बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील दहावा आरोपी नवी मुंबईतील बेलापूरमधून अटकेत; मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई.
मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवार, २२ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईच्या बेलापूर परिसरातून बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील दहाव्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव भगवतसिंग ओमसिंग (वय ३२) असून तो राजस्थानातील उदयपूर येथील जगत गावचा रहिवासी आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रकरणाची पार्श्वभूमी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील बांद्रा...
MLA निवासातील जेवणावरून मोठा राडा! आमदार संजय गायकवाड यांची कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण
मुंबई – विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच मंगळवारी रात्री आकाशवाणी आमदार निवासात एक धक्कादायक घटना घडली. *शिवसेना (शिंदे गट)*चे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील जेवण निकृष्ट असल्याच्या कारणावरून थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात गायकवाड कर्मचाऱ्याला डाळ वास घेण्यासाठी जबरदस्ती करत, त्यानंतर थेट थप्पड मारताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओत...
दुर्मीळ श्वसनमार्गातील हेमॅन्जिओमावर वेळेत उपचार; ८ महिन्यांच्या चिमुकलीला मिळाले नवे जीवन
मुंबई | १९ डिसेंबर – जन्मापासून श्वास घेण्यास त्रास सहन करणाऱ्या आठ महिन्यांच्या एका चिमुकलीला मुंबईतील नारायण हेल्थ SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये वेळेवर निदान व उपचारामुळे नवे आयुष्य मिळाले आहे. या बालिकेला अत्यंत दुर्मीळ आणि जीवघेण्या ठरू शकणाऱ्या ग्रेड-३ एअरवे हेमॅन्जिओमा या आजाराने ग्रासले होते. या आजारामुळे तिच्या श्वसनमार्गात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. परिणामी, तिला श्वास घेण्यास तीव्र अडचण,...
मराठा आंदोलकांसोबत सरकारचा दगाफटका? रोहित पवारांचा गंभीर आरोप
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली असून हजारोंच्या संख्येने आंदोलकांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थिती लावली आहे. जरांगे पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की "मराठ्यांच्या अंगावर गुलाल उधळल्याशिवाय मी इथून जाणार नाही". यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या उपोषणाकडे लागले आहे. दरम्यान, या चळवळीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून दगाफटका होत असल्याचे आरोप पुढे येत आहेत....
भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली
भारतीय जनता पक्षाने (भाजप) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीतून प्रमुख उमेदवारांची निवडक नावे समोर आली आहेत, ज्यात नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडणवीस आणि कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. याशिवाय, 13 महिला उमेदवारांच्या नावांचीही यादी जाहीर करण्यात आली असून, यात मुंबईतील गोरेगावमधून माजी मंत्री विद्या ठाकूर यांचे नाव सामील आहे. यावेळी दिलेल्या यादीत मुंबईच्या...
कल्याण-डोंबिवलीतील पलावा पुलावरून राजकीय वातावरण तापलं; मनसे, ठाकरे गटाची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका!
सेनेने खुला केलेला पूल पुन्हा बंद; जनतेची फसवणूक की राजकारण? राजू पाटील यांनी केली पाहणी कल्याण-डोंबिवली – शहरातील बहुप्रतीक्षित आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पलावा पूल राजकीय वादाचा केंद्रबिंदू ठरत आहे. शिंदे गटाच्या सेनेकडून रविवारी प्रवाशांसाठी उघडण्यात आलेला हा पूल अवघ्या काही तासांतच पुन्हा बंद करण्यात आला, आणि यावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. या घडामोडीनंतर मनसेचे नेते व माजी आमदार राजू...
स्व. राज पुरोहित यांना भावपूर्ण श्रद्धांजली – मुंबईत पुरोहित कुटुंबियांची भेट घेऊन व्यक्त केली शोकभावना
मुंबई :माजी मंत्री तथा मुंडे साहेबांचे अत्यंत निकटवर्तीय स्व. राज पुरोहित जी यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट देऊन पुरोहित कुटुंबियांचे सांत्वन करण्यात आले आणि मनःपूर्वक शोकभावना व्यक्त करण्यात आल्या. या भेटीदरम्यान स्व. राज पुरोहित यांच्या कार्याची आठवण करून देताना सांगण्यात आले की, ते अत्यंत समर्पित, निष्ठावान आणि जनतेशी घट्ट नातं...
मुंबईसाठी दिलासा! मुसळधार पावसामुळे तलावांच्या जलसाठ्यात वाढ; साठा २५.१७ टक्क्यांवर
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा वाढून २५.१७ टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने दिली आहे. शहराच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात कमी झाली असली, तरी अजूनही समाधानकारक साठा होण्यासाठी पुढील काही दिवस पावसाची गरज भासत आहे. सध्या तलावांमध्ये किती पाणीसाठा आहे?BMC च्या २० जून रोजीच्या अहवालानुसार, ३,६४,२३३ मिलियन...
मुंबईत गुंतवणूक फसवणूक: २५ संचालक, एजंट्सवर २१४ जणांना ३५ कोटींचा गंडा घालण्याचा गुन्हा दाखल.
मुंबई पोलिसांनी चार कंपन्यांच्या २५ संचालकांसह दोन डझन एजंट्सवर २१४ गुंतवणूकदारांना ३५ कोटी रुपयांचा फसवणूक प्रकरणात गंडा घालण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या फसवणुकीत गुंतलेल्या गुंतवणूकदारांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे, मात्र सध्या २०० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपींनी आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून लोकांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले आणि शेवटी त्यांची फसवणूक केली. अंबोली पोलिसांनी पुण्याच्या बाणेर परिसरातील...
नालासोपाऱ्यात पोलिसांच्या मानसिक छळाला कंटाळून बिल्डरचा आत्महत्येचा टोकाचा निर्णय; चौकशीची मागणी तीव्र
नालासोपारा (जि. पालघर) – नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, जयप्रकाश (JP) चौहान या स्थानिक बिल्डरने पोलिसांच्या मानसिक छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. चौहान यांच्या आत्महत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जयप्रकाश चौहान यांच्या आत्महत्येनंतर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी दोन पोलीस अधिकारी – शाम शिंदे आणि...










