त्वष्टा कासार वाचनालय, कसबा पेठ, पुणे – माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” साजरा
पुणे : त्वष्टा कासार वाचन मंदिर, कसबा पेठ येथे आज माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान कसबा संस्कार वर्गाचे संचालक श्री. अनिल दिवाणजी व सौ. अनघा दिवाणजी उपस्थित राहून कलाम यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून त्यांचे स्मरण केले. कार्यक्रमात कसबा संस्कार वर्गातील ४० मुलांना पुस्तके व खाऊ वाटप करण्यात आले....
ऐतिहासिक लालमहल चौकात दहीहंडीचा जल्लोष; पुण्यात ‘डीजे-मुक्त दहीहंडी’ची नवी परंपरा सुरू
पुणे – गोकुळाष्टमीचा जल्लोष आणि गोविंदा-रे गोपाळाच्या जयघोषाने ऐतिहासिक लालमहल चौक पुन्हा एकदा थरारून गेला. हजारो पुणेकरांच्या उपस्थितीत पुणीत बालन ग्रुपने ‘डीजे-मुक्त दहीहंडी’चा अनोखा उपक्रम राबवून एक नवा आदर्श घालून दिला. ढोल-ताशा, बॅंड, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि गोविंदांच्या उत्साहाने परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्यात राधेकृष्ण ग्रुपच्या खेळाडूंनी सात थर रचत दहीहंडी फोडण्याचा बहुमान पटकावला. पुण्यातील २६ सार्वजनिक मंडळांनी मिळून संयुक्त...
पुणे रिंग रोड प्रकल्प, रस्त्याची कामे व मेट्रो कॅरिडोरची कामे प्रगतीपथावर – मंत्री दादाजी भुसे
नागपूर : पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंग रोड सह विविध रस्ते व मेट्रो प्रकल्पाची कामे सुरु आहेत. रिंगरोडच्या पूर्व भागाचे काम मे 2028 पर्यंत आणि पश्चिमेकडील भागाचे काम मे 2026 पर्यंत पूर्ण होईल. तसेच हडपसर-लोणी काळभोर मेट्रो कॅरिडॉरच्या कामाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. सदस्य राहुल कुल यांनी पुणे रिंग रोड व इतर प्रकल्पासंदर्भात...
के.सी. वेणुगोपालांचा भाजपवर पलटवार : “अमित शहा गुजरातचे गृहमंत्री होते आणि त्यांना अटक झाली होती, आम्हाला नैतिकता शिकवू नका!”
काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेत्यांकडून सतत "नैतिकता" या मुद्द्यावर भाष्य होत असताना, वेणुगोपाल यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उल्लेख करत त्यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री होते आणि त्यांना अटक झाली होती. त्यामुळे भाजपकडून आम्हाला नैतिकतेचे धडे देण्याची आवश्यकता नाही." त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली...
पावसाळी अधिवेशन २०२५ – आठवडा २, दिवस २ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान भवनात सकाळी आगमन!
मुंबई – महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी १०.४५ वाजता विधान भवनात दाखल झाले. मुंबईतील विधान भवन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे. आजच्या दिवशी महत्त्वाचे विधेयक मांडले जाण्याची शक्यता असून, अनेक विरोधी पक्षनेत्यांनी शेतकरी कर्जमाफी, महागाई, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, महिला सुरक्षेचा मुद्दा आणि बेरोजगारी यावर चर्चा करण्याची...
पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉर; गोळीबारात तरुणाचा मृत्यू
पुणे | गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे शहर हादरवणारी मोठी घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात झालेल्या गँगवॉरमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. या गँगवॉरमध्ये गोळीबार झाला असून, त्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पेठेत झालेल्या गोळीबारात वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा...
मोबाईल हरवले? पर्वती पोलिसांनी दिला दिलासा! तब्बल ६ लाखांचे २० मोबाईल शोधून नागरिकांना परतवले | पुणे पोलिसांची उल्लेखनीय सेवा
पुणे | २६ जुलै २०२५ — पर्वती पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात मागील काही महिन्यांपासून नागरिकांकडून मोबाईल हरवल्याच्या तक्रारी वाढत होत्या. मात्र पर्वती पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सातत्यपूर्ण तपास व इमानदारीने कार्य करत तब्बल ₹६,००,००० किंमतीचे २० हरवलेले मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले. ही कामगिरी पुणे पोलिसांच्या जनतेप्रती असलेल्या सेवाभावाची आणि कार्यक्षमतेची प्रचिती देणारी ठरली आहे. मोबाईल हरवले, पण पर्वती...
बुलढाण्यात दोन गटांमध्ये संघर्ष; दगडफेक, जाळपोळ आणि हाणामारी, पोलिसांनी ताबा घेतला.
धाड गावात मिरवणुकीत वादामुळे तणावपूर्ण वातावरण बुलढाणा तालुक्यातील धाड गावात शनिवारी रात्री मिरवणुकीत फटाके फोडण्याच्या वादामुळे दोन गटांमध्ये मोठा संघर्ष झाला. रात्री दहा वाजता सुरू झालेल्या या वादाने पाहता-पाहता तुफान दगडफेक, हाणामारी आणि जाळपोळ होऊन गावात दंगलसदृश वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत १७ आरोपींवर गुन्हे दाखल केले असून, त्यांना अटक केली आहे. यामुळे धाड गावात पोलिसांचा...
पत्ते उधळले, बॅनर फाडला… पण छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांपुढे एकाही दादा गटाच्या कार्यकर्त्याची हिंमत झाली नाही!
हिंमत, जोश आणि निडरपणाचे दर्शन घडवत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली. स्थानिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काही बॅनर फाडण्यात आले, पत्ते उधळण्यात आले आणि वातावरण तापवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, छावा संघटनेच्या ठाम उपस्थितीमुळे विरोधी गटाचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. विशेष म्हणजे, 'दादा गटाचे' एकही कार्यकर्ते प्रत्यक्ष मैदानात उतरले नाहीत. छावा संघटनेच्या जोशात, त्यांच्याशी थेट पंगा घेण्याची कोणाचीच हिंमत झाली...
पावसाच्या आगमनाने उघड झाली बीएमसीची अपयशी तयारी, हिंदमाता ते कुर्ला – सगळीकडे जलमय स्थिती
मुंबई | प्रतिनिधी :- मुंबईत मान्सूनने यंदा 26 मे रोजीच दमदार हजेरी लावली, मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अद्याप अपूर्ण असलेल्या पावसापूर्व तयारीमुळे शहर पुन्हा एकदा पाण्याखाली गेलं आहे. हिंदमाता, गांधी मार्केट, कुर्ला, चेंबूर, गोवंडीसह अनेक जुन्या व नव्या जलभरतीच्या ठिकाणी पाणी साचले असून, मेट्रो रेल्वेच्या एक्वा लाईनवरील काही स्थानकांसुद्धा जलमय झाली आहेत. अर्धवट तयारीमुळे मुंबईची मान्सून परीक्षेत पुन्हा नापासबीएमसीने अद्याप...










