शासकीय सेवेत निर्णयक्षमता, प्राधान्यक्रम व सकारात्मकता महत्त्वाची; मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे प्रतिपादन, इक्बाल सिंग चहल यांच्या सेवेला गौरवपूर्ण निरोप
मुंबई | प्रतिनिधी शासकीय सेवेत कार्यरत असताना केवळ पद नव्हे, तर निर्णय घेण्याची क्षमता, परिस्थितीनुरूप विचार, कामाचा अचूक प्राधान्यक्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन हे अत्यंत महत्त्वाचे गुण असतात. या गुणांच्या आधारेच अधिकारी आपल्या सेवाकाळात वेगळा ठसा उमटवू शकतात, असे मत राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केले. मंत्रालयातील परिषद सभागृहात गृह विभागाचे सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव श्री. इक्बाल सिंग चहल यांच्या...
‘३६ तासांत १२ मुले बेपत्ता’ अफवा ठरली खोटी; मुंबई पोलिसांचा नागरिकांना इशारा, अफवा पसरवणाऱ्यांवर FIRची कारवाई
मुंबई | प्रतिनिधी मुंबईत अवघ्या ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी याबाबत ठाम शब्दांत खुलासा करत नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. या खोट्या पोस्ट्समुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई पोलिसांचा अधिकृत खुलासा मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर स्पष्ट करत म्हटले आहे की,“काही...
मुंबई महानगरपालिकेत सौहार्दाची भेट: शिवसेना-भाजप गटनेते व आयुक्त भूषण गगराणी यांची सदिच्छा भेट, सहकार्याचा सकारात्मक संदेश
मुंबई | प्रतिनिधी मुंबई महानगरपालिकेतील नव्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नवनिर्वाचित गटनेते श्री. अमेय घोले आणि भाजपचे गटनेते श्री. गणेश खणकर यांनी पालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे पालिकेच्या कारभारात समन्वय, सौहार्द आणि विकासाभिमुख सहकार्याचा संदेश देण्यात आला आहे. विकासाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा या भेटीदरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीबाबत, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक तसेच...
तळोजात ‘भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’चे लोकार्पण; वकिलांसाठी ऐतिहासिक पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
तळोजा | नवी मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने तळोजा, नवी मुंबई येथे स्थापन करण्यात आलेले देशातील पहिले ‘भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’ (BBATRC) हे वकिलांसाठी एक ऐतिहासिक आणि दिशादर्शक केंद्र ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या अत्याधुनिक प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महापालिकेच्या वतीने वाहण्यात आली आदरांजली
पिंपरी, दि. २८ जानेवारी २०२६ - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, शहर अभियंता मकरंद निकम,नगररचना उपसंचालक किशोर गोखले,मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण...
कर्तव्यावर असताना वीरमरण; मुंबई पोलीस अंमलदार विदीप जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई | प्रतिनिधी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार विदीप जाधव यांचे कर्तव्य बजावत असताना झालेल्या अपघाती निधनाने संपूर्ण पोलीस दलासह महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सेवा बजावत असताना त्यांचे अकाली जाणे ही अत्यंत दुःखद व हृदयद्रावक घटना आहे. विदीप जाधव हे एक कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि मेहनती पोलीस अंमलदार म्हणून ओळखले जात होते. नेहमीच जबाबदारीने काम करत, कायदा-सुव्यवस्थेचे...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत प्रजासत्ताक दिनाचा भव्य शासकीय सोहळा संपन्न
मुंबई | २६ जानेवारी २०२६भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत दिमाखदार आणि राष्ट्राभिमान जागवणारा शासकीय राष्ट्रध्वजवंदन व संचलन सोहळा पार पडला. या सोहळ्याचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सकाळी ठीक ९.१५ वाजता शिवाजी पार्क परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला आणि तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमस्थळी पोलीस दल, सशस्त्र दल, होमगार्ड, नागरी संरक्षण दल, अग्निशमन...
शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना नमन; कामगार हक्क आणि स्वाभिमानाचा वारसा अधोरेखित
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज मुंबईतील द सेंट रेजिस हॉटेलमध्ये भारतीय कामगार सेनेच्या वतीने भावपूर्ण अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा, कार्याचा आणि कामगार हितासाठीच्या संघर्षाचा गौरव करत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगरसेवक श्री. निशिकांत शिंदे, भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस श्री. दिलीप जाधव, युनिट अध्यक्ष श्री. विवेक करलकर, हॉटेल...
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासात पारदर्शकतेची मागणी – लॉटरी प्रक्रिया ठरलेल्या क्रमानेच व्हावी, रहिवाशांचा ठाम आग्रह
मुंबई: वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या लॉटरी प्रक्रियेबाबत चाळीतील रहिवाशांनी ठाम भूमिका घेतली असून, ही प्रक्रिया चाळींच्या ठरलेल्या आणि अधिकृत क्रमानेच पार पडावी, अशी जोरदार मागणी ते सातत्याने करत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही संदिग्धता राहू नये, तसेच पूर्ण नियमितता आणि पारदर्शकता राखली जावी, हीच रहिवाशांची प्रमुख मागणी आहे. बी डीडी चाळ पुनर्विकास हा मुंबईतील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी...
दादरच्या रामश्याम वाडीत पिण्याच्या पाण्यात ड्रेनेज पाणी मिसळले; तत्काळ कारवाईने नागरिकांना दिलासा
मुंबई: दादर पश्चिम येथील रामश्याम वाडी परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळल्याची गंभीर बाब समोर आली होती. या घटनेमुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता. दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार, संसर्ग आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता लक्षात घेता, या समस्येची तात्काळ दखल घेण्यात आली. प्रकरण लक्षात येताच महापालिका अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून संबंधित पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू करून...










