शिवसेनेच्या निष्ठेची प्रेरणा बाळासाहेबांकडूनच मिळाली – अंबादास दानवे यांची भावनिक प्रतिक्रिया
विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेतील आपली टर्म संपत असताना दिलेल्या वक्तव्यात अत्यंत भावनिक आणि ठाम भूमिका मांडली आहे. "मी कार्यकर्ता आहे, शिवसैनिक आहे. मी इथे येणार नसलो तरी माझ्या बाकीच्या मॅचेस चालू राहतील," असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी शिवसेनेप्रतीची निष्ठा अधोरेखित केली. दानवे यांनी सांगितले की, "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला २००० साली बोलावले होते. शहरप्रमुख पदासाठी...
मुंबईत FASTag सक्तीची : १ एप्रिलपासून टोल भरण्यासाठी FASTag बंधनकारक; नियम न पाळल्यास दुप्पट दंड लागू!
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबईत वाहनचालकांसाठी FASTag किंवा E-Tag बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनधारकांना टोल भरण्यासाठी FASTag वापरणे अनिवार्य असेल. FASTag नसल्यास वाहनचालकांना टोल देण्यासाठी दुप्पट रक्कम भरावी लागेल, अशी माहिती MSRDC कडून देण्यात आली आहे. सरकारचा मोठा निर्णय : FASTag सक्तीचा आदेश जारी MSRDC ने यासंदर्भात सार्वजनिक नोटीस जारी केली...
“न्यायाच्या सर्वोच्च शिखरावर नागपूरचा ठसा – सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या जिव्हाळ्याच्या शहरात भावूक सत्कार!”
नागपूर – न्यायालयीन क्षेत्रातील सर्वोच्च पद भूषवणाऱ्या सरन्यायाधीश भूषण गवई यांचा नागपूर जिल्हा वकील संघटनेतर्फे भव्य सत्कार समारंभ नुकताच जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडला. या कार्यक्रमात सरन्यायाधीश गवई यांनी नागपूरच्या त्यांच्या वाटचालीतील योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि आपल्या न्यायालयीन कारकिर्दीच्या भावनिक आठवणी शेअर केल्या. गवई म्हणाले, “दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनी आई-वडीलांसह दीक्षाभूमीवर येणं ही जणू श्रद्धेची परंपरा होती. वकिलीच्या...
पुणे रिंग रोड प्रकल्प, रस्त्याची कामे व मेट्रो कॅरिडोरची कामे प्रगतीपथावर – मंत्री दादाजी भुसे
नागपूर : पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंग रोड सह विविध रस्ते व मेट्रो प्रकल्पाची कामे सुरु आहेत. रिंगरोडच्या पूर्व भागाचे काम मे 2028 पर्यंत आणि पश्चिमेकडील भागाचे काम मे 2026 पर्यंत पूर्ण होईल. तसेच हडपसर-लोणी काळभोर मेट्रो कॅरिडॉरच्या कामाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. सदस्य राहुल कुल यांनी पुणे रिंग रोड व इतर प्रकल्पासंदर्भात...
माळशिरस तालुक्यातील मरकडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी; प्रशासनाने परवानगी नाकारल्याने गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा, गावात संचारबंदी लागू.
सोलापूर, मरकडवाडी: माळशिरस तालुक्यातील मरकडवाडी गावात नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) प्रणालीवर अविश्वास व्यक्त करत गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या मागणीस नकार दिल्याने गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गावातील परिस्थिती बिघडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने २ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२४ या कालावधीत गावात संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी आणि कायदा...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून माहे जुलै २०२५ अखेर अधिकारी,कर्मचारी असे एकूण ३८ जण सेवानिवृत्त…
पिंपरी, दि. २ ऑगस्ट :- महानगरपालिका सेवेत वर्षानुवर्षे कामकाज करून सेवानिवृत्त होणारे आपले सहकारी अधिकारी,कर्मचारी हे पुढील जीवनात वेगवेगळ्या वाटांवर प्रवास करणार आहेत. त्यांची जबाबदारीने कामकाज करण्याची पध्दत,सेवाभाव आणि त्यांच्या आठवणी सेवानिवृत्तीनंतरही कायम स्मरणात राहतील असे प्रतिपादन सह आयुक्त मनोज लोणकर यांनी केले आणि सेवानिवृत्तांना आरोग्य व आनंदी जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक,पिंपरी...
मुंबई: पोलीस शिपायाने पोस्टल मतदार चिठ्ठीचे सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले; निवडणूक प्रक्रियेच्या पवित्रतेला धक्का.
मुंबई : निवडणूक प्रक्रियेच्या गोपनीयतेला धक्का देणाऱ्या एका प्रकरणात, मुंबईतील एका पोलीस शिपायावर कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक शस्त्र पोलीस विभागातील पोलीस शिपाई गणेश शिंदे याने पोस्टल मतदार चिठ्ठीचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केल्याने, निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपशील: गणेश शिंदे, बीड जिल्ह्यातील अस्ती मतदारसंघाचा मतदार असून, मुंबईतील ताडदेव येथील...
“एक दिवा – पराक्रमासाठी”: सीमारेषेवरील वीरांसाठी पुण्यात दिवे लावून अभिवादन!
पुणे :- देशाच्या संरक्षणासाठी सीमारेषेवर दिवस-रात्र झगडणाऱ्या भारतीय सैन्यदलाच्या जवानांना आणि सीमावर्ती भागातील सामान्य नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर प्रांगणात “एक दिवा – पराक्रमासाठी” हा प्रेरणादायी कार्यक्रम असीम फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, लहान मुलं, महिलावर्ग आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत एकात्मतेचा, शौर्याचा आणि आशेचा दिवा...
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी चमत्कार ठरणार! देशातील सर्वात लांब बोगदा आणि सर्वात उंच पूल महाराष्ट्रात; मुख्यमंत्री फडणवीसांचा गौरवोद्गार
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर उभारण्यात येणारा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प केवळ वाहतूक सुलभ करणारा नसून तो भारतातील अभियांत्रिकी क्षेत्रात एक अद्वितीय चमत्कार ठरणार आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. या प्रकल्पामुळे पुणे ते मुंबई प्रवासाचा कालावधी जवळपास अर्धा तासाने कमी होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या कामाची पाहणी नुकतीच पार पडली. यावेळी खासदार श्रीरंग...
“कबुतरखाना निमित्तमात्र… मूळ उद्देश समाजाची ताकद दाखवण्याचा! – मुंबईत मराठी अस्मितेवर घाला?”
मुंबईतील ऐतिहासिक कबुतरखाना परिसर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या घडत असलेल्या घटनांवर नजर टाकल्यास स्पष्ट होते की, कबुतरखाना हा फक्त निमित्त आहे. यामागील मूळ उद्देश काही विशिष्ट समाजांनी आपली संख्या, संघटना आणि ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणे आहे. ही केवळ धार्मिक वा सांस्कृतिक घडामोड नसून, ही एक ठरवून आखलेली रणनीती आहे – जिच्या माध्यमातून मुंबईसारख्या महानगरावर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न...












