Breaking News
नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट घोटाळा: वकील सहित तीन जणांच्या २ कोटींची फसवणूक.
नाशिक: सायबर गुन्हेगारांनी तीन व्यक्तींना सुमारे १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्यात वकील नीरज बापट, जयश्री जोशी आणि वृषाली पांढरे यांचा समावेश आहे. गुन्हेगारांनी त्यांना "डिजिटल अरेस्ट" करून भीती दाखवली आणि बँक खात्यातील रक्कम "संशयास्पद" असल्याचे सांगून पैसे बाहेर काढून घेतले. घोटाळ्याची पद्धत: सायबर गुन्हेगारांनी ED, CBI आणि कस्टम विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून व्हिडिओ कॉल केले. १६ वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून (८ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान)...
सिंहगड रोड पोलिसांची कारवाई: एमसीओसीए प्रकरणातील फरार आरोपीसह दोन आरोपींना अटक.
पुणे: पुण्यातील सिंहगड रोड पोलिसांनी एका यशस्वी मोहिमेद्वारे दोन आरोपींना अटक केली आहे. यात एमसीओसीए अंतर्गत फरार असलेला आरोपी रवि माधवराव जाधव (वय २६) आणि त्याचा साथीदार अश्विन उर्फ बर्क्या बालकृष्ण लोणारे (वय २०) यांचा समावेश आहे. रवि जाधव हत्या प्रयत्न प्रकरणात फरार होता, तसेच त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (MCOCA) देखील गुन्हा दाखल होता. रवि जाधव दोन महिन्यांपासून...
पोलिस गुन्हे पथक: कान्हे फाटा रेल्वे स्टेशनजवळ मटका अड्ड्यावर धाड! सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, हजारोंचा माल जप्त!
मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी शुक्रवारी (दिनांक ०७/०६/२०२४) आपल्या टीमला घटनास्थळी पाठवले. टीमने कान्हे फाटा रेल्वे स्टेशनजवळ धाड टाकली. या धाडीत खालील व्यक्तींना अटक करण्यात आले: कालुराम पांडुरंग लालगुडे, वय ३१ वर्षे, कृष्णा धरबा जाधव, वय २४ वर्षे, किसन जवेरी कोळी, वय ६५ वर्षे, विलास सोपान बोरडे, वय ५८ वर्षे, किरण विजय यादव, वय ३२ वर्षे, त्यांच्यासोबत...
भारती विद्यापीठ पोलीसांची मोठी कामगिरी : परराज्यातील आरोपीकडून ५.२९० किलो अफू बोंडे जप्त, लाखोंचा अंमली पदार्थ ताब्यात
पुणे : पुणे शहरातील अंमली पदार्थांच्या जाळ्याला आळा घालण्यासाठी पुणे पोलीस सतत प्रयत्नशील आहेत. त्याच मोहिमेअंतर्गत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत परराज्यातील एका सराईत आरोपीला जेरबंद केले. त्याच्याकडून तब्बल ५.२९० किलोग्रॅम वजनाचे अफू बोंडे/टरफले हा नशाकरक अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याची किंमत तब्बल ₹९५,२२०/- एवढी आहे. ही कारवाई २६ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आली. वरिष्ठ...
ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गतीने उपाययोजना; फेब्रुवारी २०२६ पर्यंत कामे पूर्ण होणार – राज्यमंत्री योगेश कदम
नागपूर : ठाणे शहरातील ४२ मीटर रस्त्यावर एकाच वेळी सुरू असलेली नळपाणी योजना, मेट्रो व फ्लायओव्हरची कामे आणि वाढती वाहतूक यामुळे निर्माण झालेल्या कोंडीवर राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने उपाययोजना आखल्या असल्याची माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य अॅड. निरंजन डावखरे यांनी ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी विषयी लक्षवेधी सूचना मांडली. यावर राज्यमंत्री कदम हे उत्तर देताना बोलत होते. राज्यमंत्री कदम...
राष्ट्ररक्षणासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना राष्ट्रिय समर स्मारकात भावपूर्ण अभिवादन
नवी दिल्ली | प्रतिनिधी आज सकाळी राष्ट्रिय समर स्मारक येथे देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या पवित्र स्थळी उपस्थित राहून भारतमातेच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या शौर्य, धैर्य आणि त्यागाचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या अमर गाथा आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करतात. राष्ट्रिय समर स्मारक हे केवळ एक स्मारक नसून, देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि...
पिंपरीत भाजपचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला “जोडे मारो आंदोलन”
पिंपरी: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी चौकात आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला संताप व्यक्त केला आणि त्यांच्या हकालपट्टीची जोरदार मागणी केली. शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या...
पश्चिम बंगालमधील खऱ्या परिस्थितीवरून वाद निर्माण! सागरिका घोष म्हणतात, ‘हा भाजपचा प्रचार’ – तृणमूल सरकारवर टीकेची झोड
एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पश्चिम बंगालमधील वास्तव स्थिती दर्शवतो, जिथे रस्त्यांची दुर्दशा, महिलांची असुरक्षितता, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येतो. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून चिंता व्यक्त केली आहे आणि राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. मात्र प्रसिद्ध पत्रकार सागरिका घोष यांनी या व्हिडिओविषयी एक वेगळीच भूमिका मांडली आहे. त्यांच्या मते,...
पुण्यात धार्मिक सौहार्दाचे दर्शन : ईद ए मिलादची मिरवणूक पुढे ढकलली, गणेश विसर्जन मिरवणुकीला दिला प्राधान्य
पुणे – पुणे हे नेहमीच धार्मिक सौहार्द, सामाजिक एकात्मता आणि सामंजस्याचे उत्तम उदाहरण राहिले आहे. याचेच आणखी एक जिवंत उदाहरण समोर आले आहे. यंदा ईद ए मिलाद (हजरत मोहम्मद पैगंबर जयंती) ५ सप्टेंबर २०२५ रोजी साजरी होणार होती, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेली गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे. दोन्ही मोठ्या मिरवणुका एकाच काळात...
लोकशाहीच्या मंदिराचे पिकनिक स्पॉटमध्ये रूपांतर करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध’ – पिंपरी-चिंचवड भाजप आक्रमक…
संसदेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आणि इतर खासदारांनी संसदेच्या 'मकर प्रवेशद्वारा'चा वापर 'पिकनिक स्पॉट'प्रमाणे केल्याचा गंभीर आरोप करत आज पिंपरी- चिंचवड भाजपच्या वतीने आक्रमक निदर्शने करण्यात आली. शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. नेमका वाद काय? दिल्लीत सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान...










