Breaking News
महाराष्ट्रातील रस्त्यांची दुरावस्था; जनतेचा संताप उफाळला – “विकासाच्या गप्पा आणि रस्त्यांवरील खड्डे!”
महाराष्ट्रात सध्या सर्वत्र रस्त्यांची दुरवस्था झालेली दिसून येते. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत खड्ड्यांनी भरलेले रस्ते हे जनतेच्या दैनंदिन जीवनातील मोठं संकट बनले आहेत. वाहतूक कोंडी, अपघात, आणि जीवितहानी या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, या परिस्थितीसाठी केंद्र आणि राज्य सरकारमधील प्रमुख नेते जबाबदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील...
मुंबईत जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर लाठ्यांनी हल्ला, संभाजी राजेंवरील वक्तव्यामुळे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हल्ला
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP-SP) नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर गुरुवारी स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी राजे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे हा हल्ला झाला. मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील पक्ष कार्यालयातून बाहेर पडताच आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. संभाजी राजे हे स्वराज पक्षाचे नेते आहेत, आणि आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. या हल्ल्याचा...
इंदोलिंक-युरोसिटी “Missing Link” प्रकल्पामुळे वाहतूक होणार सुलभ; पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुकीचा नव्या युगाची सुरुवात!
पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी आणि रस्त्यांचा ताण लक्षात घेऊन, महापालिकेच्या स्थापत्य (प्रकल्प) विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इंदोलिंक-युरोसिटी औद्योगिक वसाहत क्षेत्रात "Missing Link" रस्त्याचा विकास करण्याचा निर्णय घेतला असून, हा रस्ता कालेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता यांना थेट जोडणार आहे. सध्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) च्या परवानगीनंतर...
काँग्रेस भवनाबाहेर भाजप–काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री; पुणे पोलिसांकडून क्रॉस FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू
पुण्यातील काँग्रेस भवनाबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीनंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. या घटनेनंतर पुणे शहर पोलीस यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांविरोधात क्रॉस FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. आंदोलनानंतर तणाव वाढला ही घटना राज्य काँग्रेस अध्यक्षांनी केलेल्या राजकीय वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर घडली. आंदोलन संपल्यानंतर काही कार्यकर्ते काँग्रेस भवनाजवळ...
सौर कृषी पंप अंमलबजावणीत महाराष्ट्र प्रथम: कृषी क्षेत्रातील नव्या युगाची सुरूवात
महाराष्ट्र राज्याने सौर कृषी पंपांच्या अंमलबजावणीमध्ये एक मोठा टप्पा गाठला आहे. राज्याने कृषी क्षेत्रात सौर ऊर्जा वापरण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उर्जा आवश्यकतांना पर्यावरणपूरक आणि किफायती उपाय मिळणार आहेत. सौर कृषी पंप वापरण्यामुळे शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठ्याची चिंता कमी होईल आणि शेतजमिनींची अधिक प्रभावी पाणीपुरवठा प्रणाली निर्माण होईल. राज्य सरकारने एक अभिनव योजना राबवली असून सौर कृषी पंपांची...
“मी पुन्हा येईन” ची गाजलेली घोषणा! विश्व मराठी संमेलनात देवेंद्र फडणवीस यांची तुफान फटकेबाजी
पुण्यात आयोजित विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जोशपूर्ण भाषणाने वातावरणात चैतन्य आणले. "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन" अशी जोरदार फटकेबाजी करत त्यांनी संमेलनात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या घोषणेमुळे उपस्थित मराठी रसिकांमध्ये उत्साह संचारला आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मराठी माणसाची जगभर छाप – दावोसचा किस्सा फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात दावोस दौऱ्याचा उल्लेख...
पोलिसांच्या सापळ्यात सापडला सुनिल गायकवाड; २०२३ पासून पोलिसांच्या रडारवर असलेला गुन्हेगार गजाआड
पुणे – पुणे शहरात 'मोका' कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेल्या गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी अटक केली असून या यशस्वी कारवाईने गुन्हेगारी प्रवृत्तीला जबर दणका दिला आहे. सुनिल संजय गायकवाड (वय २०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो अटल १०, सच्चाईमातानगर, आंबेगाव खुर्द येथे राहतो. गुन्ह्याचा तपशील : संबंधित गुन्हा : भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, गु.र.नं. ७९८/२०२३ भा.दं.वि कलमे :...
मुंबईत ‘व्हीआयपी वॉर्ड’ गुळगुळीत… तर सामान्य वॉर्ड खड्ड्यांनी पोखरलेले! – नागरिकांमध्ये संताप, कर भरूनही सुविधा नाही
मुंबई : 'खड्ड्यांची राजधानी' अशी ओळख मिळालेल्या मुंबईत पुन्हा एकदा वॉर्डनिहाय खड्डे प्रश्नावरून मोठं वादंग निर्माण झालं आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या (BMC) नवीन 'My Pothole, Quick Fix' डॅशबोर्डनुसार, मालाबार हिल, कोलाबा, वरळी आणि वांद्रे (प.) यांसारख्या चार 'व्हीआयपी' वॉर्डांत सरासरी फक्त १२७ तक्रारी नोंदवल्या गेल्या, तर इतर वीस वॉर्डांमध्ये सरासरी ३५५ तक्रारी समोर आल्या. ही आकडेवारी पाहता, मुंबईतल्या रस्त्यांच्या देखभालीत...
पुण्यात शाळेजवळील पानटपऱ्यांवर कारवाई – हडपसर पोलिसांची धडक मोहीम!
पुणे – शाळेच्या १०० मीटर परिसरात असलेल्या बेकायदेशीर पानटपऱ्यांवर हडपसर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, आज दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी ही धडक मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत तीन पानटपऱ्या हटविण्यात आल्या असून, त्यांच्या चालकांविरोधात कोफ्ता कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मगरपट्टा परिसरातील कारवाई हडपसर पोलिसांना परिसरातील स्थानिकांकडून तक्रारी मिळत होत्या की, कड वस्ती, मगरपट्टा...
मुंबईसाठी २०२६-२७ चे रेडी रेकनर दर ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक – आमदार व खासदारांचा सहभाग
मुंबई: मुंबई शहरासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता बाजार मूल्यांकन दर अर्थात रेडी रेकनर रेट निश्चित करण्याच्या प्रक्रियेसाठी एक महत्त्वपूर्ण बैठक दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ओल्ड कस्टम हाऊस येथे पार पडली. या बैठकीसाठी मुंबईतील सर्व आमदार व खासदारांना आमंत्रित करण्यात आले होते. रेडी रेकनर दर हे मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसाठी मार्गदर्शक ठरतात. घर, दुकान, कार्यालय, भूखंड...













