धक्कादायक – शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा
मुंबई : मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दु:खदायक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘काँटा लगा’ गाण्यातून प्रचंड प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 13’ फेम शेफाली जरीवाला हिचं वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. 27 जूनच्या रात्री, तिला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तिला मुंबईतील बेलव्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, तत्काळ वैद्यकीय मदत...
मा. हर्षवर्धनजी सपकाळ यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्षपदाचा भव्य पदग्रहण सोहळा संपन्न!
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नवनियुक्त मा. हर्षवर्धनजी सपकाळ यांनी आज पदभार स्वीकारला. मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात पार पडलेल्या या भव्य सोहळ्यास काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी काँग्रेसच्या ध्येयधोरणांवर भर देत नव्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला. 🌟 कार्यकर्त्यांचा उत्साह आणि पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्धारपदग्रहण सोहळ्यात...
नवी मुंबई: अटल सेतूवरून उडी मारून 38 वर्षीय अभियंत्याची आत्महत्या, आठवड्यातील तिसरी घटना
काल दुपारी 12.24 वाजता अटल सेतूवर, एका तरुणाने मुंबई ते नवी मुंबई जाणाऱ्या मार्गावरून उडी मारून आत्महत्या केली. सांगितले जात आहे की आर्थिक अडचणींमुळे या तरुण अभियंत्याने हा पाऊल उचलला. मृताची ओळख डोंबिवली येथील 38 वर्षीय श्रीनिवासन कुरुतुरी म्हणून पटली आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत मृतदेह सापडू शकला नाही. अटल सेतूवरील सीसीटीव्हीमध्ये आत्महत्येचे संपूर्ण दृश्य कैद झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, श्रीनिवास...
नालासोपाऱ्यात पोलिसांच्या मानसिक छळाला कंटाळून बिल्डरचा आत्महत्येचा टोकाचा निर्णय; चौकशीची मागणी तीव्र
नालासोपारा (जि. पालघर) – नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, जयप्रकाश (JP) चौहान या स्थानिक बिल्डरने पोलिसांच्या मानसिक छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. चौहान यांच्या आत्महत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जयप्रकाश चौहान यांच्या आत्महत्येनंतर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी दोन पोलीस अधिकारी – शाम शिंदे आणि...
मुंबईत ‘व्हीआयपी वॉर्ड’ गुळगुळीत… तर सामान्य वॉर्ड खड्ड्यांनी पोखरलेले! – नागरिकांमध्ये संताप, कर भरूनही सुविधा नाही
मुंबई : 'खड्ड्यांची राजधानी' अशी ओळख मिळालेल्या मुंबईत पुन्हा एकदा वॉर्डनिहाय खड्डे प्रश्नावरून मोठं वादंग निर्माण झालं आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या (BMC) नवीन 'My Pothole, Quick Fix' डॅशबोर्डनुसार, मालाबार हिल, कोलाबा, वरळी आणि वांद्रे (प.) यांसारख्या चार 'व्हीआयपी' वॉर्डांत सरासरी फक्त १२७ तक्रारी नोंदवल्या गेल्या, तर इतर वीस वॉर्डांमध्ये सरासरी ३५५ तक्रारी समोर आल्या. ही आकडेवारी पाहता, मुंबईतल्या रस्त्यांच्या देखभालीत...
मन सुन्न करणारी घटना: नव्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी तरुणाचा झाड कोसळून मृत्यू
विक्रोळी | मुंबई | २८ मे २०२५ — मुसळधार पावसात विक्रोळीतील एका बागेत उभ्या असलेल्या झाडाखाली कोसळून तेजस नायडू या २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, तेजस याच दिवशी नवीन मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीवर रुजू होणार होता. मात्र पावसामुळे त्याने नोकरीची सुरुवात एक दिवस लांबवली, आणि नियतीने त्याच दिवशी त्याच्यावर घाला घातला. एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त तेजस आपल्या मित्रांसोबत विक्रोळीतील...
“मंदिराखाली खजिना सापडलाय… हवाय का?” आमिष दाखवून 25 लाखांची फसवणूक; मुंबईत गोल्ड स्कॅमचा धक्कादायक पर्दाफाश
मुंबई | मुंबईतून फसवणुकीचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून, मंदिराखाली सापडलेला खजिना स्वस्तात विकण्याच्या बहाण्याने चौघांनी एका व्यापाऱ्याला तब्बल 25 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मालाड पश्चिम परिसरात घडली असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चारही आरोपींना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना, खजिना, गुप्त सोने आणि...
मुंबईत आणखी एक हिट-अँड-रन प्रकरण: वेगवान BMW कारने २८ वर्षीय तरुणाचा घेतला जीव; चालक अटकेत
मुंबई, २० जुलै: मुंबईच्या वरळी येथे २० जुलै रोजी घडलेल्या हिट-अँड-रन प्रकरणात २८ वर्षीय विनोद लाड यांचा मृत्यू झाला. हा प्रकार सोमवारी उघडकीस आला. या प्रकरणातील आरोपी किरण इंदुलकर घटनास्थळावरून पळून गेला आणि नंतर त्याला अटक करण्यात आली. विनोद लाड हे कामावरून घरी परत येत असताना अब्दुल गफ्फार खान रस्त्यावर इंदुलकरच्या BMW ने त्यांना मागून धडक दिली. इंदुलकर पळून...
मराठा समाजासाठी ऐतिहासिक विजय! महायुती सरकारचा आरक्षणविषयक निर्णय लागू, ग्रामपातळीवर कुणबी प्रमाणपत्रासाठी मार्ग मोकळा
महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक दशकांपासून चाललेल्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. आज महायुती सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील अनेक महत्वाच्या मागण्या मान्य केल्या असून, हा दिवस मराठा समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक मानला जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाजाने सातत्याने आरक्षणासाठी आंदोलन केले. या आंदोलनाच्या मागे सामाजिक न्याय, आर्थिक उन्नती आणि समान संधी सुनिश्चित करण्याची महत्त्वाची गरज होती. तत्कालीन मुख्यमंत्री...
डोंबिवलीत धक्कादायक घटना: विनोद करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू
डोंबिवलीत धक्कादायक घटना: विनोद करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू डोंबिवलीतील विकास नाका परिसरात असलेल्या ग्लोब स्टेट इमारतीत धक्कादायक घटना घडली आहे. तिसऱ्या मजल्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नागीना देवी मंजिराम असे मृत महिलेचे नाव आहे, त्या या इमारतीत सफाईकामगार म्हणून काम करत होत्या. त्या पिसवली टाटा नाका परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होत्या. मंजिराम यांचा मुलगा आणि मुलगी आहेत....













