कसबा विधानसभा मतदारसंघाच्या जनतेच्या हितासाठी कटिबद्ध; आमदार हेमंत रासने पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सज्ज
दिनांक: ३० जून २०२५ - महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २०२५ आजपासून मुंबईतील विधान भवनात सुरू झाले असून, या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी सभागृहात ठाम भूमिका घेण्याची तयारी दर्शवली आहे. “कसबा मतदारसंघाच्या जनतेच्या हितासाठी मी पूर्ण ताकदीने आवाज उठवणार आहे,” असे विधान त्यांनी अधिवेशनाच्या प्रारंभी स्पष्ट केले. आमदार हेमंत रासने यांची भूमिका:“हे अधिवेशन म्हणजे जनतेच्या प्रश्नांवर...
दिल्ली स्फोटातील जखमींना भेट दिली; दोषींना न्यायाच्या कटघऱ्यात उभं केल्याशिवाय थांबणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदींची ठाम भूमिका!
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भयानक स्फोटानंतर देशभरात खळबळ उडाली असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एल.एन.जेपी. (LNJP) रुग्णालयाला भेट देऊन स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांची विचारपूस केली. त्यांनी प्रत्येक रुग्णाशी संवाद साधत त्यांचे मनोबल वाढवले आणि त्यांच्या लवकरात लवकर आरोग्यलाभासाठी प्रार्थना केली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधून उपचारांची माहिती घेतली....
हडपसरमध्ये मोठी कारवाई – गुन्हेगारी टोळीतील दोघे अटकेत, देशी बनावटीचे पिस्तूल व सोन्याचे दागिने जप्त!
📍 पुणे :- शहरात अवैध शस्त्रसाठा आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, हडपसर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन गुन्हेगारांना अटक केली आहे. देशी बनावटीच्या दोन पिस्तुलांसह सोन्याचे दागिने, दुचाकी आणि रोख रकमेसह तब्बल २.९२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 🔴 कारवाईचा घटनाक्रम ▪ पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला आणि दोघा गुन्हेगारांना ताब्यात घेतले. ▪ त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे...
“काठमांडूमध्ये टेकऑफ करत असताना सौर्या एयरलाइन्सचे विमान क्रॅश; १९ लोकांचा अपघात”
काठमांडू विमान अपघात: १३ मृत, १९ लोकांच्या विमानाने टेकऑफ करताना धडक दिली. बुधवारच्या सकाळी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर टेकऑफ करत असताना सौर्या एयरलाइन्सच्या विमानाने धडक दिल्याने किमान १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. विमानात एकूण १९ लोक होते. ही घटना सुमारे ११ वाजता घडली, आणि विमान पोखरा दिशेने जात होते, असे PTI ने दिलेल्या माहितीनुसार. सूत्रांनी सांगितले की, विमानाच्या धडक देताच आग लागली, पण...
मुंबईत पहिल्याच पावसात पाणी साचले; अंधेरी सबवे जलमय, वाहतुकीचा खोळंबा
मुंबईत मान्सूनने दमदार हजेरी लावल्यानंतर अवघ्या एका दिवसात अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. अंधेरी सबवे परिसर पूर्णपणे जलमय झाल्याने वाहतूक बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी प्रशासनाच्या मान्सूनपूर्व तयारीवर नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात अंधेरी सबवे परिसरात...
पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेती करणारा शेतकरी महत्वाचा- राज्यपाल आचार्य देवव्रत
पुणे – आपल्या देशात रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नैसर्गिक शेती हा प्रभावी पर्याय असून, पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला फॅमिली डॉक्टरपेक्षाही नैसर्गिक शेती करणारा शेतकरी अधिक गरजेचा ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. शिवाजीनगर येथील कृषि महाविद्यालयात आयोजित एक दिवसीय नैसर्गिक शेती परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते....
फुरसुंगी येथील मिळकतीबाबतचा दस्त गहाळ आणि कुलमुखत्यार रद्द – नागरिकांनी सतर्क राहावे!
पुणे शहरात जमीन व्यवहारांबाबत वारंवार होणाऱ्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची नोटीस जाहीर करण्यात आली आहे. आमचे अशील श्री. कुणाल राजेंद्रसिंग राजपुत यांच्या माहितीनुसार, दिनांक १९/०३/२०२५ रोजी त्यांनी श्री. आकाश बसंत वाल्मिकी आणि इरशाद अबरार शेख यांना दिलेला कुलमुखत्यारपत्र दस्त हवेली क्र. २, दस्त क्र. ७२४०/२०२५ अन्वये विधिवत नोंदणी करण्यात आला होता. मात्र, वैयक्तिक कारणास्तव हा कुलमुखत्यार दस्त दिनांक ०७/०८/२०२५...
वसईत ६ वर्षीय मुलावर गाडी चढली; चमत्कारिकरित्या जखमी अवस्थेत स्वतःच पोहोचला घरी, गाडीचालकाचा शोध सुरू.
वसई (नाईपाडा): वसई पूर्व येथील नाईपाडा गावात बुधवारी सकाळी ६ वर्षीय मुलावर कार चढल्याची भयंकर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चमत्कारिक बाब म्हणजे, गंभीर जखमी अवस्थेतसुद्धा मुलगा स्वतः उभा राहिला आणि घरी पोहोचला. घटनेचा तपशील: नाईपाडा गावातील औद्योगिक परिसरात कचऱ्याजवळ खेळत असताना, पांढऱ्या रंगाची कॅब गेटजवळ थांबली. एका प्रवाशाने मागील सीटवरून गाडी सोडली आणि दुसऱ्याने पुढच्या सीटवर बसण्याचा प्रयत्न केला. या...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार – राजदूत विशाल शर्मा
मुंबई, दि.20 : पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोमध्ये स्थापित करण्यात आल्याने या घटनेला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरातील नागरिकांना डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची तसेच शिक्षण, मानवाधिकार आणि सामाजिक समतेच्या मूल्यांची ओळख करून देणे, हाच या उपक्रमाचा मुख्य...
“एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेतून भक्ती आणि योगाचा संगम! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यात ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रम भव्य उत्साहात संपन्न
पुणे | २१ जून २०२५ | सकाळी ७.३० वा. – जागतिक योग दिनाच्या निमित्ताने पुण्यात आज 'वारकरी भक्तीयोग' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या आध्यात्मिक आणि आरोग्यदायी उपक्रमात हजारो वारकऱ्यांनी योगासने करत 'हरिपाठ' आणि नामस्मरणाने वातावरण भक्तिरसात न्हालं. योग आणि वारीचा संगम – आरोग्य आणि अध्यात्माचं शक्तिशाली साधन मुख्यमंत्री...








