Breaking News
मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपीकडून मोठा छडा; १.९० लाखांचे मोबाईल व दुचाकी पोलिसांनी केली जप्त
पुणे | भारती विद्यापीठ पोलीसांची कारवाई, नागरिकांमध्ये दिलासा पुणे शहरात मोबाईल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या दक्षतेमुळे एक महत्त्वाचा गुन्हा उघडकीस आला आहे. दिनांक ०१ मे २०२५ रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गुजरवाडी फाटा, महेश कदम यांच्या बंगल्याजवळील गोल्डन स्क्रॅप सेंटरसमोर एक धक्कादायक घटना घडली. फिर्यादी व्यक्ती फोनवर बोलत असताना दोन दुचाकीस्वार अज्ञात इसमांनी त्यांच्या हातातील...
“India-Pakistan War 2025: पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला भारताचं जोरदार प्रत्युत्तर; कराची बंदरावर जबरदस्त धडक!”
नवी दिल्ली | 9 मे 2025 – पाकिस्तानने उघड उघड कुरापती करत भारताच्या जम्मू आणि काश्मीर भागात आठ क्षेपणास्त्र डागल्याने पुन्हा एकदा युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली. भारताच्या अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेनं सर्व क्षेपणास्त्रं मार्गामध्येच निष्क्रिय करत पाकिस्तानच्या हल्ल्यांना पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय लष्कराने या हल्ल्यांना 'दहशतवादी कारवाया' असे संबोधले असून, यामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि...
“भारताची पाकिस्तानला शेवटची इशारा-कारवाई: संयम आणि शक्तीचा अनोखा मिलाफ!”
‘सुधर जाओ पाकिस्तान’ – हे शब्द आता विनंतीसारखे नाहीत, तर चेतावणीसारखे वाटू लागले आहेत. भारताने पाकिस्तानला अनेक वेळा शांततेची संधी दिली, पण दरवेळी पाकिस्तानने ती फुकट घालवली. आताच्या घडामोडी पाहता, ही भारताने दिलेली शेवटची आणि निर्णायक संधी असू शकते. पहलगाम हल्ल्याने पेटला भारत जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे घडवून आणलेला दहशतवादी हल्ला हा याच कटकारस्थानाचा एक भाग होता.या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा प्रत्यक्ष सहभाग...
“ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान हादरला! लाहोरमध्ये सलग स्फोट – युद्धजन्य स्थितीची भीती वाढली!”
पाकिस्तान पुन्हा हादरला आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, लाहोर शहरात सलग स्फोटांचे आवाज ऐकू आल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे. काल रात्री उशिरा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोर शहरातील गोपाल नगर, नसीराबाद आणि वॉल्टन रोड परिसरात एकामागून एक तीन स्फोट झाले, अशी माहिती स्थानिक सूत्रांकडून समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटांनी परिसरात...
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान हादरला! – बिलावल भुट्टोंकडून भारताविरुद्ध पोकळ धमक्यांचा पाऊस
भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीर (पीओके) येथील दहशतवादी अड्ड्यांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले करत यशस्वी कारवाई केल्यानंतर पाकिस्तानमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.भारताच्या धाडसी कारवाईने पाकच्या लष्करी आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, नेहमीप्रमाणे भारताविरुद्ध पोकळ धमक्या देण्याचा खेळ पुन्हा एकदा सुरू झाला आहे. पाकिस्तानची डोळ्यांत अंजन घालणारी कारवाई भारतीय सैन्याने नुकत्याच पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान...
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेसाठी सिद्धिविनायक मंदिरात विशेष पूजन; देशरक्षणासाठी देवाला कृतज्ञतेची अर्पणवाणी
मुंबई | ८ मे : भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर यशस्वी क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर देशभरात अभिमान आणि आनंदाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक आणि ठोस कारवाईनंतर आज सकाळी मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात विशेष पूजन आणि आरती आयोजित करण्यात आली आहे. या पूजनामध्ये भारताचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी प्रार्थना केली जाणार असून, यशस्वी मोहिमेसाठी श्री गणेशाचे...
मुंबई व महाराष्ट्रात आज ७ मे रोजी सायंकाळी ४ वाजता देशव्यापी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
मुंबई : सैनिकी सज्जतेचा अनुभव, आपत्ती व्यवस्थापन कौशल्यांची तपासणी आणि आपातकालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी नागरिकांची तयारी वाढवण्याच्या उद्देशाने आज दुपारी ४ वाजता देशभरात एकाचवेळी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल राबवण्यात येणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांतील १६ ठिकाणी हे प्रशिक्षणात्मक सराव होणार आहे. १९७१ नंतर प्रथमच एवढ्या व्यापक प्रमाणावर होणारी ही मोहिम आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी गंभीरतेने सहभाग घ्यावा, असे...
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शैक्षणिक आणि औद्योगिक क्रांतीचा शुभारंभ
मुंबई :- राज्याच्या गडचिरोली जिल्ह्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. कारण गोंडवाना विद्यापीठ, लॉईड स्टील कंपनी आणि पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठित कर्टीन विद्यापीठ यांच्यात आज मुंबईतील राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्वाचा सामंजस्य करार (MoU) झाला. या करारामुळे गडचिरोलीच्या शैक्षणिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला अभूतपूर्व गती मिळणार आहे. राज्यपाल राधाकृष्णन यांनी या वेळी सांगितले...
पाकिस्तान बिथरलं! एअर स्ट्राईकनंतर सीमेवर मध्यरात्री अंदाधुंद गोळीबार; भारताने दिलं चोख प्रत्युत्तर
भारताने नुकत्याच केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. देशाच्या संरक्षणासाठी भारतीय लष्कराने उचललेले हे पाऊल निर्णायक ठरले असून, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमारेषेवर सतत आगळिक केली जात आहे. बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील करनाह सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने...
प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी ‘बदाम’ ठरत आहेत गेमचेंजर – अभिनेत्री सोहा अली खान पुण्यात आयोजित चर्चासत्रात व्यक्त केला अनुभव!
पुणे :- सोहा अली खान म्हणाल्या,जेव्हा मी घरी जेवण बनविण्याची तयारी करते, तेव्हा प्रोटीनला सर्वात वरचे स्थान असते. विशेषतः माझी मुलगी वाढत्या वयाची आणि खूप ऍक्टिव्ह असल्याने. बदाम हे आमच्यासाठी पोषणाचा सोपा आणि विश्वासार्ह स्रोत ठरले आहेत. शूट्सदरम्यान देखील मला बदाम खायला आवडतात. ते मला पचायला जड न वाटता एनर्जी देतात. मी माझ्या मुलीच्या आहारात, तिच्या नाश्त्यात किंवा सॅलडमध्ये...










