Breaking News
मोबाईल हरवले? पर्वती पोलिसांनी दिला दिलासा! तब्बल ६ लाखांचे २० मोबाईल शोधून नागरिकांना परतवले | पुणे पोलिसांची उल्लेखनीय सेवा
पुणे | २६ जुलै २०२५ — पर्वती पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात मागील काही महिन्यांपासून नागरिकांकडून मोबाईल हरवल्याच्या तक्रारी वाढत होत्या. मात्र पर्वती पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सातत्यपूर्ण तपास व इमानदारीने कार्य करत तब्बल ₹६,००,००० किंमतीचे २० हरवलेले मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले. ही कामगिरी पुणे पोलिसांच्या जनतेप्रती असलेल्या सेवाभावाची आणि कार्यक्षमतेची प्रचिती देणारी ठरली आहे. मोबाईल हरवले, पण पर्वती...
विश्रांतवाडीत पिस्तुलचा धाक दाखवणारा गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात! विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुस जप्त
पुणे | विश्रांतवाडी परिसरात पिस्तुलचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्हेगाराकडून एक विदेशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, सुमारे ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. घटनेचा सविस्तर तपशील: दि. 10 जुलै रोजी विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथक गस्त घालत असताना पो. अं. संपत...
वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचा वाद – भारतात विशेष सवलती असूनही असंतोष का?
भारत हा एकमेव देश जिथे वक्फ बोर्डाच्या मालमत्ता प्रचंड प्रमाणात राखल्या जातात, तर अनेक इस्लामिक देशांमध्ये अशा मालमत्तांची संकल्पना अस्तित्वात नाही. तरीही, काही समुदायांकडून असंतोष व्यक्त केला जात आहे. वक्फ बोर्ड म्हणजे काय? 📌 वक्फ बोर्ड म्हणजे मुस्लिम समाजाच्या धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक कल्याणासाठी स्थापन केलेली संस्था.📌 या बोर्डाच्या अखत्यारीत संपूर्ण भारतभर हजारो कोटी रुपयांच्या मालमत्ता आहेत.📌 अनेक इस्लामिक राष्ट्रांमध्ये मात्र...
“ICGS ‘समुद्र प्रताप’चा सेवेत समावेश : आत्मनिर्भर भारत, सागरी सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वततेकडे महत्त्वपूर्ण पाऊल”
भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात इंडियन कोस्ट गार्ड शिप (ICGS) ‘समुद्र प्रताप’ या अत्याधुनिक जहाजाचा अधिकृतपणे सेवेत समावेश करण्यात आला असून, हा क्षण देशाच्या सागरी इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. ‘समुद्र प्रताप’चे कमिशनिंग अनेक कारणांनी उल्लेखनीय ठरत असून, विशेषतः आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बळ देणारा हा ठोस पुरावा आहे. हे जहाज देशांतर्गत तंत्रज्ञान व संसाधनांच्या आधारे विकसित करण्यात आले...
“पंढरपूर : विठ्ठल मंदिराच्या गुप्त तळघरात सापडल्या प्राचीन मूर्ती”
श्री विठ्ठल मंदिर, पंढरपूर येथील मंदिरात तळघरात सापडली विष्णू बालाजीची प्राचीन मूर्ती, चतुर्भुज विठ्ठल आणि तुळजाभवानी यांच्या मूर्ती तसेच पादुका व काही जुन्या मुर्त्यांचे अवशेष सापडले आहेत. शोधामध्ये दोन मोठ्या वेंकटेश मूर्ती सापडल्या आहेत, प्रत्येक अंदाजे तीन ते साडेतीन फूट उंच आहेत. विविध आकारांच्या इतर मूर्ती देखील सापडल्या आहेत, तसेच एक देवीची मूर्ती आणि प्राचीन नाणी आढळली आहेत. दिव्य पादुका...
ड्रग्स तस्करांवर ‘मकोका’चा घाव! मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानपरिषदेत मोठी घोषणा; अंमली पदार्थांवरून राज्य सरकार आक्रमक
मुंबई, २ जुलै २०२५ : राज्यात अंमली पदार्थांची (ड्रग्स) तस्करी झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतील चर्चेत जाहीर केलं की, आता ड्रग्स तस्करी करणाऱ्यांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ म्हणजेच ‘मकोका’ लावण्यात येणार आहे. भाजप आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेत मेफेड्रोन (एमडी ड्रग्स) च्या वाढत्या तस्करीचा मुद्दा उपस्थित केला...
मुंबईत मोठा आर्थिक घोटाळा! कोकण रेल्वे पतसंस्थेच्या माजी अध्यक्षाचा ₹2.40 कोटींच्या बनावट कर्ज प्रकरणात अटकेसाठी EOW ची कारवाई
मुंबई | १८ जून २०२५ – मुंबई पोलिसांच्या इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग (EOW) ने कोकण रेल्वे विभाग (शहरी) सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष अभिजीत देशमुख यांना अटक केली आहे. त्यांनी बनावट कर्मचारी व खोट्या कागदपत्रांच्या आधारे ₹२.४० कोटींचे कर्ज मंजूर करून संस्थेला फसवले असल्याचा आरोप आहे. तब्बल महिनाभर फरार; अखेर हिंगोलीतून अटक देशमुख हे २०२० ते २०२३ या काळात पतसंस्थेचे अध्यक्ष होते. FIR...
धाडसी सय्यद आदिलला मानवंदना! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कुटुंबीयांना ५ लाखांची मदत आणि नव्या घराचे आश्वासन
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांचे प्राण वाचवणारा २० वर्षीय सय्यद आदिल हुसैन शाह याने जगाला माणुसकी आणि शौर्याचे अद्वितीय उदाहरण घालून दिले. त्याच्या बलिदानाची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिलच्या कुटुंबीयांना वैयक्तिकरित्या ५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे तसेच त्यांच्या मोडकळीस आलेल्या घराचे पुनर्बांधणीचे...
भारत–हंगेरी संबंधांना नवे बळ; हंगेरीच्या डेप्युटी स्पीकर डॉ. लायोश ओलाह यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक
नवी दिल्ली : भारत आणि हंगेरी यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. हंगेरीच्या नॅशनल असेंब्लीचे डेप्युटी स्पीकर Dr. Lajos Oláh यांच्यासोबत उबदार आणि फलदायी चर्चा झाली. यावेळी त्यांच्या सोबत हंगेरीच्या मान्यवर प्रतिनिधीमंडळाची उपस्थिती होती. बैठकीदरम्यान संसदीय सहकार्य अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. दोन्ही देशांच्या संसदांदरम्यान संवाद, अनुभवांची देवाणघेवाण आणि संयुक्त उपक्रम वाढवण्याबाबत...
२०२६ कडे वाटचाल: पुण्याला मोठा दिलासा; बहुप्रतिक्षित हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्ग मार्च २०२६ पर्यंत सुरू होण्याची शक्यता
पुणे | पुणे शहरात गेल्या काही वर्षांत खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढली असून, अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पुणे मेट्रोला अपेक्षित प्रतिसाद अद्याप मिळालेला नसला, तरी २०२६ हे वर्ष पुणे मेट्रोसाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. शहरातील सर्वात महत्त्वाचा आणि बहुप्रतिक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर (मेट्रो लाईन-३) मार्ग मार्च २०२६...









