Breaking News

Home Breaking News Page 99

हिंजवडीचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत ऐतिहासिक निर्णय

0

मुंबई/पुणे – 10 जुलै 2025 : पुण्याच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मुख्य केंद्र असलेल्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड वाहतूक कोंडी आणि अपुरी पायाभूत सुविधा यामुळे हजारो नागरिक आणि आयटी कर्मचाऱ्यांना रोजचा त्रास सहन करावा लागत होता. अखेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या समस्येच्या कायमस्वरूपी समाधानासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. हिंजवडी ते वाकड –...

मुंबईत उन्हाचा चटका वाढला! वाऱ्याचा अभाव आणि प्रदूषणामुळे हवामानाचा अंदाज बदलता

0

मुंबई, १३ फेब्रुवारी २०२५: मुंबईकरांना आजही उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत असून, हवामान विभागाच्या (IMD) अहवालानुसार सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३२.९ अंश सेल्सियस तर किमान तापमान १७.१ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. तसेच, कोलाबा वेधशाळेतील नोंदीनुसार, कमाल तापमान ३० अंश तर किमान तापमान १९.७ अंश सेल्सियस होते. तापमान वाढले, पण आकाश मोकळे भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढील २४...

पुण्यात थंडीला तात्पुरता दिलासा; १९ डिसेंबरपासून पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता

0

पुणे | गेल्या आठवडाभरापासून तीव्र थंडीचा सामना करणाऱ्या पुणेकरांना बुधवारी रात्री तात्पुरता दिलासा मिळाला. शहरात किमान तापमान दुहेरी अंकात नोंदवले गेले असून, शिवाजीनगर येथे किमान तापमान १०.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. मात्र, हवामान तज्ज्ञांच्या मते हा दिलासा अल्पकालीन असून १९ डिसेंबरपासून पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही थंडी २०२५ वर्षाच्या अखेरपर्यंत टिकून राहण्याची चिन्हे आहेत. सध्या पुणे...

रेल्वे सुधारणा निर्णयामुळे मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासात मोठा बदल होणार

0

मुंबई – शहरातील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सुविधांवर लक्ष केंद्रित करत केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री मा.श्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले जात आहेत. या निर्णयांनुसार मुंबईतील लोकल तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे. प्रवाशांना अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी प्रवास मिळावा,...

पाच महिन्यांनंतर भाविकांसाठी खुलं झालं भीमाशंकर मंदिर; ऑनलाइन नोंदणी अनिवार्य, VIP दर्शन पूर्णपणे बंद

0

पुणे : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. विकासकामांमुळे 9 जानेवारी 2026 पासून बंद असलेले हे मंदिर 15 जूनपासून दर्शनासाठी खुले झाले असले तरी जिल्हा प्रशासनाने यावेळी काही कठोर नियम लागू केले आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात...

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उत्साहात प्रारंभ; उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची विधिमंडळात उपस्थिती

0

राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून उत्साहात सुरू झाले असून संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष या अधिवेशनाकडे लागले आहे. विविध महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा, आर्थिक धोरणांची मांडणी आणि राज्याच्या विकास आराखड्याचा आढावा या अधिवेशनात घेतला जाणार आहे. आज विधिमंडळ परिसरात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार या सभागृहाच्या कामकाजासाठी उपस्थित राहिल्या. सकाळी त्या विधिमंडळात दाखल झाल्यानंतर अनेक आमदारांनी त्यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. आगामी...

कल्याणमध्ये मनसेचा आक्रमक अंदाज; कोचिंग क्लासच्या संचालकाला थप्पड, विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा आरोप

0

कल्याण : मुंबईतील कल्याण परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांनी एका कोचिंग क्लासच्या संचालकाला चक्क थप्पड मारली असून, या घटनेमुळे शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. संबंधित क्लासच्या विरोधात विद्यार्थ्यांकडून अनेक तक्रारी आल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट क्लासमध्ये जाऊन संचालकाला जाब विचारला आणि त्यानंतर ही घटना घडली. मनसे पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की, कोचिंग सेंटरच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून अवास्तव फी घेतली जात आहे. अभ्यासक्रम...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कोका-कोला बेव्हरेजेससोबत सामंजस्य करार

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासन आणि हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड (HCCB) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारांचा उद्देश स्थानिक पातळीवर उद्योग व प्रशासन यांच्यातील सामंजस्य अधिक दृढ करणे, रोजगार संधी वाढवणे आणि सामाजिक तसेच पर्यावरणीय उपक्रमांना चालना देणे असा आहे. या सामंजस्य करारांतर्गत पुढील जिल्ह्यांचा समावेश आहे: पुणे जिल्हा प्रशासन + HCCB पालघर जिल्हा...

८ महिन्यांत ६१ हजारांहून अधिक नागरिकांना उच्च रक्तदाब, तर ३९ हजारांना डायबिटीसचा धक्का!

0

पुणे: वेगवान जीवनशैली, वाढता ताण आणि अनियमित आहारामुळे पुणेकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या ८ महिन्यांत तब्बल ६१,७३२ नागरिकांना उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाले आहे. त्याच कालावधीत ३९,९७० नागरिकांना मधुमेह असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आकडे शहरातील जीवनशैली किती धोकादायक पातळीवर पोहोचली आहे, याचे गंभीर चित्र समोर आणतात. शहरातील ७,२२,३२७ नागरिकांची तपासणी...

1 ऑगस्टपासून NPCI ने लागू केले नवीन FASTag नियम; 31 ऑक्टोबरपर्यंत नियमांचे पालन करणे आवश्यक.

0

1 ऑगस्ट 2024 पासून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने टोल संकलन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, ट्रॅफिकची गर्दी कमी करण्यासाठी आणि देशाच्या रस्त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवीन FASTag नियम लागू केले आहेत. या बदलांसोबतच, वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यांची अद्ययावतता सुनिश्चित करावी लागणार आहे, अन्यथा टोल प्लाझांवर त्रास सहन करावा लागू शकतो. पालन न केल्यास होणारे परिणाम: 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत नवीन नियमांचे पालन...

Copyright ©