लोकशाहीच्या मंदिराचे पिकनिक स्पॉटमध्ये रूपांतर करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध’ – पिंपरी-चिंचवड भाजप आक्रमक…
संसदेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आणि इतर खासदारांनी संसदेच्या 'मकर प्रवेशद्वारा'चा वापर 'पिकनिक स्पॉट'प्रमाणे केल्याचा गंभीर आरोप करत आज पिंपरी- चिंचवड भाजपच्या वतीने आक्रमक निदर्शने करण्यात आली. शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. नेमका वाद काय? दिल्लीत सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान...
पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन; सामाजिक न्यायाच्या विचारांना नव्याने सलाम
पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महात्मा फुले यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद, अन्याय आणि विषमता नष्ट करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचा सामाजिक क्रांतीचा वारसा आजही देशभरातील जनतेला प्रेरित करत असल्याचे यावेळी नेत्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष व...
समृद्धी महामार्गावर उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी भीषण भगदाड! छत्रपती संभाजीनगरजवळ स्लॅब कोसळला; सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह
छत्रपती संभाजीनगर – कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झालेल्या समृद्धी महामार्गावर आज भल्या पहाटे एक भीषण प्रकार घडला. छत्रपती संभाजीनगरजवळील एका पुलाचा स्लॅब कोसळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, महामार्गाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेमुळे “समृद्धी”चा खरा चेहरा समोर आला असल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त होत आहे. महत्वाचे म्हणजे, हा भाग कालच वाहतुकीसाठी खुला करण्यात...
ज्ञानोबा-तुकाराम जयघोषात दुमदुमला टाळगाव-चिखली परिसर महापालिकेच्या शाळेत रंगला भक्ती, एकात्मता आणि परंपरेचा अद्भुत संगम
पिंपरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंती वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेत भक्तिमय वातावरणात भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव-चिखली परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा व महाविद्यालय परिसरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ-मृदुंगाच्या गजरासह टाळ-चिपळ्यांचा नाद आणि विद्यार्थ्यांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ‘ज्ञानोबा माऊली’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला होता. महिला बचत गटांच्या सदस्यांनी, स्थानिक समाजसेवकांनी, वारकरी बांधवांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. वारकरी परंपरेतील पालखी सोहळा जसा श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे, तसाच तो एकात्मता आणि सामाजिक बंध दृढ करणारा सोहळा ठरला. पालखी सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, समाज विकास विभाग उपायुक्त ममता शिंदे, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण कुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिठाचे संचालक ह. भ. प. राजू महाराज ढोरे ,डॉ. स्वाती मुळे आणि शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांच्या नियोजनामुळे आणि समन्वयामुळे संपूर्ण मिरवणूक सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.
जय गायकवाडला पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून तडीपार; कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा मोठा निर्णय
खराडी (पुणे) — पुणे शहरातील गुन्हेगारीवर कडक लगाम घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुन्हा एकदा ठोस पाऊल उचलले आहे. खराडी पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी जय गौरव गायकवाड (वय २०), रा. दिनकर पठारे वस्ती, लेन नं. २, पप्पु शिंदे यांचे घरासमोर, खराडी, पुणे याला तडीपार करण्यात आले आहे. या आरोपीविरुद्ध विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्याच्या हालचालींमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती....
सीआयएसएफ स्थापना दिनानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव; राष्ट्राच्या सुरक्षेत महत्त्वाची भूमिका
नवी दिल्ली : देशाच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक संस्थांचे संरक्षण करणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) स्थापना दिनानिमित्त देशभरातून जवानांना शुभेच्छा देण्यात आल्या. या निमित्ताने दलाच्या शौर्य, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. Central Industrial Security Force (CISF) हे देशातील प्रमुख केंद्रीय सुरक्षा दलांपैकी एक असून विमानतळ, मेट्रो रेल्वे, अणुऊर्जा केंद्रे, सरकारी इमारती, बंदरे तसेच विविध महत्त्वाच्या औद्योगिक...
वादग्रस्त प्रकरण! पोलीस अधिकाऱ्याची हप्ता वसुली? – ₹८०० च्या चष्म्यासाठी पैसे न देता दुकानातून निघाले अधिकारी!
एका पोलीस अधिकाऱ्याने एका छोट्याशा दुकानातून चष्म्याच्या काचा बदलून घेतल्या, ज्याची किंमत अवघी ₹८०० होती. मात्र, दुकानदाराने कितीही विनंती केली तरीही अधिकाऱ्याने पैसे दिले नाहीत, असा आरोप थेट दुकान मालकाने केला आहे. हक्काने सेवा घेतली, पण पैसे मात्र नाहीत! दुकानदाराने सांगितले की, संबंधित पोलीस अधिकारी वर्दीमध्ये आले होते, त्यांनी चष्मा निवडला, बदलून घेण्यास सांगितले, आणि नंतर पैसे न देता “बघू नंतर…”...
पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले तातडीचे निर्देश: अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सखोल उपाययोजना
मुंबई: पुण्यातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत विशेष लक्ष दिले. पुणे शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि औद्योगिक संधींमुळे हे शहर वेगळ्या ओळखीत आले आहे. यापुढे पुणे शहराला वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, नगर विकास विभागाचे अपर मुख्य...
धक्कादायक! तळेगाव दाभाडे येथे २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह स्टेशन तलावात – आत्महत्या की कटकारस्थान? तपास सुरू
तळेगाव दाभाडे परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साक्षी कांतीकुमार भावर (वय २२, रा. भीमाशंकर कॉलनी, वराळे मावळ, मूळ गाव – बऊर) हिचा मृतदेह तळेगाव दाभाडे येथील स्टेशन तलावात तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. साक्षी काही काळापासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबीयांनी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला,...
महाराष्ट्रातील लाडकी बहीण-शैलीचा युवा योजना, ‘लडका भाऊ’ समाविष्ट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे, 'लडका भाऊ' योजनेसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतर्गत 5,500 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची अल्पावधी शिल्लक असताना, एकनाथ शिंदे नेतृत्वाखालील सरकारने बेरोजगार युवकांसाठी एक अंतर्नशिप योजना जाहीर केली आहे. ही योजना 'लाडकी बहीण योजना'च्या आधारावर आखली गेली असून, अंतर्नशिप कार्यक्रमावर 5,500 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. पंढरपूर येथे मंगळवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना...










