महाराष्ट्र
गांज्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी उधळली! — अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई, २६ किलो गांजासह रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद
पुणे प्रतिनिधी | पुणे शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहीमेअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथक १ (क्राईम ब्रँच, पुणे शहर) यांनी एका मोठ्या कारवाईत २६ किलो ८० ग्रॅम गांजासह एक रेकॉर्डवरील गुन्हेगार अटक केला आहे. आरोपीकडून मोटार गाडी, मोबाईलसह एकूण २१.१६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी कोण? अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव अनिल ऊर्फ अण्णा सुभाष राख (वय...
धुळवडी निमित्त टेंभीनाका येथील आनंदआश्रमात अभिवादन; शिवसेना परिवारातील दुःखामुळे साधेपणाने सण
ठाणे : धुळवडीच्या पारंपरिक सणानिमित्त आज ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंदआश्रम येथे उपस्थित राहून वंदनीय गुरुवर्य Anand Dighe साहेब तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट Bal Thackeray यांच्या प्रतिमेला रंग अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे श्रद्धा, निष्ठा आणि कृतज्ञतेच्या भावनेतून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणांनी आणि जयजयकारांनी परिसर दुमदुमून गेला. मात्र यंदा शिवसेना परिवारातील...
सलीम खान यांच्या प्रकृतीत सुधारणा; आमिर खान यांची भेट, कुटुंबीय आशावादी
मुंबई : ज्येष्ठ पटकथालेखक Salim Khan यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याची माहिती अभिनेते Aamir Khan यांनी दिली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आमिर खान यांनी सकारात्मक अपडेट देत “सलीम साहेब लवकरच बरे होऊन घरी परततील,” असा विश्वास व्यक्त केला. बुधवारी Mumbai Press Club च्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आमिर खान यांना माध्यमांनी सलीम खान यांच्या प्रकृतीविषयी विचारले...
पहिल्या कसोटीत भारताचा धक्कादायक पराभव — गंभीरांवर तुफान टीका, दबाव वाढल्याने गाठले गुवाहाटीचे प्रसिद्ध कामाख्या मंदिर
गुवाहाटी : भारताच्या पहिल्या कसोटीत झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारतीय संघ व्यवस्थापन आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर प्रचंड टीका झाली आहे. तीन दिवसांत सामना हरल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये संताप आणि निराशा पसरली. आणि त्याच दरम्यान गौतम गंभीर यांनी गुरुवारी सकाळी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, गुवाहाटीतील ऐतिहासिक कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांचा मंदिरातील हा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर वणव्यासारखा...
श्री तुळशीबाग गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मदतनिधी वितरित
पुणे – गणेशोत्सव म्हटला की सर्वसामान्यांच्या मनात उत्साहाची लहर उसळते, मात्र त्याचवेळी अनेक मंडळे सामाजिक बांधिलकी जपत समाजातील वंचित घटकांसाठी विधायक कार्यही करत असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला, ज्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. भोई प्रतिष्ठानच्या पुण्यजागर...
एकाच टँकरने थांबवला संपूर्ण वेग! मुंबई–पुणे एक्सप्रेस-वे २४ तास बंद; ‘हायटेक इन्फ्रास्ट्रक्चर’वर गंभीर प्रश्नचिन्ह
मुंबई/पुणे : देशातील सर्वात आधुनिक आणि वेगवान महामार्ग म्हणून ओळखला जाणारा मुंबई–पुणे एक्सप्रेस-वे एका अपघातामुळे तब्बल २४ तास ठप्प राहिल्याने राज्याच्या पायाभूत सुविधांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने झालेल्या गॅस गळतीमुळे प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली. परिणामी हजारो वाहनचालक आणि प्रवासी महामार्गावरच अडकून पडले. सुमारे ९२ किलोमीटर...
बारामतीत नागरिकांशी थेट संवाद; समस्या ऐकून तातडीने सोडवण्याचे निर्देश
पुणे जिल्ह्यातील Baramati येथे आज सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या विविध समस्या आणि अडचणी जाणून घेण्यासाठी विशेष भेटीगाठी आयोजित करण्यात आल्या. या संवादादरम्यान नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध प्रश्न मांडले, तर त्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी संबंधित प्रशासनाला तातडीने आवश्यक सूचना देण्यात आल्या. या भेटीत नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, वीज सुविधा, शासकीय योजनांचा लाभ तसेच स्थानिक विकासकामांबाबत विविध मुद्दे...
अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालातील ७ धक्कादायक मुद्दे; वैमानिक संभाषणाने निर्माण केली खळबळ!
अहमदाबाद | 12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर तब्बल 260 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यातील 241 प्रवासी होते. आता या दुर्घटनेच्या विमान अपघात अन्वेषण ब्युरो (AAIB) ने दिलेल्या प्राथमिक अहवालामुळे अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. हा अहवाल अंतिम निष्कर्ष नसला तरी, यातून अपघाताच्या क्षणांमधील घटनाक्रमाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री उशिरा प्रसिद्ध झालेल्या या रिपोर्टमध्ये कॉकपिट...
मुंबई पावसाचा कहर! रेड अलर्ट जारी, पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा; ठाणे-रायगड रेड, पुणे-कोल्हापूर ऑरेंज अलर्टवर
दिनांक: १५ जुलै २०२५ | मुंबई :- मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा बसत आहे. सततच्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट, तर ठाणे, रायगड, मुंबई उपनगरासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे.पुणे, सातारा, अहमदनगर ऑरेंज अलर्टवर, तर कोल्हापूर, गडचिरोली, पालघर, सांगली आणि गोंदिया यलो अलर्टवर आहेत. वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम अंधेरी पश्चिमेतील अंधेरी सबवे...
अभिषेक–रिंकूचा धडाका, न्यूझीलंडसमोर भारताचे 239 धावांचे आव्हान
भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत विक्रमी धावसंख्या उभारली आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून तब्बल 238 धावा केल्या असून न्यूझीलंडसमोर 239 धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात युवा फलंदाज अभिषेक शर्मा याने आपल्या तुफानी खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या 35 चेंडूत 84 धावा करताना त्याने 5...









