वाघळीची लेक रेखाताई धनगर यांना ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’; चाळीसगावचा अभिमान उंचावला
चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावची सुपुत्री रेखाताई धनगर यांनी बेसबॉल या क्रीडाप्रकारात उल्लेखनीय यश संपादन करत महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त केला आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण चाळीसगाव तालुक्याचा मान उंचावला असून ग्रामीण भागातील खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे. रेखाताई यांनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत सातत्याने आपली छाप पाडली आहे. कठोर परिश्रम,...
ज्ञानोबा-तुकाराम जयघोषात दुमदुमला टाळगाव-चिखली परिसर महापालिकेच्या शाळेत रंगला भक्ती, एकात्मता आणि परंपरेचा अद्भुत संगम
पिंपरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंती वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेत भक्तिमय वातावरणात भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव-चिखली परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा व महाविद्यालय परिसरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ-मृदुंगाच्या गजरासह टाळ-चिपळ्यांचा नाद आणि विद्यार्थ्यांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ‘ज्ञानोबा माऊली’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला होता. महिला बचत गटांच्या सदस्यांनी, स्थानिक समाजसेवकांनी, वारकरी बांधवांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. वारकरी परंपरेतील पालखी सोहळा जसा श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे, तसाच तो एकात्मता आणि सामाजिक बंध दृढ करणारा सोहळा ठरला. पालखी सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, समाज विकास विभाग उपायुक्त ममता शिंदे, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण कुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिठाचे संचालक ह. भ. प. राजू महाराज ढोरे ,डॉ. स्वाती मुळे आणि शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांच्या नियोजनामुळे आणि समन्वयामुळे संपूर्ण मिरवणूक सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.
सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा शक्तिप्रदर्शन मेळावा; माजी महापौरांसह अनेकांचा जाहीर प्रवेश
सांगली | प्रतिनिधी – सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास उपस्थित राहून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना संबोधित करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, नवचैतन्य आणि संघटनात्मक बळाचे दर्शन घडले. या मेळाव्याच्या निमित्ताने माजी महापौर श्री. मैनुद्दीन बागवान, माजी महापौर श्री. आनंदा देवमाने, तसेच अनेक माजी...
आर्थिक क्षेत्रातील ‘हक्क न सांगितलेल्या मालमत्ता निपटारा’ मोहीम नागरिकांसाठी उपयुक्त -जिल्हाधिकारी सौरभ कटियार
आर्थिक क्षेत्रातील 'हक्क न सांगितलेल्या मालमत्ता निपटारा' मोहीम केवळ वित्तीय क्षेत्रासाठीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही अत्यंत उपयुक्त आहे. नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी येथे केले. वित्तीय सेवा विभाग, अर्थ मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सल्ल्यानुसार राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसी) महाराष्ट्र व जिल्हा अग्रणी बँकेतर्फे राज्यात "हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा" या उपक्रमांतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई उपनगरमधील या शिबिराचा शुभारंभ...
“अहिल्यानगर-श्रीरामपूर ते तळेगाव दाभाडे—शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत विजयी प्रवेश; राजकारणात मोठा भूचाल!”
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिकेतील उबाठा गटाचे माजी नगराध्यक्ष आणि सह संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.या भव्य प्रवेशामुळे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडणार असल्याचे पाहिले जात आहे. ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात शिवसेना सचिव राम रेपाळे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करत भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी...
मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे भव्य स्वागत; उत्साहात नागरिकांचा सहभाग
मुंबईत आमचे नेते, भारताचे माननीय केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमितभाई शहा यांचे आज आगमन झाले. त्यांच्या आगमनानंतर कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे जोरदार आणि हार्दिक स्वागत केले. फुलांच्या उधळणीने, घोषणाबाजीने आणि ढोल-ताशांच्या गजरात वातावरण भारावून गेले. शहरातील विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी “भारत माता की जय” आणि “अमितभाई शहा जिंदाबाद”च्या घोषणांनी परिसर दुमदुमवला. अनेकांनी त्यांच्या स्वागतासाठी पारंपरिक पोशाख धारण करून लोकनृत्ये...
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाला गती | ४७० कोटींचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा
पुणे : पुणेकरांसाठी वाहतुकीच्या मोठ्या समस्येत गणला जाणारा कात्रज-कोंढवा रस्ता अखेर वेगाने पूर्णत्वाकडे जाणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पुणे महापालिकेने ठोस पाऊल उचलले आहे. भूसंपादनासाठी आवश्यक असलेले तब्बल ४७० कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात आले आहेत. यामुळे जागामालकांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया वेगाने होऊन रस्त्याचे काम गतीमान होणार आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मूळतः ८४ मीटरचा आराखडा...
सोसायटीच्या सुरक्षारक्षकाकडूनच घरफोडी : पर्वती पोलिसांनी उघड केला ८.६५ लाखांच्या ऐवजाचा मोठा गुन्हा
पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरातील औदुंबर सोसायटी, गणेशमळा येथे मोठी घरफोडी उघडकीस आली. दि. ०८ ऑगस्ट २०२५ ते दि. १२ ऑगस्ट २०२५ दरम्यान घरमालक बाहेरगावी असताना चोरट्याने घरात प्रवेश करून सुमारे १० तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ८,६५,००० रुपये किंमतीचा ऐवज चोरला. फिर्यादीच्या तक्रारीनंतर पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २५४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ (३),...
महाराष्ट्रात खाण आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एपीरॉक कंपनीच्या सीईओ हेलिना हेडब्लॉम यांच्यासोबत विशेष बैठक
मुंबई : महाराष्ट्रात खाण उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी Epiroc AB कंपनीच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हेलिना हेडब्लॉम यांची विशेष भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्रातील खाण क्षेत्र, अत्याधुनिक खाण उपकरणे निर्मिती, तसेच तंत्रज्ञान विकास याबाबत सविस्तर चर्चा झाली. एपीरॉक ही जागतिक स्तरावरील अग्रगण्य कंपनी असून, त्यांनी अनेक...
मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सॅटेलाईट फोनचे वितरण
मुंबई | प्रतिनिधी : समुद्रात मासेमारी करताना मच्छिमारांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी, हवामानातील बदल आणि सुरक्षा सूचना वेळेत प्राप्त व्हाव्यात तसेच मोबाईल नेटवर्क नसलेल्या दुर्गम समुद्री भागातही संपर्क कायम राहावा, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालय, मुंबई येथे ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’अंतर्गत मच्छिमारांना प्रातिनिधिक स्वरूपात सॅटेलाईट फोनचे वितरण करण्यात आले. समुद्रातील मच्छिमारांची...





