महाराष्ट्र
पिंचीच्या मंगळागौर स्नेहमेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परंपरा, एकजूट आणि स्त्रीशक्तीचा भव्य उत्सव!
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील महिलांसाठी एक खास आणि संस्मरणीय ठरलेला ‘पिंची’ समूहाचा मंगळागौर व नागपंचमी स्नेहमेळावा पारंपरिक उत्साहात आणि महिलांच्या उस्फूर्त सहभागात नुकताच पार पडला. समाजमाध्यमांपासून परिसरातील मैदानांपर्यंत या कार्यक्रमाची रंगत सर्वत्र पाहायला मिळाली. महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक जतन आणि आपुलकीने भरलेल्या या सोहळ्यात हजारो महिलांनी सहभाग घेत महिलांचा जल्लोष अनुभवला. या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती मा. नीलम गोऱ्हे आणि...
‘सत्य’ विरुद्ध ‘सत्ता’! भारतीय राजकारणाच्या वाटचालीवर कन्हैया कुमार यांचे परखड मत
📍 पुणे | १० फेब्रुवारी २०२५ राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून सत्यासाठी असले पाहिजे! असे स्पष्ट मत राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) चे राष्ट्रीय प्रभारी कन्हैया कुमार यांनी व्यक्त केले. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४व्या भारतीय विद्यार्थी संसदेत ते बोलत होते. यावेळी “भारतीय राजकारणाची विचारसरणी – डावा, उजवा की अस्पष्ट?” या चर्चासत्रात त्यांनी...
मुंबईत डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय! MMRDA आणि NPCI यांच्यात ऐतिहासिक करार, BKC येथे NPCI चे जागतिक मुख्यालय उभारणार
मुंबई :- महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आर्थिक व्यवहारांचे प्रमुख केंद्र आहे. या अर्थसत्ता आणि तंत्रज्ञानाच्या केंद्रबिंदूत आता आणखी एक मोठी भर पडली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, या करारानुसार BKC (बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स) येथे NPCI चे जागतिक मुख्यालय उभारले जाणार आहे. मुख्यमंत्री...
इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; सर्व धोकादायक रचनांची सात दिवसांत तपासणी करण्याचे आदेश!
पुणे | १८ जून २०२५ – मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी तातडीने बैठकीचे आयोजन करून जिल्ह्यातील सर्व पूल, रस्ते, वाडे, धोकादायक इमारती, रेल्वे पूल, फलक व इतर सार्वजनिक संरचना यांची structural audit करण्याचे आदेश दिले. या दुर्घटनेत किमान चार नागरिकांचा मृत्यू झाला असून...
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मोठा निर्णय! पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीला दिलासा; नव्या सहा-पदरी उड्डाणपुलाला मंजुरी
पुणे–सोलापूर महामार्ग हा पुणे विभागातील सर्वाधिक भारवाहक मार्गांपैकी एक. उद्योग, आयटी, व्यापार आणि ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणातील वाहतुकीमुळे या मार्गावर दररोज तीव्र कोंडी निर्माण होते. नागरिकांच्या या दीर्घकालीन समस्येला गांभीर्याने लक्षात घेत राज्य शासनाने अखेर एक महत्त्वाचा पाऊल उचलला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (अजित दादा) यांनी आज माहिती देताना सांगितले की, राज्य सरकार पायाभूत सुविधा मजबूत करण्यास सर्वाधिक प्राधान्य देत...
“८०० वर्षे जुना महिम किल्ला पुन्हा उजाळणार! अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुनर्स्थापना कामाला अखेर हिरवा कंदील”
मुंबई – अनेक वर्षे रखडलेल्या आणि महापालिका निवडणुकांमुळे नव्याने गती मिळालेल्या महिम किल्ल्याच्या पुनर्स्थापना कामाला अखेर सुरुवात होणार आहे. मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील हा ऐतिहासिक वारसा वर्षानुवर्षे दुर्लक्ष, अतिक्रमण आणि समुद्री क्षरणामुळे धोक्यात आला होता. आता मात्र महापालिका प्रशासनाने ढिगारा, दगड आणि समुद्रकिनारी साचलेली अडथळे हटवून सुरू होणाऱ्या या कामामुळे किल्ल्याला नवे जीवन मिळणार आहे. 🔹 पुनर्स्थापनेची प्रक्रिया सुरू — VJTI...
