नवी दिल्ली
“आई-वडिलांना चांगले आयुष्य देण्याचा प्रयत्न तिच्या मृत्यूच्या शिक्षेत संपला!” – केरळच्या नर्स निमिषा प्रिया यांना १६ जुलै रोजी यमनमध्ये होणार फाशी
नवी दिल्ली – केवळ आपल्या आई-वडिलांना चांगले जीवन देता यावे म्हणून केरळमधून परदेशात गेलेल्या एका नर्सचे स्वप्न आज मृत्यूच्या छायेखाली आले आहे. केरलच्या पलक्कड येथील रहिवासी आणि पेशाने नर्स असलेल्या निमिषा प्रिया यांना यमनमधील एका स्थानिक नागरिकाच्या खुनाच्या आरोपाखाली १६ जुलै २०२५ रोजी फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. या प्रकरणात मानवाधिकार कार्यकर्ते सॅम्युअल जेरोम यांनी यमनमधील तुरुंग अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार...
संपादकीय विशेष | समुद्रसत्ता आणि ‘चोकिंग पॉईंट्स’ : नवे युद्धपट व सामरिक नितीचे बदलते संकेत
नवी दिल्ली | २७ मे २०२५ समुद्र म्हणजे केवळ निळा विस्तार नव्हे, तर आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेचा मेरुदंड आहे. जागतिक व्यापारातील सुमारे ८० टक्के वाटा समुद्रमार्गे वाहत असताना, या मार्गांवरील नियंत्रण हा केवळ व्यापाराचा मुद्दा नसून सामरिक प्रभुत्वाचा मूलभूत विषय ठरतो आहे. आज जागतिक धोरणांची केंद्रबिंदू ठरत असलेली ‘चोकिंग पॉईंट्स’ ही संकल्पना नव्या युद्धनीतीचा कणा बनली आहे. ‘चोकिंग पॉईंट्स’ म्हणजे काय?...
पाकिस्तानचा बुरखा फाटणार! श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात भारताचं पहिलं शिष्टमंडळ UAE दौऱ्यावर रवाना – आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘सिंदूर’चा मुद्दा गाजणार!
नवी दिल्ली | भारताच्या राजनैतिक व्यासपीठावरून आज एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलं आहे. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भारताचं पहिलं शिष्टमंडळ आज संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्यावर रवाना झालं. या शिष्टमंडळाच्या दौऱ्यामुळे पाकिस्तानचे खोटेपणाचे बुरखे फाटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विविध देशांचा दौरा – जागतिक स्तरावर भारताची भक्कम भूमिका या शिष्टमंडळामध्ये बासुरी स्वराज, ई.टी. मोहम्मद बशीर, अतुल गर्ग,...
‘ट्रॅव्हल विथ जो’ युट्यूब चॅनलची महिला ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना अटक!
नवी दिल्ली | हरियाणातील हिसार पोलिसांनी एक मोठी गुप्तचर कारवाई करत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रा या महिला युट्यूबरला अटक केली आहे. ‘ट्रॅव्हल विथ जो’ नावाचे युट्यूब चॅनल चालवणाऱ्या ज्योतीवर भारताच्या लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा गंभीर आरोप आहे.याच प्रकरणात आणखी ५ संशयितांना पंजाब व हरियाणामधून अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले...
घटनात्मक संघर्षाच्या उंबरठ्यावर देश: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून राज्यपालांच्या अधिकारांवर सर्वोच्च न्यायालयाला १४ प्रश्नांची सरबत्ती.
नवी दिल्ली : देशातील घटनात्मक व्यवस्थेच्या मूलभूत रचनेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्य विधेयकांवरील राज्यपाल व राष्ट्रपतींच्या अधिकारांबाबत १४ महत्त्वाचे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या दरबारात पाठवले आहेत. हे अत्यंत दुर्लभ अशा संविधानिक अधिकारांचा वापर करत, अनुच्छेद 143(1) अंतर्गत करण्यात आले आहे. ही कारवाई तामिळनाडू राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार प्रकरणातील 8 एप्रिलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आली असून, त्या...
“शस्त्रसंधीनंतर भारताचा स्पष्ट इशारा : ‘खबरदार, हल्ला केलात तर परिणाम भोगावाच लागेल’ – संरक्षण मंत्रालयाचा पाकिस्तानला इशारा”
नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतरही पाकिस्तानकडून चुकीची माहिती पसरवण्याचे सत्र सुरूच आहे. याच संदर्भात संरक्षण मंत्रालयाच्या वतीने एका महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांना प्रत्युत्तर देण्यात आले. या पत्रकार परिषदेला कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह, तसेच कमांडर रघू नायर हे उपस्थित होते. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी पाकिस्तानच्या लष्कराकडून करण्यात...
ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात अलर्ट जारी; श्रीनगरसह ९ प्रमुख विमानतळे तात्पुरती बंद!
नवी दिल्ली | दिनांक – ७ मे २०२५ :- भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर भारतभरात उच्चस्तरीय सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्याचा सूड उगवत भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीड वाजता ९ ठिकाणी स्ट्राईक करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या ऐतिहासिक आणि निर्णायक कृतीनंतर भारतात सुरक्षा यंत्रणा तात्काळ 'अलर्ट मोड'वर ठेवण्यात आल्या...
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; भारताचा ठाम आणि निर्णायक बदला!
नवी दिल्ली | दिनांक – ७ मे २०२५ पहलगाम हल्ल्याचा सर्जिकल प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने इतिहासात अढळ ठसा उमटवणारी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ या गुप्तनामाअंतर्गत भारताने मध्यरात्री पाकिस्तानातील नऊ प्रमुख दहशतवादी तळांवर एकत्रितपणे २४ हवाई हल्ले करत ही ठिकाणे नष्ट केली. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांच्या अड्ड्यांवर ही कारवाई करण्यात आली. सर्जिकल स्ट्राइकची नवी व्याख्या – ‘ऑपरेशन सिंदूर’ पहलगाम येथे...
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामागील सूत्रधारांना लवकरच चोख प्रत्त्युत्तर मिळेल – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा निर्धार
नवी दिल्ली – जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हळहळला असताना, आता या हल्ल्यामागील सूत्रधारांना लवकरच योग्य आणि चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे ठाम आश्वासन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहे. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग यांच्या स्मृति व्याख्यानात बोलताना राजनाथ सिंह यांनी भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या शून्य सहनशीलतेच्या भूमिकेचा...
“ही गृहमंत्र्यांच्या वडिलांची संसद आहे का?”~ सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अॅड. बलराज मलिक यांचा संतप्त सवाल
नवी दिल्ली – देशाच्या संसदेला सर्वोच्च स्थान मानले जाते. मात्र अलीकडील काळात संसदीय कामकाजाच्या पद्धतीवर अनेक तज्ज्ञांनी आणि न्यायव्यवस्थेतील वरिष्ठांनीही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता अॅड. बलराज मलिक यांनी नुकतेच एका चर्चेदरम्यान दिलेले वक्तव्य सध्या चांगलेच गाजत आहे. "ही गृहमंत्र्यांच्या वडिलांची संसद आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित करत सरकारच्या एकाधिकारशाही वृत्तीवर थेट प्रहार केला...










