सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडून विजयस्तंभाच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन तयारीची पाहणी
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुतेच्या मूल्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी प्रशासन, सामाजिक संघटना व नागरिकांनी परस्पर समन्वय साधून सोहळा हा यशस्वी करावा. प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे अनुयायांनी पालन करून सहकार्य करावे, असे आवाहान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ....
जाणीव, प्रशिक्षण आणि संशोधन – समृद्ध लोकशाहीचे त्रिसूत्र : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नागपूर : लोकशाही अधिक बळकट आणि समृद्ध करण्यासाठी जाणीव, प्रशिक्षण आणि संशोधन या तीन घटकांचा समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या माध्यमातून राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना विधिमंडळातील प्रशिक्षण मिळते, त्यामुळे कायदे कसे बनतात, संसदीय प्रक्रिया कशा प्रकारे चालतात याचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त होते. अशा उपक्रमांमुळे लोकशाही अधिक समृद्ध...
एलपीएफचा अनोखा उत्सव : स्वातंत्र्य, सेवा आणि शिक्षणाचा संगम – पुण्यात ४ महत्त्वाचे सोहळे एकत्र साजरे
पुणे : लीला पूनावाला फाउंडेशन (एलपीएफ) ने १६ ऑगस्ट २०२५ रोजी एक ऐतिहासिक क्षण घडवला. ७९ वा स्वातंत्र्य दिन, फाउंडेशनचा उल्लेखनीय ३० वर्षांचा प्रवास, ‘इन्स्पिरा’ न्यूजलेटरची ६५ वी आवृत्ती आणि रक्तदान मोहीम – हे चार महत्त्वपूर्ण सोहळे एकत्र साजरे करून एलपीएफने एकतेचा, सेवाभावाचा आणि प्रगतीचा सुंदर संगम घडवून आणला. 🔹 भव्य आयोजन हा कार्यक्रम भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्स,...
गणेशोत्सवासाठी ध्वनिक्षेपक वापरास ७ दिवसांची परवानगी – जिल्हाधिकारी डूडी यांचा आदेश
पुणे : महाराष्ट्रात गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक मानला जातो. राज्य शासनाने याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना ध्वनिक्षेपक (लाउडस्पीकर) आणि ध्वनिवर्धक वापरासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी विशेष परवानगी जाहीर केली आहे. या आदेशानुसार, गणेशोत्सवाच्या काळात एकूण ७ दिवस सकाळी...
गणेशोत्सवाच्या निमित्ताने चंद्रकांत दादा पाटील यांची लांडगे कुटुंबाच्या भेटी
गणपती बप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया..! राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच संसदीय कामांचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने लांडगे कुटुंबाच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी लांडगे कुटुंबात आलेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि कुटुंबियांचे अभिवादन स्वीकारले. या विशेष भेटीच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे, विधान परिषदेचे आमदार माननीय उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे,...
महाराष्ट्रात महिला क्रिकेटवीरांचा गौरव सोहळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचा सत्कार
मुंबई | भारतीय महिला क्रिकेट संघाने जागतिक स्तरावर विजयाची गाथा लिहिल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने मुंबईत त्यांच्या कामगिरीचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भारतीय संघातील तडाखेबाज फलंदाज स्मृती मंधाना, गतिमान खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज आणि अष्टपैलू राधा यादव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “या तीन खेळाडूंनी केवळ देशाचं नाव...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील मानाच्या गणपतींना भेट – श्रींच्या चरणी प्रार्थना करून घेतले पुणेकरांचे आशीर्वाद
पुणे : पुण्यातील मानाचे गणपती हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहेत. गणेशोत्सवाला राज्य शासनाने ‘राज्य उत्सवाचा’ दर्जा दिल्याने या सणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील विविध मानाच्या व ऐतिहासिक गणेश मंडळांना भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले आणि राज्यातील जनतेसाठी प्रार्थना केली. मुख्यमंत्री म्हणाले, “श्री गणेश सर्वांना सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य देवो. सर्वांच्या मनोकामना पूर्ण...
मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाची परवानगी वाढवली; मनोज जरांगें पाटीलचा उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू
मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीत सुरू असलेले आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही जोरात सुरू आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगें पाटील यांनी आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुनबी जातीचा दर्जा देऊन ताबडतोब आरक्षण मिळावे, अशी मागणी सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चेनंतर केली. मात्र, सरकारच्या प्रतिनिधी मंडळाशी झालेल्या चर्चेमुळे समाधानकारक निकाल मिळालेला नाही. मनोज जरांगें पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
चीन भारताच्या तीन मोठ्या गरजा पूर्ण करणार – द्विपक्षीय संबंधात नवा अध्याय
भारत आणि चीन या आशियातील दोन महासत्ता देशांमध्ये गेल्या काही काळात तणावपूर्ण परिस्थिती होती. मात्र आता या दोन्ही देशांनी पुन्हा एकदा संबंध सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताच्या तीन महत्त्वाच्या गरजा चीन पूर्ण करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या तीन गरजांमध्ये प्रामुख्याने आर्थिक सहकार्य, औद्योगिक गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विकासाचा समावेश असल्याचे सांगितले जाते. भारताला आगामी काळात ऊर्जा, तंत्रज्ञान...
३५ लाखांच्या मालाच्या अपहाराचा थरार संपला! — लोणीकंद पोलिसांनी नंदुरबारमधून संपूर्ण माल हस्तगत करून आरोपीला जेरबंद केले
पुणे: अत्यंत कुशल तपास आणि तातडीच्या कारवाईत पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलिस स्टेशनने ३५ लाख रुपये किंमतीचा चोरीचा माल नंदुरबारमधून हस्तगत करत आरोपीला जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील व्यापाऱ्यांमध्ये दिलासा व्यक्त करण्यात आला आहे. ही घटना मा. भगवती ट्रान्सपोर्ट कंपनी, रांजणगाव (ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याकडे घडली होती. कंपनीच्या कंटेनर ट्रक (क्र. MH-12-TV-1024) मध्ये हायर कंपनीचे १२० फ्रिज...








