महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 205

पुण्यात हृदयद्रावक घटना : १३ वर्षीय रोहन बॉंबेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; वन विभागाची व्यापक शोधमोहीम सुरु

0

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळखेड (आंबेवाडी) गावात रविवारी दुपारी घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलगा रोहन विलास बॉंबे (वय १३ वर्षे) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी साधारण ३.४५ वाजता ही घटना घडली असून, या घटनेने परिसरात भीतीचं आणि शोकाचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रोहन हा शेताच्या परिसरात खेळत असताना झुडपातून अचानक बिबट्याने झडप घालून त्याच्यावर हल्ला केला. जवळच्या...

युनिट ६ गुन्हे शाखेची कारवाई; उत्तरपत्रिकांचे सहा बंडल, २ लाखांहून अधिक रोकड जप्त; शिक्षण संस्थेच्या नावाला काळिमा

0

पुण्यात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. वाघोली येथील पार्वतीबाई गेणबा मोझे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी संगनमत करून परीक्षेत मोठा गैरप्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकाने या टोळीवर कारवाई करत प्राध्यापकासह तीन विद्यार्थ्यांना अटक केली असून आठ इतर विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. कारवाईचा तपशील: युनिट ६ चे सहाय्यक पोलीस...

रेल्वे ट्रॅकवर ठेवलेल्या गॅस सिलेंडर प्रकरणाला वर्ष पूर्ण, तपास अद्याप निष्कर्षापर्यंत नाही!

0

पुणे शहरात जवळपास एक वर्षापूर्वी एक भीषण दुर्घटना अटळ होती, परंतु शताब्दी एक्स्प्रेसच्या लोको पायलटने वेळीच सतर्कता दाखवून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवले. उरुळी कांचन परिसरातील रेल्वे ट्रॅकवर लाल रंगाचा एलपीजी गॅस सिलेंडर ठेवलेला दिसताच त्यांनी तत्काळ इमर्जन्सी ब्रेक लावले आणि मोठा अनर्थ टळला. मात्र या धक्कादायक प्रकरणाचा तपास अजूनही निष्कर्षापर्यंत पोहोचलेला नाही. घटना कशी घडली? 29 डिसेंबर 2024 रोजी रात्री 10.42...

पिंपरी-चिंचवड : नागरिकांसोबत विश्वास आणि आपुलकीची लोकसंवादा

0

पिंपरी-चिंचवड : लोकसंवादा ही केवळ संवादाची साधन नाही, तर नागरिकांच्या समस्या समजून घेण्याचा आणि त्यांची तत्काळ सोडवणूक करण्याचा महत्त्वाचा व्यासपीठ बनले आहे. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन अडचणींबाबत नेहमी मार्गदर्शन आणि मदत मिळावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन सातत्याने केले जाते. निवासस्थानी होत असलेल्या गर्दीत नागरिकांची प्रत्येक अपेक्षा, अडचण आणि मागणी लक्षात घेतली जाते. शहरी विकास, रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, शिक्षण, आरोग्य आणि...

सीआयएसएफ स्थापना दिनानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव; राष्ट्राच्या सुरक्षेत महत्त्वाची भूमिका

0

नवी दिल्ली : देशाच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक संस्थांचे संरक्षण करणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) स्थापना दिनानिमित्त देशभरातून जवानांना शुभेच्छा देण्यात आल्या. या निमित्ताने दलाच्या शौर्य, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. Central Industrial Security Force (CISF) हे देशातील प्रमुख केंद्रीय सुरक्षा दलांपैकी एक असून विमानतळ, मेट्रो रेल्वे, अणुऊर्जा केंद्रे, सरकारी इमारती, बंदरे तसेच विविध महत्त्वाच्या औद्योगिक...

