Breaking News
‘लुटेरी दुल्हन’चा शेवटी पर्दाफाश! राजस्थानमध्ये लग्नाच्या नावाखाली श्रीमंत नवरदेवांना फसवणाऱ्या टोळीचा भांडाफोड – मुख्य आरोपी काजल अखेर जेरबंद
सीकर (राजस्थान) : लग्नासारख्या पवित्र नात्याचा वापर करून आर्थिक फसवणुकीचा खेळ करणाऱ्या एका हायप्रोफाईल लुटेरी टोळीचा पर्दाफाश राजस्थान पोलिसांनी केला आहे. या टोळीची मुख्य आरोपी काजल उर्फ ‘लुटेरी दुल्हन’ अखेर तब्बल एका वर्षाच्या पाठलागानंतर गुरुग्राम येथून अटक करण्यात आली आहे. तिच्या या अटकेनंतर लग्नाच्या नावाखाली फसवले गेलेल्या अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. लग्नाचे आमिष आणि फसवणुकीचा डाव ही फसवणुकीची कहाणी सीकर...
पुण्यात जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा भव्य सत्कार सोहळा!
पुणे: महिलांच्या संघर्षाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुणे काँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख व मोरया प्रतिष्ठानचे प्रमुख श्रीयुत राजेंद्र पुंडलिक मोरे यांच्या वतीने जागतिक महिला दिन 2025 निमित्ताने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम पुण्यातील ऐतिहासिक लाल महाल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कर्तृत्वाचा सन्मान, समाजसेवेला मान्यता! या कार्यक्रमात कसबा संस्कार केंद्र आणि...
निगडीतील विद्यानंद भवन हायस्कूलचा दहावीचा १००% निकाल – विद्यार्थ्यांची घवघवीत यशकथा राज्यभर गाजतेय
दहावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, निगडी येथील विद्यानंद भवन हायस्कूलने सलग यंदाही आपली यशस्वी परंपरा कायम राखत १००% निकाल साध्य केला आहे. शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीचे हे मोठे उदाहरण मानले जात आहे. यंदा एकूण १५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ५० जणांनी प्रथम श्रेणी आणि ७ जणांनी द्वितीय श्रेणी मिळवून...
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या मतदान जनजागृती चित्रफितीचे आयुक्तांच्या हस्ते अनावरण
पिंपरी : लोकशाहीची खरी ताकद ही नागरिकांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून असते. मतदान हा केवळ हक्क नसून लोकशाहीप्रती आपले कर्तव्य आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे असून त्याच्या माध्यमातून नागरिक आपल्या शहराच्या आणि प्रशासनाच्या भवितव्याची दिशा ठरवतात. त्यामुळे कोणताही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये, लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन आयुक्त तथा निवडणूक...
“हे माझं काम नाही, मुख्यमंत्र्यांचं आहे” – कंगना रनौतचा उत्तर; पायांपाशी हात जोडणाऱ्या नागरिकाची अवस्था पाहून संतप्त प्रतिक्रिया
हिमाचल प्रदेश | मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदार कंगना रनौत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओचा तुफान बोलबाला आहे, ज्यामध्ये एक नागरिक कंगना रनौतच्या पायांजवळ बसून हात जोडत आपल्या अडचणी सांगत आहे, आणि त्यावर कंगना त्याला सांगत आहेत की, "हे माझं नाही, मुख्यमंत्र्यांचं काम आहे!" फरियादीची व्यथा, अभिनेत्री खासदारची प्रतिक्रिया या व्हिडीओमध्ये एक नागरिक अत्यंत...
पुणे जिल्हा परिषदेत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर फसवणुकीचा गंभीर आरोप, परिसरात खळबळ
पुणे | प्रतिनिधी : पुणे जिल्हा परिषद परिसरात सोमवारी एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा कथित प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे जिल्हा परिषद परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेत महिला भाजल्याने तिला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला...
भुसावळमधील वांजोळा चौक बनला ‘डेथ ट्रॅप’; महिनाभरात 10 भीषण अपघात, अनधिकृत प्रवेश मार्गांमुळे नागरिकांमध्ये भीती
भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील वांजोळा चौक हा सध्या अपघातांचा हॉटस्पॉट ठरत असून, गेल्या अवघ्या एका महिन्यात या चौकात तब्बल 10 गंभीर रस्ते अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाढत्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांनी या चौकाला आता ‘डेथ ट्रॅप’ अर्थात मृत्यूचा सापळा अशी उपमा दिली आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे परिसरातील नागरिक, वाहनचालक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले...
प्रबोधन पर्वानिमित्त आयोजित परिसंवादात विचारवंत, साहित्यिक आणि कलाकारांच्या तोंडून महामानवांच्या कार्याची प्रेरणादायी मांडणी
पिंपरी– क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेला समतेचा, ममतेचा आणि सर्जनशीलतेचा लढा हा केवळ इतिहासातील एक अध्याय नसून, आजच्या समाजासाठी मार्गदर्शक तारा आहे. शिक्षण, स्त्री-पुरुष समता, शेतकरी न्याय, लोककला आणि संवाद या मूल्यांद्वारे त्यांनी सामाजिक परिवर्तनाचं जे बीज पेरले, ते आजही प्रेरणादायी आहे. या महामानवांची शिकवण केवळ स्मरणात न ठेवता ती आचरणात आणणे हाच...
महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला हेवा वाटेल असे स्मारक उभारू – अण्णा बनसोडे
पिंपरी येथे उभारण्यात येत असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी प्रकल्प शहरातील आंबेडकरी जनतेच्या तब्बल २२ वर्षांच्या संघर्षलढ्याचे यश आहे. हा आनंदाचा क्षण असून महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला हेवा वाटेल असे रमाई स्मारक उभारू, असे प्रतिपादन राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले. रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या २८ एप्रिलला होत आहे, या पार्श्वभूमीवर बनसोडे...
‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेची घोषणा करण्यात आली. यावेळी या स्पर्धेचे बोधचिन्ह, जर्सीचे अनावरण करण्यात आले तर शुभंकर प्रदर्शित करण्यात आले. या ऐतिहासिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, युसीआय (Union Cycliste International) आणि इतर संबंधित संस्थांसोबत समन्वय साधून काम सुरू असल्याची माहिती...











