0
0
0
0
0

Breaking News

Home Breaking News Page 26

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; कुटुंबासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण

0

नवी दिल्ली : देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा अविस्मरणीय व अत्यंत भावनिक अनुभव एका कुटुंबासाठी आयुष्यभराची आठवण ठरला आहे. या भेटीदरम्यान पंतप्रधानांशी संवाद साधताना प्रेरणा, ऊर्जा आणि देशसेवेची नवी उमेद मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. पंतप्रधानांच्या उपस्थितीत संपूर्ण वातावरण सकारात्मकतेने आणि आत्मविश्वासाने भारलेले होते. त्यांच्या साधेपणाने, आत्मीयतेने आणि प्रत्येकाशी जोडून घेण्याच्या स्वभावामुळे...

काटेवाडीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे मतदान; लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांना मतदानाचे आवाहन

0

बारामती (काटेवाडी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. साध्या व संयत पद्धतीने मतदान केंद्रावर दाखल होत त्यांनी सर्वसामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदान केले. त्यांच्या उपस्थितीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी...

अंबरनाथ पूर्वेत जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य; थेट संवादातून तातडीने निवारण

0

अंबरनाथ : लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी व्हावा तसेच सर्वसामान्यांच्या अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने अंबरनाथ पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित भेटीगाठींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या, मागण्या आणि सूचना मांडत जनसंपर्क कार्यालयात हजेरी लावली. या वेळी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, गटार स्वच्छता, मालमत्ता कर, वीजपुरवठा, आरोग्य सुविधा, शासकीय योजनांचा लाभ तसेच स्थानिक...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

0

पुणे : राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार लोकशाहीचा पवित्र उत्सव साजरा करताना मतदान अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्ये जबाबदारीने बजाविण्याबाबत सूचना दिल्या आहेत; पात्र मतदारांनी निवडणुकीकरिता उर्त्स्फूतपणे मतदान करावे, नागरिक व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसहिंतेचे पालन करून शांततेत पूर्ण प्रक्रिया पार पाडावी, संपूर्ण निवडणुकीच्या कामकाजाकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत...

महाराष्ट्रात महिंद्राची ₹15,000 कोटींची मेगा गुंतवणूक; 15 हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती, ग्रीनफिल्ड उत्पादन सुविधांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मंजुरी

0

मुंबई/नागपूर : महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला मोठी चालना देणारा आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणारा महत्त्वपूर्ण निर्णय आज जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांच्यात विविध प्रमुख क्षेत्रांमध्ये नवीन ग्रीनफिल्ड उत्पादन सुविधा उभारण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या कराराअंतर्गत राज्यात तब्बल ₹15,000 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून 15,000 हून अधिक थेट...

‘कॅश क्रॅश’ची बाबा वेंगांची भविष्यवाणी खरी ठरतेय का? सोन्या-चांदीच्या दरांनी गाठले विक्रमी शिखर, गुंतवणूकदारांचा सुरक्षित पर्यायांकडे कल

0

बुल्गारियाच्या प्रसिद्ध भविष्यवक्त्या बाबा वेंगा पुन्हा एकदा जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. त्यांच्या गूढ आणि धक्कादायक भविष्यवाण्यांमुळे त्यांना “बाल्कनचे नास्त्रेदमस” असे संबोधले जाते. युद्धे, आर्थिक संकटे, नैसर्गिक आपत्ती आणि जागतिक उलथापालथींचे त्यांनी केलेले भाकीत अनेक वेळा खरे ठरल्याचा दावा केला जातो. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक विधानाकडे जगभरातील लोक गांभीर्याने पाहतात. २०२६ संदर्भातील त्यांच्या एका भविष्यवाणीने सध्या पुन्हा खळबळ उडवली आहे....

सांगलीचा प्रणव देशाच्या पातळीवर झळकला! ‘परीक्षा पे चर्चा 2026’ साठी महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थ्याची निवड

0

सांगली : सांगलीच्या मातीने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली असून महाराष्ट्राच्या लेकराने थेट देशाच्या पातळीवर झेंडा रोवला आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित ‘परीक्षा पे चर्चा 2026’ या उपक्रमासाठी देशभरातून तब्बल 4.5 कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या प्रचंड स्पर्धेतून केवळ 36 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थी म्हणून सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील...

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे दर्शन; लोकसेवेसाठी घेतली आध्यात्मिक ऊर्जा

0

अक्कलकोट : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात जाऊन पवित्र दर्शन घेतले. स्वामींच्या समाधीस्थळावर नतमस्तक होत त्यांनी प्रार्थना केली आणि समाजसेवेच्या कार्यासाठी आशीर्वाद घेतला. मंदिर परिसरात अत्यंत भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण होते. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने मनाला विलक्षण शांती लाभते आणि आयुष्याच्या धकाधकीत हरवलेली ऊर्जा पुन्हा एकदा नव्याने...

माता रमाबाई नगरमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; जीर्ण पाईपलाईन तातडीने बदलण्याची मागणी

0

मुंबई :भांडुप पूर्व येथील प्रभाग क्रमांक ११४ मधील माता रमाबाई नगर परिसरात पिण्याच्या पाण्यात दूषित घटक मिसळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नळातून येणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत असून पाण्याचा रंगही गढूळ दिसत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली...

“निष्ठा–समर्पण–शाश्वत विकास” हीच भाजपाची दिशा; पिंपरी-चिंचवडला नव्या नेतृत्वाची साथ – आमदार महेश लांडगे

0

पिंपरी-चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाली असून भारतीय जनता पार्टीचे रवि बाबासाहेब लांडगे यांची महापौरपदी आणि शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. तब्बल चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पुन्हा लोकप्रतिनिधींच्या सभागृहाचे कामकाज सुरू झाल्याने शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी “निष्ठा, समर्पण आणि शाश्वत विकास” हीच सत्ताधारी...

Copyright ©