राजकीय

Home राजकीय Page 43

महिला टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विश्वविजेत्या संघाचा गौरव

0

मुंबई | विशेष प्रतिनिधी भारताच्या दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेट संघाने जागतिक पातळीवर अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कामगिरी करत विश्वविजेतेपद पटकावले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संघातील खेळाडूंचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या या विशेष समारंभात देशाचा तिरंगा उंचावणाऱ्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी खेळाडूंना संबोधित करताना सांगितले की, दृष्टिबाधित महिला खेळाडूंनी...

भारत-युरोप संबंधांना नवी चालना; युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांची महत्त्वपूर्ण भेट

0

युरोपियन संघ आणि भारत यांच्यातील संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष Ursula von der Leyen यांची सदिच्छा भेट घेतल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. या बैठकीत भारत-युरोप संबंध, जागतिक घडामोडी आणि भविष्यातील सहकार्याबाबत सखोल चर्चा झाली. यावेळी जानेवारी महिन्यात झालेल्या त्यांच्या भारत दौऱ्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. त्या दौऱ्याने भारत आणि युरोपियन संघातील...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीचे उपपंतप्रधान अँटोनियो तायानी यांची फलदायी भेट

0

नवी दिल्ली येथे आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री अँटोनियो तायानी यांची विशेष भेट घेतली. दोन्ही देशांमधील संबंध झपाट्याने बळकट होत असलेल्या काळात झालेली ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीदरम्यान भारत–इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा (2025–2029) साठी दोन्ही देशांनी स्वीकारलेली प्रगतिशील, ठोस आणि वेळेवर अंमलात आणली जाणारी पावले अत्यंत...

भारत सागरी महासत्ता होण्यात महाराष्ट्र अग्रगण्य : जेएन पोर्ट टर्मिनल फेज-2 उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

0

नवी मुंबई : देशाला सागरी अर्थव्यवस्थेत महासत्ता बनविण्याच्या दिशेने महाराष्ट्राने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे. जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-2 च्या विस्तारामुळे भारताच्या सागरी क्षमतेत प्रचंड वाढ झाली असून, महाराष्ट्र यामध्ये प्रमुख भूमिका बजावणार आहे. “भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उरण (रायगड) येथे केले. महत्त्वाचा सोहळा –...

पुण्यात गर्भलिंगनिदान रॅकेटचा पर्दाफाश; गुन्हे शाखेची धडक कारवाई, दोघांना ताब्यात

0

पुणे : पुणे शहरात बेकायदेशीररित्या गर्भलिंगनिदान करणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेच्या युनिट-७ने मोठा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या धाडीत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय साहित्य आणि औषधे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गर्भलिंगनिदानासंदर्भात गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. डमी...

हिंजवडीतील भीषण दुर्घटना: पंचरत्न चौकात कंपनीच्या बसखाली 5 जण चिरडले; निरागस बहीण-भावाचा जागीच मृत्यू

0

हिंजवडी IT पार्क परिसरात बेदरकार वाहतूक आणि निष्काळजी वाहनचालकांचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा जीवघेणे ठरले आहे. पंचरत्न चौकात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला असून रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल (दि. 1) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कामगारांना घेऊन जाणाऱ्या कंपनीच्या बसचे नियंत्रण सुटल्याने हा भयावह अपघात घडला. भरधाव वेगात असलेली बस अचानक थेट फुटपाथवर चढली आणि तिथून...

महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना रचनात्मक कार्यासाठी एकत्र येऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातील सर्वाधिक सक्षम आणि स्थिर असून, सर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत आहे. कर्ज, राजकोषीय तूट, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, सिंचन, वीज, दळणवळण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात राज्याने भरीव काम केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. राज्याची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना पुढचा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील सर्व ...

“इंडिया मेरीटाईम वीक २०२५” — भारताच्या सागरी सामर्थ्याचे दर्शन!

0

मुंबई : भारताच्या सागरी क्षेत्रातील प्रगती, तंत्रज्ञान, आणि व्यापार क्षेत्रातील नव्या संधींचा उत्सव म्हणून “इंडिया मेरीटाईम वीक २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सागरी मंडळ, मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील सागरी उद्योगातील तज्ज्ञ, उद्योजक आणि धोरणनिर्माते या आठवड्यात सहभागी होणार आहेत. या वर्षीचा मेरीटाईम वीक...

वाकडच्या डांगे चौक ते भुमकर चौक रस्ता रुंदीकरणास गती; काळाखडक येथील ९६ अनधिकृत झोपड्यांवर निष्कासनाची धडक कारवाई

0

पिंपरी चिंचवड | १६ जुलै २०२५ – शहरातील वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने रस्ता रुंदीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वाकडमधील डांगे चौक ते भुमकर चौक या ४५ मीटर रुंदीच्या नियोजित रस्त्यावर अडथळा ठरत असलेल्या ९६ झोपड्यांवर काल महापालिकेने मोठी निष्कासन कारवाई केली. कारवाईचे तपशील: ▪️ काळाखडक झोपडपट्टीत २५० मीटर लांबी व १६ मीटर रुंदीच्या क्षेत्रावर ही कारवाई▪️ सुमारे ४६...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: मनोज जरांगे-पाटील निवडणूक लढणार नाहीत; त्यांच्या समर्थक उमेदवारांना माघार घेण्याचे आदेश.

0

मनोज जरांगे-पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मराठवाड्यातील मतविभाजन टळणार; शिवसेना (शिंदे गट) आणि शरद पवार एनसीपीला होणार मोठा फायदा. पुणे: मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी जाहीर केले की, ते निवडणूक राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या सर्व समर्थक उमेदवारांना विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेण्याचे आदेश दिले आहेत. मराठवाड्यात जवळपास १७ उमेदवारांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून मनोज जरांगे-पाटील...

Copyright ©