Breaking News
केयूडब्ल्यूजे महाराष्ट्र निवडणुकीत डॉ. शिवा मुदिगेरे अध्यक्ष, दयानंद सल्यान सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवडून; पत्रकार संघटनेला नवे नेतृत्व
नवी मुंबई :- पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटक वर्किंग जर्नलिस्ट असोसिएशन (Karnataka Working Journalists Association - KUWJ) च्या महाराष्ट्र युनिटच्या निवडणुकीत नव्या नेतृत्वाची निवड झाली आहे. २०२५ ते २०२८ या कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. शिवा मुदिगेरे यांची अध्यक्षपदी, तर सा. दया (दयानंद सल्यान) यांची सरचिटणीसपदी एकमताने व बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीची...
“इंडिया मेरीटाईम वीक २०२५” — भारताच्या सागरी सामर्थ्याचे दर्शन!
मुंबई : भारताच्या सागरी क्षेत्रातील प्रगती, तंत्रज्ञान, आणि व्यापार क्षेत्रातील नव्या संधींचा उत्सव म्हणून “इंडिया मेरीटाईम वीक २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सागरी मंडळ, मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील सागरी उद्योगातील तज्ज्ञ, उद्योजक आणि धोरणनिर्माते या आठवड्यात सहभागी होणार आहेत. या वर्षीचा मेरीटाईम वीक...
मराठा आंदोलकांसोबत सरकारचा दगाफटका? रोहित पवारांचा गंभीर आरोप
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली असून हजारोंच्या संख्येने आंदोलकांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थिती लावली आहे. जरांगे पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की "मराठ्यांच्या अंगावर गुलाल उधळल्याशिवाय मी इथून जाणार नाही". यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या उपोषणाकडे लागले आहे. दरम्यान, या चळवळीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून दगाफटका होत असल्याचे आरोप पुढे येत आहेत....
विधानसभेत पुणे शहराच्या वाहतूक व अतिक्रमण प्रश्नांवर आमदार हेमंत रासने यांचा ठाम आवाज! महापालिका प्रशासनावर सवालांचा भडीमार
मुंबई | पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यावरील अतिक्रमण, पार्किंगची अराजक स्थिती आणि अनधिकृत होर्डिंग्ज या गंभीर समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका व पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर आमदार हेमंत रासने यांनी आज विधानसभेत आवाज उठवत ठोस कृतीची मागणी केली. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पुणेकरांच्या जीवनाशी निगडीत या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करताना आमदार रासने यांनी प्रशासनाला सवाल केला की, "महापालिकेचे अतिक्रमणविरोधी...
ठाण्यातून 14 वर्षीय मुलगी बेपत्ता! अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल
🔹 गौतमी स्कूलमधून 14 वर्षीय मुलगी बेपत्ता 🔹 ठाणे नगर पोलीस स्टेशनकडून नागरिकांना मदतीचे आवाहन 🔹 अपहरणाचा गुन्हा दाखल, तपास सुरू ठाणे : ठाणे पश्चिम येथील गौतमी स्कूलमधून 14 वर्षीय मुलगी पूजा हरसन राम पुरोहित हिला कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संदर्भात ठाणे नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तिचा शोध घेत...
मुंबई पावसाचा तडाखा! दादरच्या रस्त्यांवर पाणी साचले; वाहतुकीची कोंडी, नागरिकांची मोठी गैरसोय
मुंबई : मुंबईकरांसाठी आजचा दिवस पुन्हा एकदा पावसाळी समस्यांनी ग्रासलेला ठरला आहे. सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे दादर परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाण्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 🔹 वाहतुकीवर मोठा परिणाम दादर टीटी परिसर, सेनापती बापट मार्ग, हिंदमाता, नायगावकडे जाणारे रस्ते याठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. अनेक वाहनं बंद पडली...
जय गायकवाडला पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून तडीपार; कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा मोठा निर्णय
खराडी (पुणे) — पुणे शहरातील गुन्हेगारीवर कडक लगाम घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुन्हा एकदा ठोस पाऊल उचलले आहे. खराडी पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी जय गौरव गायकवाड (वय २०), रा. दिनकर पठारे वस्ती, लेन नं. २, पप्पु शिंदे यांचे घरासमोर, खराडी, पुणे याला तडीपार करण्यात आले आहे. या आरोपीविरुद्ध विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्याच्या हालचालींमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती....
कोरेगाव भीमा शौर्यदिन सोहळा: प्रशासन सज्ज, अनुयायांसाठी विशेष तयारी आणि वाहतुकीत बदल
कोरेगाव भीमा येथे दरवर्षी १ जानेवारीला आयोजित होणारा शौर्यदिन सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या विशेष प्रसंगासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, देशभरातून येणाऱ्या अनुयायांच्या स्वागतासाठी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. यंदा ८ ते १० लाख अनुयायी कोरेगाव भीमा येथे उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुरक्षेसाठी प्रशासनाने पाच हजार पोलीस कर्मचारी, ७५० अधिकारी, १,००० होमगार्ड,...
सैफ अली खानवर हल्ला प्रकरण: ‘पराठा’साठी केलेल्या यूपीआय व्यवहारातून आरोपीचा पोलिसांनी लावला छडा
मुंबईच्या बांद्रा येथील निवासस्थानी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर तीन दिवसांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्यात मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. या हल्ल्याप्रकरणी बांगलादेशी आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर याला रविवारी अटक करण्यात आली. सैफ अली खान यांना या हल्ल्यात अनेक वेळा चाकूने भोसकण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात पाच तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली. यूपीआय व्यवहार...









