मुलाखत

Home मुलाखत

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना – पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

0

मुंबई, दि. 20 : महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाचा हंगामातील पहिला कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला आहे. कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरून हा कंटेनर रवाना करण्यात आला असून राज्यातील फळनिर्यातीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. अमेरिका - भारत कृषी-निर्यातविषयक घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर...

जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत बैठक संपन्न

0

पुणे : नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत जिल्हा माहिती अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव युवराज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्यप्रणालीद्वारे माहिती दिली. यावेळी  जिल्हाधिकारी कार्यालयात नगर विकास शाखेच्या प्रभारी जिल्हा सह आयुक्त अँलिस पोरे तर नगरपालिका व नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस...

सोसायटीच्या सुरक्षारक्षकाकडूनच घरफोडी : पर्वती पोलिसांनी उघड केला ८.६५ लाखांच्या ऐवजाचा मोठा गुन्हा

0

पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरातील औदुंबर सोसायटी, गणेशमळा येथे मोठी घरफोडी उघडकीस आली. दि. ०८ ऑगस्ट २०२५ ते दि. १२ ऑगस्ट २०२५ दरम्यान घरमालक बाहेरगावी असताना चोरट्याने घरात प्रवेश करून सुमारे १० तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ८,६५,००० रुपये किंमतीचा ऐवज चोरला. फिर्यादीच्या तक्रारीनंतर पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २५४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ (३),...

सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडून विजयस्तंभाच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन तयारीची पाहणी

0

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुतेच्या मूल्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी प्रशासन, सामाजिक संघटना व नागरिकांनी परस्पर समन्वय साधून सोहळा हा यशस्वी करावा. प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे अनुयायांनी पालन करून सहकार्य करावे, असे आवाहान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ....

दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग; भाजपच्या गटात हालचाली, पुढचे ४ दिवस ठरणार निर्णायक

0

नवी दिल्ली | प्रतिनिधी :- संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील चार दिवस देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ डिसेंबरला मोठा राजकीय भूकंप होईल, असे भाकीत केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी...

निवृत्तीवेतन ही केवळ आर्थिक तरतूद नसून सेवानिवृत्तांच्या दीर्घ सेवाभावाचा सन्मान आहे – पद्मश्री गिरीश प्रभुणे

0

पिंपरी : निवृत्तीवेतन ही केवळ आर्थिक तरतूद नसून सेवानिवृत्त व्यक्तींच्या दीर्घ सेवाभावाचा,त्यागाचा आणि योगदानाचा सन्मान आहे. निवृत्त वेतनधारकांनी एकमेकांच्या संपर्कात रहावे आणि संवाद ठेवावा असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले.      पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आणि पिंपरी चिंचवड सेवा निवृत्त सेवक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय सेवानिवृत्त वेतनधारक दिन (पेन्शनर्स डे) निमित्त...

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपचा प्रचार शिगेला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जाहीर सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केले. या सभेमुळे उल्हासनगरमध्ये भाजपच्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे...

दिल्लीतील महत्त्वपूर्ण भेट – राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांच्याशी महिलांच्या सक्षमीकरणावर सखोल चर्चा

0

दिल्ली येथे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. विजयाताई रहाटकर यांची सदिच्छा भेट घेण्याचा योग आला. या भेटीदरम्यान महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण, मार्गदर्शक आणि सखोल चर्चा झाली. महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची परिणामकारक अंमलबजावणी कशी अधिक सक्षमपणे करता येईल, यावर या चर्चेत विशेष भर देण्यात आला. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली...

गोंदिया जिल्ह्यातील अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

 गोंदिया जिल्ह्यातील सीएमआर तांदूळ जमा करून ठेवल्याप्रकरणी चौकशी करण्यात येईल. तसेच या प्रकरणातील जिल्हा पुरवठा अधिकारी याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. गोंदिया जिल्ह्यातील सीएमआर तांदुळाच्या साठ्याप्रकरणी सदस्य नाना पटोले यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनी माहिती देताना सांगितले की, सन २०२३–२४ या वर्षासाठी आवश्यक...

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर : स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलिदान स्थळ तुळापूर (ता. हवेली) व समाधी स्थळ मौजे वढू बुद्रुक (ता. शिरूर) दरम्यान नवीन रस्त्याची निर्मिती व भीमा नदीवरील पुल विकास कामांचा अंतर्भाव असलेल्या 532.51 कोटी किमतीच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.   स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी...

Copyright ©