0
0
0
0
0

पुणे

Home पुणे Page 111

ज्ञानोबा-तुकाराम जयघोषात दुमदुमला टाळगाव-चिखली परिसर महापालिकेच्या शाळेत रंगला भक्ती, एकात्मता आणि परंपरेचा अद्भुत संगम

0

पिंपरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंती वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेत  भक्तिमय वातावरणात भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव-चिखली परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा व महाविद्यालय परिसरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ-मृदुंगाच्या गजरासह टाळ-चिपळ्यांचा नाद आणि विद्यार्थ्यांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ‘ज्ञानोबा माऊली’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला होता. महिला बचत गटांच्या सदस्यांनी, स्थानिक समाजसेवकांनी, वारकरी बांधवांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. वारकरी परंपरेतील पालखी सोहळा जसा श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे, तसाच तो एकात्मता आणि सामाजिक बंध दृढ करणारा सोहळा ठरला. पालखी सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, समाज विकास विभाग उपायुक्त ममता शिंदे, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण कुमार मोरे, प्रशासन अधिकारी  संगीता बांगर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिठाचे संचालक ह. भ. प. राजू महाराज ढोरे ,डॉ. स्वाती मुळे आणि शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांच्या नियोजनामुळे आणि समन्वयामुळे संपूर्ण मिरवणूक सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.                                                                                                                               

आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे भव्य उद्घाटन – पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण

0

पुणे – पुणे शहराच्या पोलिस यंत्रणेत एक नवीन अध्याय आजपासून सुरू झाला आहे. आंबेगाव परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणारी आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे उद्घाटन पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार यांच्या हस्ते थाटात पार पडले. या सोहळ्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आंबेगाव पोलीस स्टेशनची सुरुवात दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी...

भीमाशंकरच्या विकासाला गती! 288 कोटींच्या आराखड्यास मान्यता; कुंभमेळ्यापूर्वी दर्जेदार सोयीसुविधांचा विकास होणार

0

 पुणे : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले श्री क्षेत्र भीमाशंकर हे केवळ एक धार्मिक स्थान नाही, तर पर्यावरणप्रेमी आणि भाविकांसाठीही एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या पवित्र स्थळाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक पार पडली, ज्यामध्ये 288.17 कोटी रुपये खर्चाच्या भव्य "श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यास"...

अमरावतीत धक्कादायक घटना! महिला पोलिसाची सुपारी देऊन हत्या; पतीच निघाला खुनी

0

अमरावती शहरात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या महिला पोलीस अंमलदार आशा धुळे-तायडे यांच्या गळा दाबून झालेल्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. या खळबळजनक प्रकरणात त्यांच्या पतीनेच पत्नीच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, प्रेमसंबंधातून ही संतापजनक घटना घडली आहे. आरोपी राहुल तायडे हा राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असून त्याचे गेल्या चार ते पाच वर्षांपासून दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते....

पुणे: माजी नगरसेवक रफिक शेख यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती!

0

पुणे: पुण्याचे माजी नगरसेवक रफिक शेख यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती: या सोहळ्यात काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यामध्ये मंत्री आरिफ नसीम खान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस नाना गवंडे, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद...

वारकरी संप्रदायाचा आत्मिक महोत्सव: वारी म्हणजे आनंदाचा चिरंतन शोध!

0

पंढरपूर, पुणे | आषाढी वारी विशेष प्रतिनिधी :- सुख कोणाला सापडले? या प्रश्नाचे उत्तर शोधताना माणूस आयुष्यभर धावपळ करतो, पण समाधान मिळत नाही. सुखाच्या शोधात अनेक जण प्रपंचात इतके अडकतात की त्यांचा प्रवास एका कोल्ह्याला जुंपलेल्या बैलासारखा होतो — पुढे-पुढे चालत राहतो, पण ठिकाण बदलत नाही. परंतु, संतांनी दाखवलेला वारीचा मार्ग हा फक्त पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन मिळवण्यासाठी नव्हे, तर...

पुणे पोलीस सज्ज: ऐतिहासिक श्री गणेशोत्सव २०२५ सुरक्षिततेसाठी कडेकोट बंदोबस्त आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

0

पुणे – पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर सांस्कृतिक, सामाजिक आणि कलात्मकतेचा महामेळावा. जगभरात कीर्ती पावलेला पुण्याचा "श्री गणेशोत्सव" यंदा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान साजरा होणार असून, त्याची सांगता ६ व ७ सप्टेंबर रोजीच्या भव्य मिरवणुकांनी होणार आहे. पुण्यात यंदा तब्बल ३,९५९ सार्वजनिक गणेश मंडळे आणि ७४,५९४ खाजगी गणेश मंडळे नोंदणीकृत असून, लाखो भाविक पुण्यासह...

बनावट चेन गहाण ठेवून सराफाची एक लाखांची फसवणूक! चिंचवडमध्ये दागिन्यांच्या नावाखाली खळबळजनक गुन्हा उघड

0

पिंपरी चिंचवड:-  चिंचवडमधील प्रसिद्ध ‘दिलीप सोनिगरा ज्वेलर्स’ या सराफ दुकानात खळबळजनक फसवणुकीची घटना समोर आली आहे. सोन्याच्या लेपाने चकाकणारी तांब्याची बनावट चेन गहाण ठेवून तब्बल एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २७ जून रोजी घडली असून, आता याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. फसवणुकीचा प्रकार कसा घडला? आरोपी राकेश भवानजी पासद (रा. नाने चौक, पुणे)...

महापुरुषांच्या देशसेवेचा आणि सामाजिक कार्याचा आदर्श घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची वाटचाल सुरु – अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर

0

पिंपरी, दि. ३१ ऑक्टोबर २०२५ –  माजी पंतप्रधान भारतरत्न, इंदिरा गांधी यांनी देशाच्या विकास, स्वावलंबन आणि प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले तर माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा पाया घालून अखंड भारताची निर्मिती केली, या थोर व्यक्तींच्या देशसेवेचा आणि सामाजिक कार्याचा आदर्श घेत महापालिका कार्य करत आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले. माजी पंतप्रधान, भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त तसेच...

पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन; सामाजिक न्यायाच्या विचारांना नव्याने सलाम

0

पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महात्मा फुले यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद, अन्याय आणि विषमता नष्ट करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचा सामाजिक क्रांतीचा वारसा आजही देशभरातील जनतेला प्रेरित करत असल्याचे यावेळी नेत्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष व...

Copyright ©