चार वर्षांनंतर बीएमसीला लोकनियुक्त सत्ता; रितू तावडे यांच्याकडे महापालिकेची धुरा, भाजप सर्वात मोठा पक्ष
मुंबई : तब्बल चार वर्षे प्रशासकांच्या नियंत्रणाखाली असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) अखेर लोकनियुक्त सत्तेची पुनर्स्थापना झाली असून भाजपच्या रितू तावडे यांनी महापालिकेच्या कारभाराची धुरा स्वीकारली आहे. 2022 पासून निवडून आलेले सभागृह अस्तित्वात नसल्याने प्रशासकीय पातळीवरच कामकाज सुरू होते. आता जानेवारी 15, 2026 रोजी झालेल्या निवडणुकांनंतर मुंबईकरांना पुन्हा लोकप्रतिनिधी मिळाले आहेत. महापालिकेतील मागील नगरसेवकांचा कार्यकाळ मार्च 2022 मध्ये संपला होता. त्यानंतर...
ज्ञानोबा-तुकाराम जयघोषात दुमदुमला टाळगाव-चिखली परिसर महापालिकेच्या शाळेत रंगला भक्ती, एकात्मता आणि परंपरेचा अद्भुत संगम
पिंपरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंती वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेत भक्तिमय वातावरणात भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव-चिखली परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा व महाविद्यालय परिसरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ-मृदुंगाच्या गजरासह टाळ-चिपळ्यांचा नाद आणि विद्यार्थ्यांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ‘ज्ञानोबा माऊली’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला होता. महिला बचत गटांच्या सदस्यांनी, स्थानिक समाजसेवकांनी, वारकरी बांधवांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. वारकरी परंपरेतील पालखी सोहळा जसा श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे, तसाच तो एकात्मता आणि सामाजिक बंध दृढ करणारा सोहळा ठरला. पालखी सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, समाज विकास विभाग उपायुक्त ममता शिंदे, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण कुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिठाचे संचालक ह. भ. प. राजू महाराज ढोरे ,डॉ. स्वाती मुळे आणि शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांच्या नियोजनामुळे आणि समन्वयामुळे संपूर्ण मिरवणूक सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.
मराठा लोकांचे संस्कार जपणारी परंपरा – जेवणानंतर लगेचच स्वच्छता, लातूरकरांचे संस्कार
लातूर जिल्ह्यातील नागरिक आपल्या दैनंदिन जीवनशैलीत शिस्त आणि स्वच्छतेला मोठे महत्त्व देतात. सकाळचा नाश्ता झाल्यानंतर लगेचच घराची व आजूबाजूची स्वच्छता करण्याची प्रथा इथल्या प्रत्येक कुटुंबात आढळते. "जेवण करून लगेच झाडू घेणे हे आमचे संस्कार आहेत," असे अनेक लातूरकर अभिमानाने सांगतात. मराठा समाजाच्या या सुंदर परंपरेतून शिस्तबद्ध जीवनशैलीची झलक दिसते. जेवणानंतर घर आवरणे, अंगण स्वच्छ करणे आणि प्रत्येक वस्तू जागच्या जागी...
मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात ब्रेस्ट कॅन्सर व थायरॉईड तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन!
पुणे – पोलिस कर्मचारी हे समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. मात्र, सततच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. याच पार्श्वभूमीवर मार्केटयार्ड पोलीस ठाणे, पुणे शहर, रोटरी क्लब ऑफ इंडिया कात्रज आणि बी.जे. मेडिकल कॉलेज, ससून हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ब्रेस्ट कॅन्सर व थायरॉईड तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्य चाचण्यांसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद! 📍 शिबिराचा कालावधी: आज...










