Breaking News
देवभूमीला नवसंजीवनी — ५ पवित्र ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी ८८२ कोटींचा भव्य आराखडा!
मुंबई | महाराष्ट्रातील ५ पवित्र ज्योतिर्लिंगांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एकूण ₹८८२ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करून धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन आणि स्थानिक विकासाला एकाच वेळी चालना देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे केवळ मंदिर परिसराचा विकासच होणार नाही, तर भाविकांच्या सोयीसुविधा, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही गती मिळणार आहे. विकासाचा व्याप: या आराखड्यात...
“पीसीयू”चा विक्रमी टप्पा — यूजीसी-एचआरडीसीसोबत सामंजस्य कराराने उच्च शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श!
पिंपरी चिंचवड | उच्च दूरदृष्टी, स्पष्ट ध्येय आणि जलद अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर पुढे जात पिंपरी चिंचवड विद्यापीठाने (पीसीयू) अवघ्या दोन वर्षांत असा विकास साधला आहे, जो इतर अनेक विद्यापीठांना साध्य करण्यासाठी दोन दशके लागली. याच प्रगतीच्या वाटचालीत आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पीसीयू आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्र (एमएमटीसी) तसेच मानवी संसाधन विकास केंद्र...
“चाकण-तळेगाव वाहतूक कोंडीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पहाटेचा थेट पाहणी दौरा – संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ तोडगा काढण्याच्या सूचना”
चाकण | चाकण-तळेगाव परिसरातील सतत वाढणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक, उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्ण त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज शुक्रवारी पहाटे थेट रस्त्यावर उतरून पाहणी केली. रात्री उशिरा बीड जिल्ह्याचा दौरा पूर्ण करून पहाटेच पुण्यात दाखल झालेले अजित पवार यांनी भोसरीपासून चाकणपर्यंतच्या वाहतूक व्यवस्थेची सखोल तपासणी...
मावळातील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर: वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर
मुंबई, ७ ऑगस्ट — मावळ तालुक्यातील वडगाव-कान्हे आणि लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयांच्या आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीस मावळचे आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत कान्हे उपजिल्हा रुग्णालयात सुरू झालेल्या प्राथमिक आरोग्यसेवांबरोबरच लवकरच येथे सिटी-स्कॅन, एम.आर.आय, कॅथलॅब यांसारख्या अत्याधुनिक सुविधा...
धर्मवीर संभाजी महाराजांच्या “हिंदुभूषण मूर्ती”चा श्रीफळपूजन सोहळा थाटात पार! आमदार महेशदादा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती
चिंचवड – शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देत, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या "हिंदुभूषण" शिल्पाची श्रीफळपूजन विधी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या विशेष सोहळ्यास पिंपरी-चिंचवडचे लोकप्रिय आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अधिक गौरवशाली झाला. महेशदादांनी आपल्या भाषणात सांगितले की, "संभाजी महाराज हे केवळ योद्धा नव्हते, तर हिंदवी स्वराज्याचे खरे रक्षक होते. त्यांच्या शौर्याची आठवण...
युवक उद्योजक चिरंजीव निनाद भोंडवे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आज आपल्या कुटुंबातील लाडक्या जावयाचे, तरुण आणि प्रेरणादायी उद्योजक चिरंजीव निनाद भोंडवे यांचा वाढदिवस अत्यंत आनंदात साजरा करण्यात आला. या खास दिवशी कुटुंबातील सदस्यांसह अनेक सहकारी, हितचिंतक, मित्रपरिवार, व्यावसायिक मंडळींनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला. निनाद भोंडवे यांची कामाबद्दलची निष्ठा, नव्या संधींना सामोरे जाण्याची जिद्द आणि सकारात्मक ऊर्जा ही खरोखरच अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांनी व्यवसायिक...
चिनी लष्कराची नव्या युगात झेप : लांडग्याच्या रुपातील ‘रोबोटिक शस्त्र’ युद्धासाठी सज्ज!
चीनच्या लष्कराने (People’s Liberation Army - PLA) युद्धतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक धक्कादायक पाऊल टाकले असून, त्यांनी आता लांडग्याच्या रुपातील एक घातक रोबोट आपल्या पथकात समाविष्ट केला आहे. या आधुनिक यंत्रमानवाची क्षमताच अशी आहे की ती ऐकूनच कोणत्याही देशाच्या लष्कराच्या गोटात भीतीचे वातावरण निर्माण होईल. मंगळवारी झालेल्या एका युद्धसरावामध्ये, चिनी सैन्याने या 'रोबोटिक वुल्फ'सह आपला सराव केला. विशेष म्हणजे, एका मिनिटात...
मराठी अस्मितेवर गदा? राज ठाकरेंचा गंभीर इशारा! मराठी माणसांवर अन्यायाचा आरोप
राज ठाकरे नेहमीच मराठी माणसाच्या हितासाठी सजग आणि सावधगिरीचा इशारा देत आले आहेत. सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळतेय, असा आरोप पुन्हा एकदा त्यांनी केला आहे. गेल्या ४ महिन्यांमध्ये अनेक आंदोलनं झाली, पण त्या सगळ्या आंदोलनांमध्ये एक गोष्ट सतत दिसून आली – मराठी माणसाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या एका विशिष्ट पक्षाची सुस्पष्ट उपस्थिती! त्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्यांवर...
“कबुतरखाना निमित्तमात्र… मूळ उद्देश समाजाची ताकद दाखवण्याचा! – मुंबईत मराठी अस्मितेवर घाला?”
मुंबईतील ऐतिहासिक कबुतरखाना परिसर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या घडत असलेल्या घटनांवर नजर टाकल्यास स्पष्ट होते की, कबुतरखाना हा फक्त निमित्त आहे. यामागील मूळ उद्देश काही विशिष्ट समाजांनी आपली संख्या, संघटना आणि ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणे आहे. ही केवळ धार्मिक वा सांस्कृतिक घडामोड नसून, ही एक ठरवून आखलेली रणनीती आहे – जिच्या माध्यमातून मुंबईसारख्या महानगरावर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न...
पुणे-नागपूर ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचा वेगवान प्रवास! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १० ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन
पुणे, ७ ऑगस्ट २०२५ : पुणेकर आणि नागपूरकरांसाठी एक दिलासादायक आणि ऐतिहासिक बातमी आहे! पुणे-नागपूर दरम्यान "वंदे भारत एक्सप्रेस" सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला असून, याचे उद्घाटन १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ही गाडी फडणवीसांच्या मतदारसंघाशी थेट जोडणारी असल्याने राजकीयदृष्ट्याही या सेवेचे महत्त्व अधिक आहे. वंदे भारत चे वैशिष्ट्ये: ९:५० सकाळी नागपूरहून सुटणार आणि रात्री...





