“बिहारमध्ये नवीन सरकाराचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य — देशातील १० पेक्षा अधिक राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींची ऐतिहासिक उपस्थिती”
पटना : बिहारमध्ये नव्या सरकारच्या शपथग्रहण सोहळ्यात आज देशातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ मान्यवर एकत्र येत ऐतिहासिक क्षण साकारला. विविध राज्यांतील नेतृत्व एका व्यासपीठावर दिसल्याने हा सोहळा राष्ट्रीय पातळीवरील राजकीय एकात्मता आणि सहकार्यातील अनोखा संदेश देणारा ठरला. या भव्य सोहळ्यात पुढील मान्यवरांनी उपस्थित राहून नव्या सरकारचे अभिनंदन केले— ✔ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री – योगी आदित्यनाथ✔ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री –...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार – राजदूत विशाल शर्मा
मुंबई, दि.20 : पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोमध्ये स्थापित करण्यात आल्याने या घटनेला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरातील नागरिकांना डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची तसेच शिक्षण, मानवाधिकार आणि सामाजिक समतेच्या मूल्यांची ओळख करून देणे, हाच या उपक्रमाचा मुख्य...
उत्तराखंडमध्ये बस दुर्घटनेत २३ जणांचा दुर्दैवी मृत्यू; मृत्यूची संख्या वाढण्याची भीती.
अल्मोड़ा, उत्तराखंड: उत्तराखंडच्या अल्मोड़ा जिल्ह्यात सोमवारी सकाळी (४ नोव्हेंबर) एका भयंकर बस दुर्घटनेत किमान २३ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बस गोलीखाल क्षेत्रातून रामनगरकडे जात असताना खोल दर्यात कोसळली, ज्यामुळे या भीषण अपघातात अनेकांचे प्राण गेले. प्रशासनाला घटनेची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. मात्र, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे,...
उद्योगमंत्री उदय सामंत रुग्णालयात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, प्रकृतीत सुधारणा
मुंबई | महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात नागपूर येथे पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उदय सामंत यांनी सक्रिय सहभाग घेतला...
चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगलेला व पॅरोलवरून फरार सराईत चोर बाणेर पोलिसांच्या जाळ्यात, मुंबईतून अटक
बाणेर पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या चोरीच्या प्रकरणात शिक्षा भोगलेला आणि दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्यात पॅरोलवरून फरार असलेल्या सराईत आरोपीला बाणेर पोलिसांनी अटक करून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली असून, सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांची कडक भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी बाणेर पोलीस स्टेशन येथे फिर्यादीने तक्रार दाखल केली होती....
मन सुन्न करणारी घटना: नव्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी तरुणाचा झाड कोसळून मृत्यू
विक्रोळी | मुंबई | २८ मे २०२५ — मुसळधार पावसात विक्रोळीतील एका बागेत उभ्या असलेल्या झाडाखाली कोसळून तेजस नायडू या २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, तेजस याच दिवशी नवीन मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीवर रुजू होणार होता. मात्र पावसामुळे त्याने नोकरीची सुरुवात एक दिवस लांबवली, आणि नियतीने त्याच दिवशी त्याच्यावर घाला घातला. एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त तेजस आपल्या मित्रांसोबत विक्रोळीतील...
पुणे पोलीस आयुक्तालयातील आंबेगाव पोलीस स्टेशन ठरले ISO 9001:2015 मानांकित; नागरिकांसाठी दर्जेदार सेवांचा नवा अध्याय सुरू!
पुणे शहर पोलीस दलासाठी एक अभिमानास्पद क्षण... आंबेगाव पोलीस स्टेशनने "ISO 9001:2015" प्रमाणपत्र प्राप्त करून पोलीस आयुक्तालयातील पहिले मानांकित पोलीस ठाणे होण्याचा मान पटकावला आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून आज मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान समारंभ संपन्न झाला. या वेळी उपस्थित असलेले वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी आंबेगाव पोलीस स्टेशनच्या सुसूत्र व गुणवत्तापूर्ण कार्यपद्धतीचे...
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपचा प्रचार शिगेला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जाहीर सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केले. या सभेमुळे उल्हासनगरमध्ये भाजपच्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे...
दुर्मीळ श्वसनमार्गातील हेमॅन्जिओमावर वेळेत उपचार; ८ महिन्यांच्या चिमुकलीला मिळाले नवे जीवन
मुंबई | १९ डिसेंबर – जन्मापासून श्वास घेण्यास त्रास सहन करणाऱ्या आठ महिन्यांच्या एका चिमुकलीला मुंबईतील नारायण हेल्थ SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये वेळेवर निदान व उपचारामुळे नवे आयुष्य मिळाले आहे. या बालिकेला अत्यंत दुर्मीळ आणि जीवघेण्या ठरू शकणाऱ्या ग्रेड-३ एअरवे हेमॅन्जिओमा या आजाराने ग्रासले होते. या आजारामुळे तिच्या श्वसनमार्गात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. परिणामी, तिला श्वास घेण्यास तीव्र अडचण,...
हिंदमातामध्ये पुन्हा पूरस्थिती; BMC च्या अपयशावर पावसाचं खापर, नागरिक संतप्त
मुंबई | २८ मे २०२५ —मुंबईच्या हिंदमाता परिसरात सोमवारच्या पहिल्या जोरदार पावसात पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली, आणि नेहमीप्रमाणे महापालिकेचे अपयश समोर आले. बीएमसीने यावेळी देखील पावसावर जबाबदारी ढकलत सांगितले की, "मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर आल्यामुळे पंप सुरू करायला उशीर झाला." हिंदमात्याचा दरवर्षीचा पूरकाळ हिंदमाता हा परिसर दरवर्षी मान्सून आणि अगोदरच्या पावसात जलमय होतो. मागील दोन वर्षांत या ठिकाणी ११...










