महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 156

मेट्रोमुळे कोंढव्याला नवी गती; शहराच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार

0

पुणे | कोंढवा परिसराचा सर्वांगीण आणि वेगवान विकास साधण्यासाठी मेट्रोच्या माध्यमातून कोंढव्याला पुणे शहराच्या इतर भागांशी जोडण्यात येणार असल्याची ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कात्रज–कोंढवा मार्गाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असून, शिवाजीनगर ते येवलेवाडी मेट्रोमार्गाला मान्यता देण्यात आली आहे. तसेच स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्ग कोंढव्यापर्यंत वाढवणे आणि प्रस्तावित पुरंदर विमानतळाशी जोडणारी मेट्रो लाईन कोंढवा परिसराशी संलग्न...

हिंजवडीचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत ऐतिहासिक निर्णय

0

मुंबई/पुणे – 10 जुलै 2025 : पुण्याच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मुख्य केंद्र असलेल्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड वाहतूक कोंडी आणि अपुरी पायाभूत सुविधा यामुळे हजारो नागरिक आणि आयटी कर्मचाऱ्यांना रोजचा त्रास सहन करावा लागत होता. अखेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या समस्येच्या कायमस्वरूपी समाधानासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. हिंजवडी ते वाकड –...

उल्हासनगर डान्सबारवर कळवा गुन्हे शाखेचा मोठा छापा! २४ बारबालांसह ७ ग्राहक आणि ६ कर्मचाऱ्यांना अटक, शहरात खळबळ

0

उल्हासनगर (ठाणे) – उल्हासनगर शहरातील एका प्रसिद्ध डान्सबारवर कळवा गुन्हे शाखेने बुधवारी रात्री उशिरा धडक कारवाई केली. या कारवाईत २४ बारबाला, ७ ग्राहक आणि ६ बार कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण उल्हासनगरमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांत चर्चेचा विषय बनला आहे. गुप्त माहितीवरून मोठी धडक कारवाई गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने डान्सबारवर नजर ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या...

मुंबईत ‘डिजिटल संविधान चित्ररथ’ला हिरवी झेंडी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य लोकार्पण

0

मुंबई | ६ डिसेंबर २०२५ – भारतीय संविधानाच्या ‘अमृत महोत्सवी वर्षा’निमित्त आज मुंबईत एक ऐतिहासिक आणि भव्य सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या करकमलातून ‘डिजिटल संविधान चित्ररथ’ या अनोख्या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. सकाळी नेमके ९.२० वाजता लोकार्पणाचा क्षण साधताच वातावरणात देशभक्ती आणि अभिमानाची भावना दाटून आली. या विशेष प्रसंगी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री एड. आशिष शेलार तसेच अन्य...

पिंपरी चिंचवड महापालिकेत महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी; विचार प्रबोधन पर्वासह विविध उपक्रमांचे आयोजन

0

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय कार्यालयात अभिवादन प्रसंगी उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी मनोज माछरे,अनिल लखन उपस्थित होते. तर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय,संत तुकारामनगर येथील कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे,अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.अभयचंद्र दादेवार, तसेच डाॅ. मनिषा सुर्यवंशी,आरोग्य निरीक्षक राजकुमार वाघमारे, सिस्टर इनचार्ज सविता निगडे आदी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महर्षि वाल्मिकी विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी मोकळ्या मैदानात करण्यात आले होते. या प्रबोधन पर्वास उप आयुक्त अण्णा बोदडे,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे,विधीतज्ञ अँड.सागर चरण, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल,कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रबोधन पर्वाच्या प्रारंभी महापालिकेच्या आरोग्य आणि वैद्यकीय विभागातील उत्कृष्ट कामकाज करणा-या सफाई कामगार, वॉर्डबॉय, आया,आरोग्य निरीक्षक यांना प्रशस्तीपत्रक, शाल देऊन गौरविण्यात आले. सफाई कर्मचारी यांचेकरीता बहारदार हिंदी, मराठी गीतांसह महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष होम मिनिस्टर- खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये महिला सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन उस्फुर्त प्रतिसाद दर्शवला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर उपस्थितांचे आभार किरण गायकवाड यांनी मानले.

*पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित महात्मा जोतीराव फुले स्मृतीदिन प्रबोधन कार्यक्रमास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद…*

0

समाजातील प्रत्येकाला सर्वत्र समान वागणूक, समान शिक्षण हा विचार घेऊन महात्मा जोतीराव फुले यांनी आयुष्यभर कार्य केले तर त्यांच्या या विचारधारेचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. महात्मा फुले यांचा सर्वांना समान संधीचा, समान शिक्षणाचा विचार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात मांडला असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विद्यापीठ अनुदान आयोग माजी अध्यक्ष डॉ....

महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय: ९६३ शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत देण्याची घोषणा

0

महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. अनेक वर्षे शासनाकडे जमा राहिलेल्या ४,९४९ जमिनींपैकी ९६३ शेतकऱ्यांना त्यांची हक्काची जमीन परत देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न साकार होण्यास सुरुवात झाली असून, त्यांच्या जीवनात नवा प्रकाश दिसू लागला आहे. शासनाचा निर्णय: शेतकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण शासनाकडे विविध कारणास्तव जमा झालेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या मालकीच्या होत्या. परंतु, शासन नियम आणि प्रक्रियांमुळे...

मनसेकडून मोठी घोषणा : मुंबई उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांची उमेदवारी राज ठाकरे यांनी जाहीर केली

0

मुंबई | विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय निर्णय घेतला असून, मुंबई उपशहर अध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार यांची उमेदवारी आज मा. राजसाहेब ठाकरे यांनी अधिकृतपणे जाहीर केली. या घोषणेमुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संपूर्ण मुंबई उपशहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी जाहीर करताना राजसाहेब ठाकरे यांनी यशवंत किल्लेदार यांच्या संघटनात्मक कामाचा, जनतेशी...

दलितांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी महाराष्ट्र बीजेपीने काँग्रेसवर आरक्षणविरोधी असल्याचा आरोप केला.

0

महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी, भाजप पुन्हा दलित समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेसवर निशाणा साधत आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपवर ‘असंविधानिक’ असल्याचा आरोप करून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी दलित आणि मागासवर्गीयांच्या मतांमध्ये घसरण घडवली होती. राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील आरक्षणावरील वक्तव्यांमुळे भाजप आता काँग्रेसला ‘आरक्षणविरोधी’ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेत विद्यार्थ्यांशी बोलताना भारतातील आरक्षण व्यवस्था केवळ 'न्याय्य भारत'...

नववर्ष स्वागतासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त: नियमांचे पालन करण्याचे आवाहन

0

नववर्षाच्या स्वागताच्या उत्सवाला राज्यभरात जल्लोषात तयारी सुरू असून, त्यासोबतच सुरक्षा व्यवस्थेचाही काटेकोर बंदोबस्त करण्यात आला आहे. राज्यातील मोठ्या शहरांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत. थर्टी फर्स्टच्या रात्री संभाव्य अडचणी टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. वाहनचौकशी आणि मद्यपानावर कडक कारवाई वाहनचालकांनी नियमांचे उल्लंघन करू नये म्हणून प्रत्येक प्रमुख चौक आणि महामार्गांवर पोलिसांकडून वाहनचौकशी मोहिमा राबवल्या जात आहेत....

Copyright ©