Breaking News

Home Breaking News Page 244

ताम्हिणी घाटात भीषण बस अपघात: ५ ठार, २७ जखमी; लग्न समारंभाच्या आनंदावर शोककळा.

0

पुणे: ताम्हिणी घाटातील एका धोकादायक वळणावर झालेल्या बस अपघातात ५ जण ठार, तर २७ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. लोहगाव येथून महाडला लग्नासाठी निघालेल्या जाधव कुटुंबीयांची खासगी बस (एम एच १४ जी यु ३४०५) शुक्रवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास अपघातग्रस्त झाली. अपघाताचा तपशील: ताम्हिणी घाटातील एका तीव्र वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस कठड्याला धडकून काही...

महाराष्ट्राला जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनविण्याचा संकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई :- महाराष्ट्र हे जागतिक गुंतवणुकदारांसाठी सर्वात आकर्षक 'डेस्टिनेशन' बनविण्याचा शासनाचा संकल्प आहे. भारतीय विदेश सेवेतील सेवा अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सूचनांचा विचार करून राज्य शासन विविध क्षेत्रातील बाबींसाठी नवी धोरणे आखेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी भारतीय विदेश सेवेतील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील वेगाने बदलणाऱ्या पायाभूत सुविधा, गुंतवणूक संधी आणि राज्याच्या जागतिक स्तरावरील प्रगतीविषयी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र...

मुंबई जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती; अंचल गोयल यांची नियुक्ती

0

मुंबई : महाराष्ट्र सरकारने मुंबई शहर जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकाऱ्यापदी अंचल गोयल (IAS) यांची नियुक्ती केली आहे. गोयल या 2014 बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांना नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर 31 जुलै 2023 रोजी नियुक्त करण्यात आले होते. यापूर्वी त्या परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. अंचल गोयल सध्या नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट...

दौंड: ऊसतोडणी करताना बिबट्याचा हल्ला; शेतकरी महिलेचा मृत्यू, कडेठाण परिसरात भीतीचे वातावरण,

0

दौंड, पुणे: कडेठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लताताई बाबन ढवळे (वय ५०) असे या मृत महिलेचे नाव असून, ही घटना शनिवारी (ता. ७) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेचे तपशील: शनिवारी दुपारी लताताई ढवळे या आपल्या ऊसतोडणीच्या शेतात काम करत होत्या. काम करत असतानाच बिबट्याने अचानक हल्ला केला आणि त्यांना ऊसाच्या फडात ओढून...

सायबर फसवणुकीचा पर्दाफाश: सिम्बायोसिसमध्ये प्रवेश देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणारा सराईत आरोपी थायलंड पळून जाताना अटक!

0

पुणे :- पुण्यातील नामवंत शैक्षणिक संस्थेच्या नावाचा गैरवापर करून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा भांडाफोड करत, गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी कामगिरी बजावली आहे. सिम्बायोसिस कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगत ऑनलाइन वेबसाईटद्वारे विद्यार्थ्यांना गंडा घालणारा कुमार कुणाल बिरेंद्रकुमार विद्यार्थी या सराईत गुन्हेगारास थायलंड पळून जाण्याच्या तयारीत असताना कोलकत्ता विमानतळावर अटक करण्यात आली. सायबर फसवणुकीचा मास्टरमाइंड पकडला फसवणूक...

“मी मरू इच्छितो…” १८ वर्षीय संजयकुमारने ऑडिओ क्लिप पाठवत घेतला टोकाचा निर्णय; पिंपरी-चिंचवड परिसरात दुर्दैवी आत्महत्येची घटना!

0

पिंपरी-चिंचवड, पुणे – “मम्मी, मी माझा मोबाइल तोडणार आहे... मी विष प्राशन केलंय... माझ्या बहिणींची काळजी घ्या...” – आपल्या आईवडिलांना शेवटची ऑडिओ क्लिप पाठवत संजयकुमार विनोदकुमार राजपूत (वय १८) या तरुणाने घोरडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ऑडिओ क्लिपमधील मजकूर काळजाला चिरून टाकणारा संजयकुमारने आपल्या व्हॉट्सअ‍ॅप ऑडिओ क्लिपमध्ये लिहिलं – "मम्मी, मी...

“आर. एम. धारीवाल फाउंडेशनकडून कँप एज्युकेशन सोसायटीला शालेय बस भेट—देहू ते निगडी ग्रामीण मुलांच्या शिक्षणयात्रेला नवी गती!”

0

पिंपरी-चिंचवड परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना सुरक्षित, नियमित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळण्यासाठी आर. एम. धारीवाल फाउंडेशनने कँप एज्युकेशन सोसायटीला अत्याधुनिक शालेय बस भेट दिली आहे. निगडी परिसरातील कँप एज्युकेशन सोसायटीमध्ये आयोजित कार्यक्रमात या बसचे उद्घाटन आर. एम. धारीवाल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई धारीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘सुरक्षिततेची नवी हमी’ देहू परिसरातील प्राथमिक आणि प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी निगडीपर्यंत दररोज लांबचा प्रवास...

उष्णतेची तीव्र लाट पुणे आणि विदर्भावर धडकली! नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0

पुणे/विदर्भ, २२ एप्रिल २०२५: पुणे आणि विदर्भातील नागरिकांना यंदाच्या एप्रिल महिन्यात उष्णतेच्या लाटेचा तीव्र फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दररोज तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर जात असल्याने उन्हाचा चटका अधिक जाणवू लागला आहे. नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावतीसह पुणे शहरात सुद्धा तापमानाने उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस "हीटवेव्ह अलर्ट" जारी केला असून, नागरिकांना...

बाणेरमध्ये भरधाव डंपरने दुचाकीला धडक देत महिलेला चिरडले; आरोपीस अटक, पोलीस तपास सुरु

0

पुणे (दि. १९ जून २०२५) – बाणेर परिसरातील गणेश दत्त मंदिर चौकाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून तिची मैत्रीण गंभीर जखमी झाली आहे. हे सर्व डंपरचालकाच्या हयगयीने व भरधाव वेगात वाहन चालवण्यामुळे घडले. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. अपघातात मृत्यू झालेली महिला तेजल प्रकाश तायडे (वय २७, रा. तलासरी,...

‘ऊर्जासंपन्न महाराष्ट्र’चा आणखी एक टप्पा पूर्ण! तिल्लारी जलविद्युत प्रकल्पासाठी 1008 कोटींचा सामंजस्य करार – 240 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारणार

0

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि हरित भविष्यासाठी घेतल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण पावलांपैकी एक म्हणजे तिल्लारी उदंचन जलविद्युत प्रकल्प. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग आणि श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था, वारणानगर यांच्यात आज 240 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या सामंजस्य करारामुळे केवळ ऊर्जा उत्पादनास गती मिळणार नाही, तर 1008...

Copyright ©