महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 223

“खड्ड्यांत रुतलेली बस, १० तासांचे प्रयत्न, आणि अखेर शेतकऱ्यांची बससेवा बंद!”

0

खेड तालुका (जि. रत्नागिरी) – जिथं नागरिक मागणं करतात तिथं दुर्लक्ष, आणि जिथं कोणी विचारतही नाही तिथं कोट्यवधींचे प्रकल्प – हा राज्य शासनाचा नवा विकासनामा असं चित्र सध्या खेड तालुक्यात पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यातील तीन गावांमध्ये बससेवा बंद झाली आहे. कारण? रस्त्यावर पडलेले इतके खोल खड्डे, की बस अडकली आणि बाहेर काढायला दोन ट्रॅक्टरने तब्बल १० तासांचा वेळ लागला! शक्तीपीठ...

महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडला; सुनेत्रा अजित दादा पवार यांची पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ

0

मुंबई | लोकभवन | प्रतिनिधी संध्या. ५.०५ वा. | ३१-०१-२०२६📍 लोकभवन, मुंबई महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमती सुनेत्रा अजित दादा पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. मुंबईतील लोकभवन येथे सायंकाळी ५.०५ वाजता हा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य मंत्रिमंडळातील...

साश्रू नयनांनी महाराष्ट्राने दिला अजितदादांना अखेरचा निरोप; बारामतीत शोकसागर उसळला

0

बारामती | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगता झंझावात, जनतेच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना आज बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडलेल्या या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित प्रत्येकाचे मन गहिवरून आले होते. अजितदादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येताच परिसरात एकच शांतता पसरली. परवा सायंकाळपर्यंत...

राज्यसभेसाठी प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; शिवसेनेत उत्साहाचे वातावरण

0

मुंबई : राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर Shiv Sena पक्षाच्या वतीने प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी आज Vidhan Bhavan येथे आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षातील अनेक वरिष्ठ नेते आणि मान्यवर उपस्थित होते. यामध्ये Gajanan Kirtikar, Anandrao Adsul, Vijay Shivtare, Abdul Sattar, Amol Khatal, Kiran...

फरासखाना पोलिसांची धडाकेबाज कारवाई — ‘एक किलो सोने’ चोरी करणारा कामगार सात राज्यांत पळूनही अखेर जेरबंद; १.२७ कोटींचा मुद्देमाल सुरक्षित

0

पुणे — शहरात खळबळ उडवणाऱ्या ‘एक किलो सोने चोरी’ प्रकरणाचा फरासखाना पोलिसांनी थरारक उलगडा केला असून, सात राज्यांत पळत राहून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर पकडला आहे. तब्बल १ कोटी २७ लाख रुपये किंमतीचे एक किलो शुद्ध सोने सुरक्षित हस्तगत करण्यात पोलिसांना शंभर टक्के यश मिळाले आहे. 🔹 चोरीचा सिनेमासारखा प्रकार १६ ऑक्टोबर २०२५ रोजी बुधवार पेठेतील Precious Refinery या दुकानात...

मुंबईत पहिल्याच पावसात पाणी साचले; अंधेरी सबवे जलमय, वाहतुकीचा खोळंबा

0

मुंबईत मान्सूनने दमदार हजेरी लावल्यानंतर अवघ्या एका दिवसात अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. अंधेरी सबवे परिसर पूर्णपणे जलमय झाल्याने वाहतूक बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी प्रशासनाच्या मान्सूनपूर्व तयारीवर नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात अंधेरी सबवे परिसरात...

अंबरनाथ पूर्वेत जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य; थेट संवादातून तातडीने निवारण

0

अंबरनाथ : लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी व्हावा तसेच सर्वसामान्यांच्या अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने अंबरनाथ पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित भेटीगाठींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या, मागण्या आणि सूचना मांडत जनसंपर्क कार्यालयात हजेरी लावली. या वेळी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, गटार स्वच्छता, मालमत्ता कर, वीजपुरवठा, आरोग्य सुविधा, शासकीय योजनांचा लाभ तसेच स्थानिक...

शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे : "कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत शेतीकडे वाटचाल करणे हेच या योजनांचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेस चालना देण्यासाठी जिल्हास्तरावर सुसंगत आणि परिणामकारक योजना राबविण्यात याव्यात," असे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.              उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज "दिशा कृषी उन्नतीची @2029" आणि "कृषी समृद्धी योजना 2025-26" या...

भांडुप पूर्व – पश्चिम जोडणीसाठी महत्त्वाचा टप्पा : भांडुप रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल प्रकल्पाची गती वाढविण्याचे निर्देश

0

भांडुप परिसरातील वाहतूक कोंडी कमी करून पूर्व आणि पश्चिम भागातील नागरिकांना अधिक सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने भांडुप रेल्वे स्थानक परिसरात लोहमार्गावरील उड्डाणपूल (Road Over Bridge - ROB) उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढविण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी आज प्रत्यक्ष प्रकल्प कार्यस्थळी भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा...

पुणे महानगरपालिकेत प्रजासत्ताक दिनाचा गौरवशाली सोहळा; ध्वजारोहण, संविधान वाचन व महापुरुषांना अभिवादन

0

पुणे | प्रतिनिधी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेमध्ये सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत सन्मानपूर्वक ध्वजारोहण व ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यात मा. नवल किशोर राम, प्रशासक तथा आयुक्त, पुणे महानगरपालिका यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला आणि तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा. आयुक्त नवल किशोर राम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा...

Copyright ©