पुणे जिल्ह्यात मानव-बिबट संघर्ष नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
पुणे – पुणे जिल्ह्यातील मानव-बिबट संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपवनसंरक्षक श्री. प्रशांत खाडे (जुन्नर विभाग) व श्री. महादेव मोहिते (पुणे विभाग), प्रादेशिक व वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान जिल्ह्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील...
2024 च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त थेट अद्यतने: पंतप्रधान मोदी यांनी ‘सार्वभौम नागरी संहिता’, ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ यांचा पाठपुरावा केला आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हल्ले थांबण्याची आशा व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सलग 11व्यांदा नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय ध्वज फडकवला. लाल किल्ल्याच्या बुरुजांवरून आपल्या 11व्या सलग भाषणात पंतप्रधानांनी मागील काही वर्षांत नैसर्गिक आपत्तींमुळे प्रभावित झालेल्या लोकांसोबत राष्ट्र उभं असल्याचं सांगितलं. संपूर्ण भारतात सुरक्षा कडक करण्यात आली असून, दिल्लीमध्ये 10,000 हून अधिक पोलिस, चेहर्यांची ओळख पटवणारे कॅमेरे आणि स्नायपर्स तैनात करण्यात आले आहेत.'कायद्याचा राज्य प्रस्थापित होईल...
‘सेवा तीर्थ’ राष्ट्राला समर्पित; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सेवाभावाचा संदेश
नवी दिल्ली : देशवासीयांच्या सेवेसाठी अटूट संकल्प आणि ‘नागरिक देवो भव’ या पवित्र भावनेने प्रेरित होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘सेवा तीर्थ’ राष्ट्राला समर्पित केले. कर्तव्य, करुणा आणि ‘राष्ट्र प्रथम’ या मूल्यांवर आधारित हा उपक्रम देशसेवेच्या भावनेला अधिक दृढ करणारा ठरणार आहे. या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, ‘सेवा तीर्थ’ हे केवळ एक वास्तू किंवा स्मारक नसून, ते देशासाठी...
पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलिसांचा अभिनव उपक्रम! ‘लाईव्ह ट्रॅकिंग वेबसाइट’ सुरु; वाहतुकीसह रस्ता बंदीबाबत रिअल टाइम अपडेट्स
पुणे – वारीची परंपरा, श्रद्धा आणि भक्तीच्या महामार्गावर निघालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांनी एक विशेष वेबसाईट लॉन्च केली आहे. या वेबसाईटद्वारे नागरिकांना रिअल टाइममध्ये पालखीचा सध्याचा मार्ग, वाहतूक परिस्थिती, रस्ते बंदी आणि डायव्हर्जन्सची माहिती सहज मिळणार आहे. पालखी सोहळा आणि वाहतूक नियंत्रण – एकत्रित प्रयत्न पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “वारी दरम्यान वारकऱ्यांच्या...
मोबाईल टॉर्चच्या प्रकाशातून मतदान करण्याचा दिला संदेश
पिंपरी : भक्ती शक्ती येथे जमलेल्या शेकडो युवकांनी क्षणातच वातावरण बदलले. अचानक सर्वांनी मोबाईलचे टॉर्च प्रज्वलित करत एकत्र येत ‘VOTE’ असा शब्द साकारला आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत येत्या १५ जानेवारीला मतदान करण्याचा संदेश दिला. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त...
मुंबईत डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय! MMRDA आणि NPCI यांच्यात ऐतिहासिक करार, BKC येथे NPCI चे जागतिक मुख्यालय उभारणार
मुंबई :- महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आर्थिक व्यवहारांचे प्रमुख केंद्र आहे. या अर्थसत्ता आणि तंत्रज्ञानाच्या केंद्रबिंदूत आता आणखी एक मोठी भर पडली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, या करारानुसार BKC (बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स) येथे NPCI चे जागतिक मुख्यालय उभारले जाणार आहे. मुख्यमंत्री...
धुळ्यातून गांजाची तस्करी; पुण्यात विक्रीपूर्वी ५५ किलो गांजासह तस्कर अटकेत, ३२ लाखांचा माल जप्त.
पिंपरी चिंचवड पोलिसांचा मोठा धडाका, धुळे ते पुणे गांजा तस्करी उघडकीस. पुणे : धुळे जिल्ह्यातून गांजाची तस्करी करुन पुण्यात विक्रीसाठी आलेल्या एका आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत ५५ किलो ६९० ग्रॅम गांजासह ३२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी नुरमोहम्मद गफ्फार पिंजारी (वय ४५, रा. वडाला गाव, मदिना नगर, नाशिक)...
पुण्यात वाहन अपघात प्रकरणी कठोर कारवाई – आरोपीसह ९०,००० रुपयांचा दंड!
पुणे – वाहन अपघातानंतर पळून जाणाऱ्या आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याच्या दिशेने पुणे पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या अपघात प्रकरणात संबंधित व्यक्तीवर कलम ३०४, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्यावर ९०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम अपघात हा पुण्यातील मेट्रो परिसराजवळील व्यस्त रस्त्यावर घडला. सायंकाळच्या वेळी वाहनचालकाने भरधाव वेगाने वाहन...
भारत सागरी महासत्ता होण्यात महाराष्ट्र अग्रगण्य : जेएन पोर्ट टर्मिनल फेज-2 उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
नवी मुंबई : देशाला सागरी अर्थव्यवस्थेत महासत्ता बनविण्याच्या दिशेने महाराष्ट्राने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे. जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-2 च्या विस्तारामुळे भारताच्या सागरी क्षमतेत प्रचंड वाढ झाली असून, महाराष्ट्र यामध्ये प्रमुख भूमिका बजावणार आहे. “भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उरण (रायगड) येथे केले. महत्त्वाचा सोहळा –...
भारतीय संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला उतुंग भरारी घेण्याचा अधिकार – ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे
पिंपरी – भारतीय संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला उतुंग भरारी घेण्याचा अधिकार प्राप्त झाला असून भारतीय संविधान म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करणारा मानवमुक्तीचा जाहिरनामा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे यांनी केले. भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित पिंपरी येथील प्रबोधनात्मक कार्यक्रमात ‘भारतीय संविधान -मानवमुक्तीचा जाहिरनामा’ या विषयावर व्याख्यान देताना जोंधळे बोलत होते. या कार्यक्रमास राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अॅड. गोरक्ष लोखंडे, महापालिका ...











