सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 10 : सैनिकांनी देशासाठी केलेले समर्पण कुठल्याही मूल्यांमध्ये मोजता येत नाही. सैन्यातील खडतर जीवन जगून देशासाठी त्याग करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनातूनही सैनिकांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येते. हा निधी सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रामगिरी शासकीय निवासस्थानी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम...
“आम्हाला यातला एकही रुपया नको” – गुणाट गावकऱ्यांचा निर्णय; सरपंचांनी बक्षीस नाकारले!
गुणाट, पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात गुणाट गावकऱ्यांनी पोलिसांना मोठी मदत केली, मात्र त्यानंतर गावात अनपेक्षित वाद निर्माण झाला. गुणाट गावाचे सरपंच रामदास काकडे यांनी मोठा निर्णय घेत पोलिसांनी घोषित केलेले १ लाखाचे बक्षीस स्वीकारण्यास नकार दिला. गावकऱ्यांनी एकत्रितपणे ही रक्कम नाकारण्याचे ठरवत हा निर्णय...
“चाकण-तळेगाव वाहतूक कोंडीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पहाटेचा थेट पाहणी दौरा – संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ तोडगा काढण्याच्या सूचना”
चाकण | चाकण-तळेगाव परिसरातील सतत वाढणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक, उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्ण त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज शुक्रवारी पहाटे थेट रस्त्यावर उतरून पाहणी केली. रात्री उशिरा बीड जिल्ह्याचा दौरा पूर्ण करून पहाटेच पुण्यात दाखल झालेले अजित पवार यांनी भोसरीपासून चाकणपर्यंतच्या वाहतूक व्यवस्थेची सखोल तपासणी...
वानवडी पोलिसांची मोठी कारवाई! १० लाख रुपये किंमतीचे प्रतिबंधित मांडुळ जप्त, दोन आरोपी जेरबंद
पुणे शहरातील वानवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्यानुसार प्रतिबंधित असलेल्या मांडुळ जातीच्या सापांची अवैध विक्री करणाऱ्या दोन इसमांना अटक केली आहे. या कारवाईत १० लाख रुपये किंमतीचा रेडसन जातीचा मांडुळ जप्त करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानवडी पोलिसांची गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ फेब्रुवारी २०२५ रोजी कोम्बिंग...
उल्हासनगरमधील लॉजवर कळवा गुन्हे शाखेचा छापा; अनैतिक संबंध प्रकरणी दहा जणांना अटक
उल्हासनगर (ठाणे) – शहरातील शुभम लॉजिंग अॅण्ड बोर्डिंग येथे अनैतिक कृत्यांची माहिती मिळाल्यानंतर कळवा गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत चार पुरुष आणि सहा महिलांना अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. लॉज व्यवस्थापक, वेटर व ग्राहकांना अटक अटक करण्यात आलेल्या पुरुषांमध्ये लॉजचा व्यवस्थापक, एक वेटर आणि लॉजमध्ये आलेले ग्राहक यांचा समावेश...
पाहुणचारासाठी गेले आणि मृतदेहात परतले; एका बहिणीचा करुण हंबरडा – ‘सर्व काही उद्ध्वस्त झालं, आता जगायचं तरी कसं?’
मुंबई - जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील अतुल माने, संजय लक्ष्मण लेले आणि हेमंत जोशी या तिघांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजश्री अकुल या मयत अतुल माने यांच्या पत्नीच्या बहिणीने दिलेल्या माहितीने संपूर्ण महाराष्ट्राला हेलावून सोडलं आहे. "ते त्यांच्या पोटात, डोक्यात आणि छातीत गोळ्या झाडत होते – माझ्या बहिणीच्या डोळ्यांसमोर!" राजश्री...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवर चर्चा रंगली
मुंबई, दि. ७ नोव्हेंबर २०२४: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे नेते मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवर एकमताने निर्णय घेत नाहीत असे दिसत आहे. सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गटाने निवडणुकीसाठी एकत्र लढाई सुरू केली आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील सभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या...
मुंबईत मोठा आर्थिक घोटाळा! कोकण रेल्वे पतसंस्थेच्या माजी अध्यक्षाचा ₹2.40 कोटींच्या बनावट कर्ज प्रकरणात अटकेसाठी EOW ची कारवाई
मुंबई | १८ जून २०२५ – मुंबई पोलिसांच्या इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग (EOW) ने कोकण रेल्वे विभाग (शहरी) सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष अभिजीत देशमुख यांना अटक केली आहे. त्यांनी बनावट कर्मचारी व खोट्या कागदपत्रांच्या आधारे ₹२.४० कोटींचे कर्ज मंजूर करून संस्थेला फसवले असल्याचा आरोप आहे. तब्बल महिनाभर फरार; अखेर हिंगोलीतून अटक देशमुख हे २०२० ते २०२३ या काळात पतसंस्थेचे अध्यक्ष होते. FIR...
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची नवी रणनिती; १०० जागांचा लक्ष्य ठरवून मैदानात उतरणार.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी तीन महिन्यांपूर्वी १४५ पेक्षा जास्त जागांचे लक्ष्य ठेवणाऱ्या भाजपने आता आपल्या अपेक्षा कमी केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील अपेक्षित निकालांपेक्षा कमी जागा जिंकल्यामुळे झालेल्या धक्क्यामुळे भाजपने आता १०० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठरवले आहे. सध्या १०६ विधानसभा जागा असलेल्या भाजपला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साहाय्याने १४५ पेक्षा जास्त जागा मिळवण्याची आशा आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच...
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे भव्य उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते! महाराष्ट्राच्या विकासात ऐतिहासिक पाऊल
महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा क्षण आज घडला! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंतचा प्रवास आता पूर्णपणे अखंड आणि सुसज्ज महामार्गावरून होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्याचे उद्घाटन झाल्याने ७०१ किलोमीटर लांब महामार्ग आता सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. या महामार्गामुळे समृद्ध महाराष्ट्राची संकल्पना आता प्रत्यक्षात उतरली आहे,...












