पालघर जिल्ह्यातील दहाणू तालुक्यातील धानीवारी गावाजवळ सोमवारी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पोमध्ये 50 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. हे सर्वजण बापुगाव खडकीपाडा येथील बालाराम जयराम दांडेकर यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनर ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली.