महाराष्ट्र
एमबीबीएस विद्यार्थीनीने नदीत उडी घेतली; लोकांनी केवळ पाहिले, पण कोणी मदतीसाठी पुढे आले नाही; मुलीच्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
चंद्रपूर: ब्रह्मपुरी येथील तरुण एमबीबीएस विद्यार्थिनीने वैनगंगा नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे, ही धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. नदीतील कमी पाण्यात वाचल्यानंतरही तिने पुन्हा खोल पाण्यात उडी घेतली आणि दुर्दैवाने मृत्यू झाला. पोलिसांनी तिचे शरीर नदीतून बाहेर काढले आहे आणि पुढील तपास सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. माहितीनुसार, आत्महत्या...
फरार आरोपीस येरवडा पोलिसांची शिताफीने जेरबंदी — मोक्का अंतर्गत मोठी कारवाई!
पुणे : येरवडा पोलीस स्टेशनच्या पथकाने सहा महिन्यांपासून फरार असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीस अखेर गजाआड करण्यात यश मिळवले आहे. हा आरोपी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणात फरार होता. पोलिसांच्या दक्षतेमुळे आणि गुप्त बातमीच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आली. गुन्हा क्रमांक १८३/२०२५ अंतर्गत आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ११८ (१), ११८ (२), ३५१(३)(५), आर्म्स...
पुण्यात पावसाचा कहर: तिघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू, एका हॉटेल व्यावसायिकाचा दरड कोसळून मृत्यू.
पुणे: गुरुवारी पुण्यात जोरदार पावसामुळे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तिघांचा विजेचा धक्का लागून पुणे शहरात मृत्यू झाला तर ग्रामीण पुण्यात एका हॉटेल व्यावसायिकाचा दरड कोसळून मृत्यू झाला. पुळाची वाडी परिसरात झेड ब्रिजखाली नदीच्या पात्रात तिघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मृतांमध्ये अभिषेक अजित घाणेकर (२५), आकाश विनायक माने (२१) आणि शिव जिदबहादूर परिहार (१८) यांचा...
लोणीकाळभोर पोलिसांची मोठी धडक! अवैध जुगार अड्ड्यावर छापा, ५.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त
लोणीकाळभोर (पुणे) – लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढत्या अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेअंतर्गत आणखी एक मोठी कारवाई करत अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकून तब्बल ५,४३,०१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार व्यवसायांना मोठा आळा बसला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे यांच्या निर्देशानुसार, अवैध धंद्यांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी स्वतंत्र...
देवभूमीला नवसंजीवनी — ५ पवित्र ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी ८८२ कोटींचा भव्य आराखडा!
मुंबई | महाराष्ट्रातील ५ पवित्र ज्योतिर्लिंगांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एकूण ₹८८२ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करून धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन आणि स्थानिक विकासाला एकाच वेळी चालना देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे केवळ मंदिर परिसराचा विकासच होणार नाही, तर भाविकांच्या सोयीसुविधा, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही गती मिळणार आहे. विकासाचा व्याप: या आराखड्यात...
उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांचा राजीनामा; महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
नवी दिल्ली : देशाचे उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी रात्री उशिरा अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी प्रकृती ठीक नसल्याचे कारण पुढे करत आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. रात्री साधारणतः १० वाजता त्यांनी आपला राजीनामा सादर केला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यावर स्वाक्षरी करणार की नाही, याची अधिकृत घोषणा काही तासांत होण्याची शक्यता...
“श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” च्या वतीने निराधार निवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना छावा चित्रपटाच्या विशेष प्रिमीअर शोचे आयोजन
भक्तिमय विचारधारणेतून संघटित युवा शक्ती, "श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे" च्या वतीने खेड येथील वाडा रोड स्थित एका निराधार निवासी वसतीगृहातील एकूण ५० गरजवंत विद्यार्थ्यांना राजगुरुनगर येथील सत्यम थिएटर्स या चित्रपट गृहामध्ये "हिंदवी स्वराज्य संरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज" यांच्या जीवनपटावर आधारित नुकताच प्रसिद्ध झालेला "छावा" या चित्रपटाचा विशेष प्रिमीअर शो आयोजित केला गेला. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावरील चित्रीत झालेला...
“मी पुन्हा येईन” ची गाजलेली घोषणा! विश्व मराठी संमेलनात देवेंद्र फडणवीस यांची तुफान फटकेबाजी
पुण्यात आयोजित विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जोशपूर्ण भाषणाने वातावरणात चैतन्य आणले. "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन" अशी जोरदार फटकेबाजी करत त्यांनी संमेलनात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या घोषणेमुळे उपस्थित मराठी रसिकांमध्ये उत्साह संचारला आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मराठी माणसाची जगभर छाप – दावोसचा किस्सा फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात दावोस दौऱ्याचा उल्लेख...
भरधाव कारची भीषण धडक; अल्पवयीन मुलाचा मृत्यू – कोंढवा पोलिसांनी आरोपी चालकास केली तात्काळ अटक
कोंढवा परिसरातील भोलेनाथ चौकात भरधाव वेगात चालविलेल्या कारच्या धडकेत एक १३ वर्षांचा अल्पवयीन मुलगा जागीच ठार झाला असून, या प्रकरणाने संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. अपघातानंतर कोंढवा पोलिसांनी तात्काळ कार चालकाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. अपघाताची संपूर्ण घटना दि. १८ मे रोजी जैद नसिर शेख (वय २३, रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) हा त्याच्या काही...
डोंबिवलीच्या वीर पुत्रांना अश्रूपूरित श्रद्धांजली; सहस्रोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
डोंबिवली – एक शोकाकुल आणि हृदयद्रावक क्षण: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन नागरिक, अतुल मोणे, संजय लेले आणि हेमंत जोशी यांना आपले प्राण गमवावे लागले. मंगळवारी झालेल्या हल्ल्यानंतर आज त्यांच्यावर डोंबिवली दत्तनगर येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. या अंतिम निरोपाच्या क्षणी संपूर्ण डोंबिवली शहर हळहळून गेले. बागशाळा मैदानावर ठेवले गेले अंत्यदर्शनासाठी पार्थिव:संध्याकाळच्या सुमारास डोंबिवलीतील बागशाळा...














