महाराष्ट्र
ढगफुटीमुळे दौंड-बारामतीत पूरस्थिती! नीरा डावा कालवा फुटल्याने घरं, रस्ते जलमय; अजित पवार घटनास्थळी हजर
पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले असून दौंड, बारामती, इंदापूर परिसरात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः बारामती आणि दौंडमध्ये रविवारी एकाच दिवसात अर्धा वर्षभराचा पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. यात नीरा डावा कालवा फुटल्याने काटेवाडी, कान्हेरी, पिंपळी, भवानीनगर परिसरात पाणी घरात घुसल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. कालवा फुटल्यामुळे अनेक रस्ते, महामार्ग जलमय झाले असून काटेवाडी-भवानीनगर...
आमदार अमित गोरखे यांच्या निवेदनाची दखल घेत महापालिका आयुक्तांनी भामा आसखेड धरणातील गाळ काढण्यासाठी जिल्हा जलसंधारण विभागाला दिले तातडीचे आदेश
पिंपरी-चिंचवड शहराला भेडसावणारी पाण्याची तीव्र टंचाई दूर करण्यासाठी आणि भविष्यातील पाणीसाठा सुरक्षित करण्यासाठी आमदार अमित गोरखे यांनी पाऊल उचलले आहे. भामा आसखेड धरणातील साचलेला गाळ काढून धरणाची मूळ साठवण क्षमता वाढवण्यात यावी, यासाठी आमदार गोरखे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले होते. त्यांच्या मागणीची दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने जिल्हा जलसंधारण विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे...
पेट्रोल पंपावरील मॅनेजरला मारहाण करून रोख रकमेसाठी लुटण्याचा प्रयत्न: तीन बालक भारतीय विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात
पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीत खडकमाळआळी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी, एका 31 वर्षीय पेट्रोल पंप मॅनेजरला अज्ञात तीन मुलांनी जबरदस्तीने मारहाण केली आणि त्याच्या बॅगेत असलेली 3,86,000/- रुपयांची रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. घटनेचा तपशील: दुपारी साडेचारच्या सुमारास, एमबीएफएस पेट्रोल पंपावरील मॅनेजर बॅगेसह रोख रक्कम बँकेत जमा करण्यासाठी जात असताना ही घटना...
‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ लवकरच जाहीर होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात दिली. 🟠 महान योगदान देणाऱ्यांचा गौरव मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असून हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला प्रदान केला जातो. 🟠 पुरस्कार...
तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलिदान स्थळ तुळापूर (ता. हवेली) व समाधी स्थळ मौजे वढू बुद्रुक (ता. शिरूर) दरम्यान नवीन रस्त्याची निर्मिती व भीमा नदीवरील पुल विकास कामांचा अंतर्भाव असलेल्या 532.51 कोटी किमतीच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी...
ठाणे रिंग मेट्रोसाठी महा मेट्रोने भू-तांत्रिक तपासणी सुरू,
ठाणे – ठाणे शहराच्या पाश्चिमेकडील वर्तुळाभोवती २९ किलोमीटरचा ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाची भू-तांत्रिक तपासणी (Geo-Technical Investigation) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) ने सुरू केली आहे. या प्रकल्पासाठी अंदाजित खर्च १२,२००.१० कोटी रुपये असून, हा खर्च केंद्र व राज्य सरकारकडून समान प्रमाणात केला जाणार आहे. याशिवाय, द्विपक्षीय एजन्सींचे अतिरिक्त सहकार्यही मिळणार आहे. प्रकल्पाची वैशिष्ट्ये लांबी: २९ किलोमीटर स्थानके: २२...
मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण बैठक — जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डे यांचे स्पष्ट निर्देश
पुणे, मावळ तालुक्यातील विविध विकास कामांबाबत आज एक महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी मा. श्री. जितेंद्र दुड्डे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीत लोणावळा भांगरवाडी पुल, कृपावश नियुक्त्या, भाजी मार्केट, घरकुल योजना, मागासवर्गीय मुलींसाठी वसतिगृह, आदिवासी मुलांसाठी वसतिगृह, आणि अभ्यास प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कामे ठराविक वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश मा. जिल्हाधिकारी दुड्डे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांमध्ये...
विवाहाचा पहिला वाढदिवस सेवेला अर्पण; ‘मंगल सेवा’ उपक्रमातून दरवर्षी ५०० दिव्यांग नववधूंना आर्थिक आधार
पुणे :जीत आणि दिवा या दांपत्याने त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा पहिला वाढदिवस अतिशय वेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा करत समाजासमोर सेवाभावाचे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. आजच्या दिवशीच गेल्या वर्षी त्यांनी संसारासोबत समाजसेवेचा संकल्प करत ‘मंगल सेवा’ हा उपक्रम सुरू केला होता, ज्याअंतर्गत दरवर्षी ५०० नवविवाहित दिव्यांग बहिणींना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे व्रत त्यांनी घेतले आहे. या उपक्रमामुळे...
नाशिक : आयर्न रॉडने भरलेल्या ट्रकला टेम्पोने धडक; सहा ठार, दोन गंभीर जखमी, वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प.
नाशिक: नाशिकमधील द्वारका सर्कलजवळील उड्डाणपुलावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. यामध्ये दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा घटनाक्रम: रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास निफाड येथील धार्मिक कार्यक्रम आटोपून १६ प्रवाशांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर सिडको परिसराकडे निघाला होता. या टेम्पोने आयर्न रॉडने भरलेल्या ट्रकला मागून...
राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये लवकरच पदभरती; मनुष्यबळाची कमतरता दूर होणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
नागपूर : राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये दीर्घकाळापासून जाणवत असलेली मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी आकृतीबंधानुसार पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत केली. वित्त विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानपरिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी कृषी विद्यापीठांतील मनुष्यबळाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेला उत्तर देताना...












