मुंबई

Home मुंबई Page 48

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर ३० तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प; पाणी-अन्नाविना हजारो प्रवासी अडकले, गॅस टँकर अपघातामुळे अभूतपूर्व कोंडी

0

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी झालेल्या गॅस टँकर अपघातानंतर निर्माण झालेली भीषण वाहतूक कोंडी तब्बल ३० तासांहून अधिक काळ कायम राहिली. आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलीन वायू वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली आणि सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी संपूर्ण वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली. परिणामी हजारो वाहनचालक, कुटुंबे, लहान मुले, वृद्ध आणि कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक...

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! — सात जलाशय 97.68% क्षमतेने भरले; पाणीसाठ्यात मोठी वाढ

0

मुंबई : मुंबईकरांसाठी पाण्याच्या पुरवठ्याबाबत आनंदाची बातमी आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ताज्या आकडेवारीनुसार, शहराला पिण्याचे पाणी पुरवणारे सातही जलाशय तब्बल 97.68 टक्के क्षमतेने भरले आहेत. सध्या या तलावांमध्ये एकूण 14,13,808 दशलक्ष लिटर पाणी साठवलेले आहे. यामुळे मुंबईतील पाणीटंचाईची भीती काही काळासाठी तरी दूर झाली आहे. महानगरपालिकेकडून दररोज मुंबईला Upper Vaitarna, Modak Sagar, Tansa, Middle Vaitarna, Bhatsa, Vehar आणि Tulsi...

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघात! तब्बल १३ वाहनांचा झाला चुराडा, वाहनचालकांत घबराट

0

पुणे | मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळी एक भीषण साखळी अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल १३ वाहने एकमेकांवर आदळून चुरडून गेली, परिणामी महामार्गावर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. धुकं, भरधाव वेग आणि निष्काळजीपणा ठरले कारण! प्राथमिक माहितीनुसार, घनदाट धुकं, ओला रस्ता आणि वाहनचालकांचा भरधाव वेग हे या दुर्घटनेचे प्रमुख कारण ठरले आहे. अनेक वाहनचालकांना वेळेत ब्रेक न लागल्याने, एकामागोमाग एक...

गोरेगाव फिल्मसिटीतील ‘अनुपमा’ मालिकेच्या सेटला आग – मोठा अनर्थ टळला, शॉर्टसर्किटची शक्यता, NOC नसल्यानं प्रश्नचिन्ह

0

मुंबई, २३ जून २०२५ – गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीतील लोकप्रिय हिंदी मालिका ‘अनुपमा’च्या सेटला सोमवारी पहाटे आग लागली. ही घटना सकाळी ६.१० वाजता घडली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मुंबई फायर ब्रिगेडने दिली आहे. आग ५००० चौ.फु. परिसरात पसरली होती, ज्यात इलेक्ट्रिक वायरिंग, कॅमेरे, पोशाख, लाईटिंग सिस्टीम व सेटवरील सजावटीच्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

कर्तृत्वाचा गौरव आणि अभिमानाचा क्षण: गुन्हे शाखेत पदोन्नतीचा सोहळा, ‘पाइपिंग सेरेमनी’त कुटुंबीयांच्या उपस्थितीत सन्मान

0

मुंबई | प्रतिनिधी पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण सेवेचा गौरव करत आज गुन्हे शाखेतील तीन पोलीस शिपाई यांना पोलीस हवालदार पदावर, तर एका पोलीस हवालदारास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर पदोन्नती देण्यात आली. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘पाइपिंग सेरेमनी’ कार्यक्रमात पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पदचिन्हे प्रदान या सोहळ्यात अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे यांच्या...

मुंबईत मांत्रिकाने ‘भूत काढण्यासाठी’ बोलवून ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार; पोलिसांनी गुन्हा दाखल केला

0

मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामध्ये सांताक्रुझ भागातील एका ३२ वर्षीय महिलेवर एका मांत्रिकाने अत्याचार केला. महिला कौटुंबिक आणि आरोग्याच्या समस्यांमुळे मानसिक संघर्षात असल्याने मदतीसाठी ही मांत्रिका जवळ गेली होती. तुमच्या अंगात भूत आहे, हे काढून टाकण्यासाठी पूजा करावी लागेल, असे म्हणत मांत्रिकाने तिला पुजेच्या नावाखाली आमंत्रित केले. पूजा सुरू असतानाच त्याने तिच्यावर बलात्कार केला. सुरुवातीला महिला हा...

सरकारी यंत्रणेला शिस्त लावणारा निर्णय! तलाठी ते उपजिल्हाधिकारी ‘फेसॲप’ वर देणार हजेरी

0

महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतला आहे. तलाठ्यांपासून ते थेट उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व शासकीय अधिकाऱ्यांना फेसऍपद्वारे दररोज हजेरी लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा निर्णय शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रशासनासाठी अत्यावश्यक ठरणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा करत स्पष्टपणे सांगितले की, "सरकार लाख चांगले निर्णय घेते, पण अधिकारीच जर जबाबदारीने काम करत नसतील, तर जनतेपर्यंत त्या...

ठरलं! १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर – ५ फेब्रुवारीला मतदान

0

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत असतानाच, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार आहे. या घोषणेमुळे गावोगावी प्रचारसभा, बैठका आणि राजकीय हालचालींना वेग येणार आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य...

मानवतेचा आदर्श ठरलेली जान्हवी! मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹2.50 लाखांची देणगी

0

मुंबई : सामाजिक भान आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी याचे उत्तम उदाहरण ठरवत जान्हवी सुधाकर यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी ₹2.50 लाखांचा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. मुंबईत आयोजित छोटेखानी समारंभात ही देणगी प्रदान करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जान्हवी यांचे मन:पूर्वक आभार मानत त्यांच्या या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. "संकटकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी गरजूंना दिलासा देतो. अशा...

लिबर्टी गार्डन सोसायटीत रस्ते व सांडपाणी लाईन कामाचा आढावा – दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश

0

मुंबई : वॉर्ड क्रमांक ४७ मधील लिबर्टी गार्डन सोसायटी परिसरात सुरू असलेल्या CC रोड आणि सांडपाणी वाहिनी (सीवेज लाईन) कामाचा प्रत्यक्ष स्थळी पाहणी करून सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित कंत्राटदार तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा करण्यात आली. परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेता, रस्त्याचे मजबुतीकरण व सांडपाणी व्यवस्थेचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होणे...

Copyright ©