“बिल्डर-शाळा माफियांनी गिळला नैसर्गिक नाला, राहटणी-काळेवाडी बुडण्याच्या उंबरठ्यावर” – लोकसेवक युवराज दाखले यांचा आरोप, अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड(प्रतिनिधी)दि. २५ मे २०२६: प्रभाग क्र. २७ राहटणी-काळेवाडी, साई सागर कॉलनी, वृंदावन कॉलनी तापकीर नगर परिसरातील नैसर्गिक नाल्यावर बांधकाम व्यावसायिक व एका नावाजलेल्या इंग्रजी शाळा व्यवस्थापनाने संगनमत करून बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा खळबळजनक आरोप लोकसेवक युवराज दाखले यांनी केला आहे. पावसाळा 20 दिवसांवर असताना हे अतिक्रमण न हटवल्यास संपूर्ण परिसर महापुरात बुडून जीवितहानी होईल, असा इशारा दाखले यांनी दिला आहे. लोकसेवक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट; महाराष्ट्राच्या विकास प्रकल्पांवर सविस्तर चर्चा
देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांची आज नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून राज्यातील सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. भेटीदरम्यान महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, उद्योग, शेती, जलसंधारण, रोजगारनिर्मिती, परिवहन व्यवस्था, ग्रामीण विकास तसेच विविध लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाली. राज्याच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या...
वरळी येथे स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली; राज्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती
मुंबई | वरळी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर, अभ्यासू आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी उपमुख्यमंत्री स्व. Ajit Pawar यांना आज वरळी येथे आयोजित शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दादांच्या निधनाने राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी आजही प्रकर्षाने जाणवत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या शोकसभेला राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती लाभली. माननीय राज्यपाल Acharya Devvrat, माननीय...
उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केली निगडी प्राधिकरण अग्निशमन केंद्राच्या कामाची पाहणी…
दि.१८ फेब्रुवारी २०२६ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून निगडी प्राधिकरण येथे नवीन अग्निशमन केंद्राच्या इमारतीच्या काम सुरू आहे. या इमारतीच्या कामाची महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी संबधित अधिका-यांकडून कामाची माहिती घेत काम मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य़ विभागाअंतर्गंत निगडी प्राधिकरण येथील डॉ. हेडगेवार भवनाजवळ अत्याधुनिक अशा अग्निशमन क्रेंद्राचे काम...
लातूरमध्ये स्वतंत्र सोयाबीन संशोधन केंद्रासाठी २५ कोटींच्या विशेष निधीची मागणी; केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट
नवी दिल्ली : लातूर येथे स्वतंत्र सोयाबीन संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी विशेष अनुदान मंजूर करण्याची मागणी करत केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री Shivraj Singh Chouhan यांची नवी दिल्लीत भेट घेण्यात आली. महाराष्ट्रातील विशेषतः लातूर जिल्ह्यात सोयाबीन हे प्रमुख नगदी पीक बनले असून, स्थानिक परिस्थितीनुसार संशोधनाची अत्यंत गरज असल्याचे यावेळी मांडण्यात आले. महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाडा विभागात, सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय...
“पिंपरी-चिंचवडमधील कारभारी बदला… शहराला नवा श्वास द्या!” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पिंपरी-चिंचवडकरांना थेट आवाहन
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कामांमध्ये भ्रष्टाचार, निविदांतील रिंग, रस्ते कामांतील गैरप्रकार, कुत्र्यांच्या नसबंदीतील घोटाळे, डांबरी रस्त्यावर सिमेंट टाकण्यासारखे प्रकार, लाचप्रकरणात स्थायी समिती अध्यक्षाची अटक, कोयता गॅंगचा उच्छाद – अशा अनेक गंभीर घटना शहरात घडल्या आहेत. या सत्ताधाऱ्यांच्या राजवटीवर बोट ठेवण्याऐवजी, यात सुधारणा घडवून आणण्यासाठी “शहरातील कारभारी बदला” असे स्पष्ट आणि ठाम आवाहन शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी-चिंचवडकरांना...
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अभिवादन
पिंपरी, दि. २८ मे २०२६ : महान क्रांतिकारक, साहित्यिक आणि स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत आयोजित कार्यक्रमात सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रभक्ती,...
एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मानवी केंद्रित जागतिक एआय परिसंस्थेची हाक; योग्य धोरणांनीच तंत्रज्ञानाचा सकारात्मक परिणाम शक्य
नवी दिल्ली : एआय इम्पॅक्ट समिटच्या ‘लीडर्स प्लेनरी’ सत्रात जागतिक नेत्यांसमोर केलेल्या भाषणात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात मानवी मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून जागतिक परिसंस्था उभारण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. तंत्रज्ञानातील प्रत्येक मोठा बदल मानवजातीसाठी आव्हानांसोबत संधीही घेऊन येतो, आणि एआयची वाढ ही अशाच ऐतिहासिक टप्प्यांपैकी एक असल्याचे नमूद करण्यात आले. या परिषदेत विविध देशांचे धोरणकर्ते, तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य उद्योजक, संशोधक आणि...
लातूरचा सर्वांगीण विकास हाच आमचा संकल्प; महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ६१ उमेदवारांसह मैदानात – सभेत ठाम निर्धार
लातूर ही धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपणारी मराठवाड्याची महत्त्वाची भूमी आहे. डाळी, तेलबिया आणि धान्य व्यापारामुळे लातूरची ओळख देशभरात एक सक्षम व्यापारी केंद्र म्हणून आहे. अशा या लातूर भूमीत ग्रामदैवत सिद्धेश्वर-रत्नेश्वर, हजरत सुरज शहा वली आणि राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना नमन करून लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ निमित्त आयोजित भव्य सभेत उपस्थितांना संबोधित करण्यात आले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी...
‘स्क्रीनवर नव्हे, विचारांनी स्मार्ट व्हा; स्वतःची ताकद ओळखा’ – आमदार अमित गोरखे
पुणे : 'आजच्या तरुण पिढीमध्ये अफाट क्षमता आहे, मात्र मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे ते स्वतःची खरी ताकद विसरत आहेत. करिअरच्या शर्यतीत धावताना शारीरिक आणि मानसिक फिटनेस जपला, तरच मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःचा ‘स्व’ ओळखून, ध्येय निश्चित करून यशाकडे वाटचाल करावी,' असे प्रेरणादायी आवाहन आमदार अमित गोरखे यांनी केले. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर...