भारतीय सैन्यासाठी वडोदऱ्याच्या विद्यार्थिनीची देणगी! २१ वर्षीय खुशी पठाणने तयार केला सौरऊर्जेवर चालणारा स्मार्ट गणवेश

0

वडोदरा : गुजरातमधील २१ वर्षीय फॅशन डिझाईन विद्यार्थिनी खुशी पठाण हिने भारतीय सैनिकांसाठी एक अनोखा व अभिनव शोध लावला आहे. तिने विकसित केलेला सौरऊर्जेवर चालणारा स्मार्ट गणवेश हा सैनिकांसाठी केवळ पोशाख नसून जीवन वाचवणारे साधन ठरू शकतो. गणवेशाची वैशिष्ट्येया खास गणवेशामध्ये सौरऊर्जा पॅनेल्स बसवलेले आहेत, ज्यामुळे सैनिकांना त्यांच्या मोबाईल फोन, कम्युनिकेशन डिव्हाइस, नाईट व्हिजन इक्विपमेंट, टॉर्च, GPS प्रणाली यांसारखी उपकरणे...

हडपसर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! चैन स्नॅचिंग टोळीचा पर्दाफाश, तब्बल ₹७.०४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0

पुणे शहर पोलिसांच्या हडपसर पोलीस ठाण्याने मोठी कारवाई करत चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, तब्बल ₹७,०४,६००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हडपसर व परिसरात महिलांना लक्ष्य करून चैन चोरीचे प्रकार वाढले होते. विशेषतः संध्याकाळच्या वेळेत गर्दीच्या बाजारपेठा आणि मंदिर परिसरात महिलांच्या गळ्यातील चैन हिसकावण्याचे प्रकार घडत होते. या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी...

शासकीय सेवेत निर्णयक्षमता, प्राधान्यक्रम व सकारात्मकता महत्त्वाची; मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे प्रतिपादन, इक्बाल सिंग चहल यांच्या सेवेला गौरवपूर्ण निरोप

0

मुंबई | प्रतिनिधी शासकीय सेवेत कार्यरत असताना केवळ पद नव्हे, तर निर्णय घेण्याची क्षमता, परिस्थितीनुरूप विचार, कामाचा अचूक प्राधान्यक्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन हे अत्यंत महत्त्वाचे गुण असतात. या गुणांच्या आधारेच अधिकारी आपल्या सेवाकाळात वेगळा ठसा उमटवू शकतात, असे मत राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केले. मंत्रालयातील परिषद सभागृहात गृह विभागाचे सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव श्री. इक्बाल सिंग चहल यांच्या...

सीआयएसएफच्या शूर जवानांसोबत होळी साजरी; एकात्मतेचा आणि कृतज्ञतेचा रंगोत्सव

0

मुंबई : होळी हा सण केवळ रंगांची उधळण नसून मनामनातील दुरावा मिटवून नात्यांमध्ये प्रेम, आपुलकी आणि एकतेचा ओलावा जपणारा मंगलमय सोहळा आहे. आयुष्यातील दुःख, चिंता आणि तणाव विसरून आनंदाच्या रंगात न्हाऊन निघणे, हेच या सणाचे खरे सार्थक असल्याची भावना व्यक्त करत यंदाची होळी सीआयएसएफच्या शूर जवानांसोबत उत्साहात साजरी करण्यात आली. देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि विविध राज्यांतून आलेले Central Industrial Security Force...

चिखलीतील अंगणवाडी रोड ते अष्टविनायक चौक रस्त्याचे डांबरीकरण सुरू; यश साने यांच्या प्रयत्नांना यश

0

पिंपरी-चिंचवड : चिखली येथील अंगणवाडी रोड ते अष्टविनायक चौक या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण आज युवा नेते यश दत्ताकाका साने यांच्या प्रमुख उपस्थितीत मोरेवास्तीतील नागरिकांच्या वतीने नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. हा मार्ग काही काळापूर्वी स्ट्रोम वॉटर लाईनच्या कामामुळे खड्डेमय झाला होता आणि मनपाच्या वतीने दुरुस्ती न झाल्याने नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक यांना रोजच प्रवास करताना गंभीर असुविधांचा सामना करावा...

Copyright ©