महाराष्ट्र
भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे दर्शन; लोकसेवेसाठी घेतली आध्यात्मिक ऊर्जा
अक्कलकोट : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात जाऊन पवित्र दर्शन घेतले. स्वामींच्या समाधीस्थळावर नतमस्तक होत त्यांनी प्रार्थना केली आणि समाजसेवेच्या कार्यासाठी आशीर्वाद घेतला. मंदिर परिसरात अत्यंत भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण होते. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने मनाला विलक्षण शांती लाभते आणि आयुष्याच्या धकाधकीत हरवलेली ऊर्जा पुन्हा एकदा नव्याने...
माता रमाबाई नगरमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; जीर्ण पाईपलाईन तातडीने बदलण्याची मागणी
मुंबई :भांडुप पूर्व येथील प्रभाग क्रमांक ११४ मधील माता रमाबाई नगर परिसरात पिण्याच्या पाण्यात दूषित घटक मिसळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नळातून येणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत असून पाण्याचा रंगही गढूळ दिसत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली...
अजितदादांच्या विचारांना सलाम; परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हाला शिवमुद्रा संघटनेचा जाहीर पाठिंबा
परभणी :महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी आयुष्यभर सामान्य माणसाच्या हक्कासाठी, शेतकरी–कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांसाठी आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य आजही जनतेच्या मनात घर करून आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या विकासकामांमुळे ग्रामीण भागाला नवी दिशा मिळाली. त्या कार्याची आठवण जपत आणि त्यांच्या विचारांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शिवमुद्रा संघटनेने परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित...
विवाहाचा पहिला वाढदिवस सेवेला अर्पण; ‘मंगल सेवा’ उपक्रमातून दरवर्षी ५०० दिव्यांग नववधूंना आर्थिक आधार
पुणे :जीत आणि दिवा या दांपत्याने त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा पहिला वाढदिवस अतिशय वेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा करत समाजासमोर सेवाभावाचे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. आजच्या दिवशीच गेल्या वर्षी त्यांनी संसारासोबत समाजसेवेचा संकल्प करत ‘मंगल सेवा’ हा उपक्रम सुरू केला होता, ज्याअंतर्गत दरवर्षी ५०० नवविवाहित दिव्यांग बहिणींना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे व्रत त्यांनी घेतले आहे. या उपक्रमामुळे...
वकील वर्गाच्या सर्वांगीण कल्याणासाठी स्वतंत्र कमिटी कार्यरत – ॲड. सचिन पानी यांची ग्वाही
पिंपरी–चिंचवड :वकिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, त्यांच्या व्यावसायिक अडचणी तसेच सामाजिक व कल्याणकारी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी “अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲडव्होकेट बार असोसिएशन, पिंपरी चिंचवड” या नव्या वकील संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून वकील वर्गाच्या हितासाठी स्वतंत्र कमिटी कार्य करणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सचिन पानी यांनी दिली. पिंपरी–मोरवाडी...
निगडी–दापोडी रस्त्यावरील भुयारी मार्गाला लवकरच गती; हलक्या वाहनांसाठी सुरक्षित आणि थेट मार्ग उपलब्ध होणार
पिंपरी–चिंचवड :शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता निगडी–दापोडी रस्त्यावरील पिंपरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपूलासमोर हलक्या वाहनांसाठी भुयारी मार्ग (Light Vehicular Underpass) उभारण्याच्या कामाला आता वेग मिळणार आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन तातडीने निविदा प्रक्रिया सुरू करण्याची ठोस मागणी केली आहे. सध्या पिंपरी LC गेट क्र. ६० येथे उभारण्यात...
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर ३० तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प; पाणी-अन्नाविना हजारो प्रवासी अडकले, गॅस टँकर अपघातामुळे अभूतपूर्व कोंडी
मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी झालेल्या गॅस टँकर अपघातानंतर निर्माण झालेली भीषण वाहतूक कोंडी तब्बल ३० तासांहून अधिक काळ कायम राहिली. आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलीन वायू वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली आणि सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी संपूर्ण वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली. परिणामी हजारो वाहनचालक, कुटुंबे, लहान मुले, वृद्ध आणि कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक...
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांना अखेरचा निरोप; उत्राणे गाव शोकसागरात, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांच्या आकस्मिक निधनामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर येताच कार्यकर्ते, सहकारी आणि नागरिकांमध्ये शोककळा पसरली. आज त्यांच्या मूळगावी बागलाण तालुक्यातील उत्राणे येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. गावात सर्वत्र शांतता आणि हळहळ दिसून येत होती. सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी आणि अंत्यसंस्कारस्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली...
साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून शहरात मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरू आहे. चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता केवळ दोन महिने शिल्लक राहिले आहेत. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना कर भरण्यास अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच शहरातील १८ विभागीय कर संकलन कार्यालये शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही...
एकाच टँकरने थांबवला संपूर्ण वेग! मुंबई–पुणे एक्सप्रेस-वे २४ तास बंद; ‘हायटेक इन्फ्रास्ट्रक्चर’वर गंभीर प्रश्नचिन्ह
मुंबई/पुणे : देशातील सर्वात आधुनिक आणि वेगवान महामार्ग म्हणून ओळखला जाणारा मुंबई–पुणे एक्सप्रेस-वे एका अपघातामुळे तब्बल २४ तास ठप्प राहिल्याने राज्याच्या पायाभूत सुविधांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने झालेल्या गॅस गळतीमुळे प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली. परिणामी हजारो वाहनचालक आणि प्रवासी महामार्गावरच अडकून पडले. सुमारे ९२ किलोमीटर...





