सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नारळ, फुलं, मिठाई यांच्यावर बंदी; भाविकांनी सहकार्याची केली विनंती
मुंबई | प्रतिनिधी – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात धार्मिक स्थळांना संभाव्य धोका असल्याचा गुप्तचर अहवाल प्राप्त झाल्यानंतर, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षा कारणास्तव मंदिरात नारळ, फुले, हार, प्रसाद (मिठाई) व इतर अर्पणांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी रविवार, ११ मे २०२५ पासून लागू करण्यात आली आहे. डुरवा आणि जाईची फुले...
प्रामाणिकपणाचा झळाळता दीपस्तंभ! – अनिल सोनवणे यांनी सापडलेली ५० हजारांची सोन्याची अंगठी केली प्रामाणिकपणे सुपूर्त; सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव
शिरूर, पुणे | आजच्या भौतिकवादी युगात स्वार्थी वृत्तीने ग्रासलेल्या समाजात, प्रामाणिकतेचा उजळ व अनुकरणीय आदर्श निर्माण करणारी घटना घडली आहे. शिरूर तालुक्यातील बो-हाडे मळा येथील 'हॉटेल वैभव'चे मालक अनिल सोनवणे यांनी सापडलेली ५० हजार रुपयांची सोन्याची अंगठी आणि महत्वाची कागदपत्रे संबंधित व्यक्तीकडे पोलीसांच्या उपस्थितीत सुपूर्त केली. या प्रामाणिकपणाच्या उदाहरणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाकिट सापडल्यापासून सुपूर्त होईपर्यंतची घटना घटना काही दिवसांपूर्वीची. हॉटेल...
चहाच्या टपरीवरचा दीपस्तंभ! जामखेडच्या बंडू ढवळे यांची कहाणी ठरतेय कष्ट, जिद्द आणि यशाची प्रेरणादायी शिदोरी
जामखेड (अहमदनगर): आयुष्याच्या रणांगणात जिद्द, कष्ट आणि अपार प्रेमाने आपल्या लेकराच्या स्वप्नांना साकार करणारं एक नाव म्हणजे श्री. बंडू ढवळे. काल जामखेड दौऱ्यावर असताना एका साध्या चहाच्या टपरीवर घेतलेला चहा फक्त चविष्ट नव्हता, तर तो आनंदाचा आणि समाधानाचा घोट होता. कारण त्या चहामागची गोष्ट ही मुळातच अशा एका वडिलांची होती, ज्यांनी स्वतःच्या श्रमाने आपल्या मुलाचं आयुष्य उजळवलं. बापाचं स्वप्न, लेकाचं...
ढगफुटीमुळे दौंड-बारामतीत पूरस्थिती! नीरा डावा कालवा फुटल्याने घरं, रस्ते जलमय; अजित पवार घटनास्थळी हजर
पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले असून दौंड, बारामती, इंदापूर परिसरात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः बारामती आणि दौंडमध्ये रविवारी एकाच दिवसात अर्धा वर्षभराचा पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. यात नीरा डावा कालवा फुटल्याने काटेवाडी, कान्हेरी, पिंपळी, भवानीनगर परिसरात पाणी घरात घुसल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. कालवा फुटल्यामुळे अनेक रस्ते, महामार्ग जलमय झाले असून काटेवाडी-भवानीनगर...
अवैध शस्त्रधारी जेरबंद! पुण्यातील भवानी पेठेतील मोठा गुन्हा उधळला; पोलिसांची यशस्वी कारवाई
पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या चमूने एक मोठा गुन्हा टाळण्यात यश मिळवलं आहे. दि. २९ जुलै २०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, भवानी पेठ परिसरात एक युवक विनापरवाना गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ पावले उचलून कारवाई केली आणि आरोपीस अटक केली. सदर युवकाचं नाव जितु रवि मंडलिक (वय २०, रा. काकडे वस्ती,...
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! लष्कर व कोंढवा परिसरात घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद | तांत्रिक तपासातून शोध लावणाऱ्या पोलिसांचे कौतुक
पुणे | लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत युनियन बँक आणि कॅम्प परिसरातील एका बिझनेस ऑफिसमध्ये झालेल्या घरफोडीच्या घटनेनंतर, पुणे पोलिसांनी अतिशय अचूक व तांत्रिक पद्धतीने तपास करून तीन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. या घटनेमुळे परिसरात अस्वस्थता पसरली होती, मात्र लष्कर पोलिसांच्या जलद कारवाईमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास पुन्हा दृढ झाला आहे. घरफोडीचा प्रयत्न: बँकेजवळील कार्यालय हल्ल्याचा बिनधास्त प्रयत्न १५ जुलै रोजी...
जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत! आमदार हेमंत रासने यांची न थकणारी सेवा नागरिकांच्या हितासाठी
पुणे, कसबा पेठ – लोकप्रतिनिधी हा जनतेचा खरा सेवक असतो, हे विधान कसबा पेठचे आमदार हेमंत भाऊ रासने यांच्या कार्यातून पुन्हा सिद्ध झाले आहे. नुकतेच अधिवेशन संपल्यानंतर कोणतीही विश्रांती न घेता त्यांनी थेट जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून दिले आहे. या सततच्या कार्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, अशाच जबाबदार लोकप्रतिनिधींची गरज असल्याची भावना पुणेकर व्यक्त करत आहेत. अधिवेशन संपले, पण विश्रांती...
वाघोली पोलीस ठाण्याची कठोर कारवाई – सराईत गुन्हेगार टोळीवर तडीपारीची कारवाई!
वाघोली, पुणे – वाघोली पोलीस ठाणे आणि पुणे शहर पोलीस दलाने स्थानिक रहिवाशांना त्रास देणाऱ्या, परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि कायद्याची धज्जी उडवणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई करत त्यांना दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. गुन्हेगारीला थांबवण्यासाठी पोलिसांची धडाकेबाज मोहीम सुरू असून, यामुळे वाघोली परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार – गुन्हेगारीला पूर्णविराम! वाघोली पोलीस ठाण्याच्या...
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण : तिसऱ्या आरोपीला २ मेपर्यंत पोलिस कोठडी; तपासात नवे धक्कादायक तपशील उघड
पुणे : बोपदेव घाट परिसरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी सामूहिक बलात्कार प्रकरणातील तिसरा आरोपी, बाप्या उर्फ सोमनाथ उर्फ सूरज दशरथ गोसावी (३३, रा. काटेवाडी, बारामती) याला पुणे ग्रामीण पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून अटक करून पुणे शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यानंतर शनिवारी रात्री कोंढवा पोलिस ठाण्यात त्याला अटक करण्यात आली. तपासासाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी:रविवारी पुण्यातील न्यायालयात आरोपीला हजर करण्यात...
मुंबई, ठाणे, रायगड, पुण्यात जोरदार पाऊस; पालघरसाठी रेड अलर्ट! | हवामान विभागाचा इशारा गंभीर
मुंबई | २६ जुलै २०२५:- मुंबईसह उपनगरात शनिवारी सकाळपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघरसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे प्रशासन आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हवामान खात्याने सांगितले की, शनिवारी दिवसभरात आणि रविवारी सकाळपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग ४०-५० किमी/तासापर्यंत जाऊ शकतो. पावसाचा डेटा - मुंबईसह...










