महाराष्ट्र
मुंढवा पोलिसांची मोठी कारवाई; सार्वजनिक ठिकाणी नियम तोडणाऱ्यांवर न्यायालयात खटले दाखल, हजारो रुपयांचा दंड व कारावासाची शिक्षा
पुणे | मुंढवा :– सार्वजनिक ठिकाणी अनुशासनभंग करणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी मुंढवा पोलीस ठाण्याकडून जोरदार मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, ज्वालाग्राही पदार्थांचा वापर, आणि विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू असणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (पूर्व विभाग), पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे (परिमंडळ-५) आणि सहा. पोलीस...
महाराष्ट्रातील शाळांमध्ये आता CBSE अभ्यासक्रम लागू; शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी क्रांती
मुंबई, दि. २० मार्च २०२५ – महाराष्ट्रातील शालेय शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडवत राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते बारावी या वर्गांसाठी CBSE अभ्यासक्रम लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी विधान परिषदेत ही घोषणा करत सांगितले की, येत्या 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. CBSE अभ्यासक्रमामुळे शिक्षणात गुणवत्ता वाढणार या निर्णयामुळे राज्य...
सैन्य दलातील भगोड्या जवानाचा चोरीसाठी कट! वानवडी पोलिसांनी गुप्त तपासातून पकडला, लाखोंचा ऐवज जप्त
पुणे शहरातील वानवडी परिसरात एका सैन्य दलातील भगोड्या जवानाने चक्क सरकारी निवासस्थानातून लाखोंचा ऐवज लंपास करत धक्कादायक कृत्य केले आहे. हा जवान चोरी करून फरार झाला होता, मात्र वानवडी पोलिसांच्या उल्लेखनीय तपासामुळे त्याला अखेर अटक करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली असून, सैन्य दलातील एका जवानानेच आपल्या सहकाऱ्याचे घर फोडल्याची बाब समोर आल्याने मोठे धक्कादायक...
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजितदादांचा निळकंठेश्वर पॅनल विजयी! 21 पैकी 20 जागांवर दणदणीत यश; युवा नेते यश साने व पंकज भालेकर यांची अभिनंदन भेट
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बहुचर्चित आणि राज्याचे लक्ष वेधून घेणारा निकाल अखेर जाहीर झाला असून, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलने तब्बल 21 पैकी 20 जागा जिंकत प्रचंड दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालामुळे अजित पवारांचे सहकार क्षेत्रातील वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले असून, विरोधी शरद पवार यांच्या बळीराजा पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही. या विजयामुळे संपूर्ण बारामती परिसरात...
प्रबोधन पर्वानिमित्त आयोजित परिसंवादात विचारवंत, साहित्यिक आणि कलाकारांच्या तोंडून महामानवांच्या कार्याची प्रेरणादायी मांडणी
पिंपरी– क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेला समतेचा, ममतेचा आणि सर्जनशीलतेचा लढा हा केवळ इतिहासातील एक अध्याय नसून, आजच्या समाजासाठी मार्गदर्शक तारा आहे. शिक्षण, स्त्री-पुरुष समता, शेतकरी न्याय, लोककला आणि संवाद या मूल्यांद्वारे त्यांनी सामाजिक परिवर्तनाचं जे बीज पेरले, ते आजही प्रेरणादायी आहे. या महामानवांची शिकवण केवळ स्मरणात न ठेवता ती आचरणात आणणे हाच...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इस्कॉनचे डॉ. सूरदास प्रभू यांची मंत्रालयात सदिच्छा भेट; आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमांवर सखोल चर्चा
मुंबई (दि. १७ जून २०२५) – इस्कॉन (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस) चे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. सूरदास प्रभू यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालय, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीत सामाजिक, आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रमांबाबत विस्तृत चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. सूरदास प्रभू यांच्या सेवाभावी कार्याची प्रशंसा करत इस्कॉनच्या उपक्रमांना शासनाची पूर्ण सहकार्याची हमी...
‘वाईल्ड ताडोबा’ ट्रेलरचे शानदार अनावरण! CM फडणवीस यांच्याहस्ते सुब्बीया नल्लामुथु यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरव
मुंबई, मंत्रालय | दिनांक - २९ जुलै २०२५ | वेळ - दु. २ वा. वन्यजीव संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 'वाईल्ड ताडोबा' या आंतरराष्ट्रीय माहितीपटाचा ट्रेलर मंत्रालायात भव्य कार्यक्रमात लाँच करण्यात आला. या माहितीपटातून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक सौंदर्य, व्याघ्रांचे जीवन आणि जंगलातील जैवविविधतेचा थरारक आढावा घेतला गेला आहे. या सोहळ्यात जागतिक दर्जाचे दिग्दर्शक, निर्माता आणि...
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे भव्य उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते! महाराष्ट्राच्या विकासात ऐतिहासिक पाऊल
महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा क्षण आज घडला! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंतचा प्रवास आता पूर्णपणे अखंड आणि सुसज्ज महामार्गावरून होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्याचे उद्घाटन झाल्याने ७०१ किलोमीटर लांब महामार्ग आता सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. या महामार्गामुळे समृद्ध महाराष्ट्राची संकल्पना आता प्रत्यक्षात उतरली आहे,...
भरदिवसा अपहरणाचा थरार! नांदेडमध्ये तरुणीचं अपहरण; कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उभा
नांदेड शहरात भरदिवसा एका तरुणीचं धक्कादायक अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सार्वजनिक ठिकाणी, लोकांच्या नजरेसमोरच ही तरुणी बळजबरीनं गाडीत बसवली गेली आणि आरोपी फरार झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न...
पुणे गुन्हे शाखेचा मोठा पराक्रम! ‘मोक्का’तील पाहिजे आरोपी संदीप केंदळे जेरबंद – खंडणीप्रकरणातील फरार आरोपीला सोलापुरातून पकडले
पुणे : गुन्हेगारी नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४ पथकाने एक मोठी कारवाई करत मोक्का अंतर्गत फरार असलेल्या संदीप गौतम केंदळे याला सोलापूरच्या कुर्डुवाडी येथून अटक केली आहे. आरोपीवर खंडणी, मारहाण, दहशत निर्माण करणे, शस्त्रबळाचा वापर आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत गंभीर आरोप आहेत. गुन्ह्याचा तपशील : ▪️ गु.र. नं. ४८१/२०२४ – विमानतळ पोलीस ठाणे▪️...











