*”मुख्य मंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्तआमदार अमित गोरखे यांचे सामाजिक उत्तरदायित्व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचे योगदान!”
*"मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमित गोरखे यांचे सामाजिक उत्तरदायित्व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचे योगदान!"* मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा सन्मान करीत व त्यांच्या 'उत्सव नव्हे, उत्तरदायित्व!' या मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणादायी संकल्पनेनुसार आमदार श्री. अमित गोरखे यांनी एक सामाजिक बांधिलकी जोपासली. आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस...
“जोडी तुटायची नाही, साथ सुटायची नाही!” – देवेंद्र फडणवीस व अजित दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व, संयम, आणि विकासदृष्टी या सर्वांचा संगम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन बड्या नेत्यांचा आज वाढदिवस! राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेक मान्यवरांकडून, कार्यकर्त्यांकडून आणि जनतेकडून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत. "जोडी तुटायची नाही, साथ सुटायची नाही" या शब्दांत त्यांच्या सुसंवाद, सहकार्य आणि विकासाच्या धोरणांतील एकरूपतेचं वर्णन अनेकांनी केलं आहे. दोघांनीही एकमेकांवरचा विश्वास,...
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रासाठी शासनाची नवी कार्यपद्धती – हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदींवर आधारित निर्णय
मुंबई, दि. २ सप्टेंबर : मराठा समाजाच्या दीर्घकाळच्या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने स्पष्ट कार्यपद्धती जाहीर केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढलेल्या या शासन निर्णयामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी मा. न्यायमूर्ती...
पुण्यातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा; चार पदरी भुयारी मार्ग प्रकल्पासाठी 550 कोटींचा प्रस्ताव सादर
पुणे – पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे भेटीदरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी शहरासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या चार पदरी भुयारी मार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव गडकरी यांच्याकडे सादर केला. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. हा प्रकल्प शिवाजी...
मराठा समाजासाठी ऐतिहासिक विजय! महायुती सरकारचा आरक्षणविषयक निर्णय लागू, ग्रामपातळीवर कुणबी प्रमाणपत्रासाठी मार्ग मोकळा
महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक दशकांपासून चाललेल्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. आज महायुती सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील अनेक महत्वाच्या मागण्या मान्य केल्या असून, हा दिवस मराठा समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक मानला जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाजाने सातत्याने आरक्षणासाठी आंदोलन केले. या आंदोलनाच्या मागे सामाजिक न्याय, आर्थिक उन्नती आणि समान संधी सुनिश्चित करण्याची महत्त्वाची गरज होती. तत्कालीन मुख्यमंत्री...
शिवसेनेच्या निष्ठेची प्रेरणा बाळासाहेबांकडूनच मिळाली – अंबादास दानवे यांची भावनिक प्रतिक्रिया
विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेतील आपली टर्म संपत असताना दिलेल्या वक्तव्यात अत्यंत भावनिक आणि ठाम भूमिका मांडली आहे. "मी कार्यकर्ता आहे, शिवसैनिक आहे. मी इथे येणार नसलो तरी माझ्या बाकीच्या मॅचेस चालू राहतील," असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी शिवसेनेप्रतीची निष्ठा अधोरेखित केली. दानवे यांनी सांगितले की, "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला २००० साली बोलावले होते. शहरप्रमुख पदासाठी...
चारोली परिसरात बिबट्याचा वावर! नागरिकांनी घ्यावी काळजी, वनविभाग सज्ज
चारोली बुद्रुक परिसरातील दाभाडे वस्तीमध्ये बिबट्या मादी आणि तिची दोन बछडी आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत वनविभागाने तात्काळ कारवाई सुरू केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. वनविभागाचे अधिकारी श्री. ई. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच आमचे सहकारी श्री. अनिकेत गायकवाड यांच्या सहकार्याने ट्रॅप कॅमेरे व यंत्रणा...
माळशिरस तालुक्यातील मरकडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी; प्रशासनाने परवानगी नाकारल्याने गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा, गावात संचारबंदी लागू.
सोलापूर, मरकडवाडी: माळशिरस तालुक्यातील मरकडवाडी गावात नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) प्रणालीवर अविश्वास व्यक्त करत गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या मागणीस नकार दिल्याने गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गावातील परिस्थिती बिघडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने २ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२४ या कालावधीत गावात संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी आणि कायदा...
“न्यायाच्या सर्वोच्च शिखरावर नागपूरचा ठसा – सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या जिव्हाळ्याच्या शहरात भावूक सत्कार!”
नागपूर – न्यायालयीन क्षेत्रातील सर्वोच्च पद भूषवणाऱ्या सरन्यायाधीश भूषण गवई यांचा नागपूर जिल्हा वकील संघटनेतर्फे भव्य सत्कार समारंभ नुकताच जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडला. या कार्यक्रमात सरन्यायाधीश गवई यांनी नागपूरच्या त्यांच्या वाटचालीतील योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि आपल्या न्यायालयीन कारकिर्दीच्या भावनिक आठवणी शेअर केल्या. गवई म्हणाले, “दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनी आई-वडीलांसह दीक्षाभूमीवर येणं ही जणू श्रद्धेची परंपरा होती. वकिलीच्या...
मुंबई: पोलीस शिपायाने पोस्टल मतदार चिठ्ठीचे सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले; निवडणूक प्रक्रियेच्या पवित्रतेला धक्का.
मुंबई : निवडणूक प्रक्रियेच्या गोपनीयतेला धक्का देणाऱ्या एका प्रकरणात, मुंबईतील एका पोलीस शिपायावर कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक शस्त्र पोलीस विभागातील पोलीस शिपाई गणेश शिंदे याने पोस्टल मतदार चिठ्ठीचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केल्याने, निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपशील: गणेश शिंदे, बीड जिल्ह्यातील अस्ती मतदारसंघाचा मतदार असून, मुंबईतील ताडदेव येथील...











